गुजरातच्या पोरबंदरमधील समुद्रात पाकिस्तानी बोट आपल्या आदेशानाचे उडवण्यात आली होती या विधानावरुन तटरक्षक दलाचे डीआयजी बी.के.लोशली यांनी घुमजाव केले आहे.
नवी दिल्ली – नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुजरातच्या पोरबंदरमधील समुद्रात पाकिस्तानी बोट आपल्या आदेशानाचे उडवण्यात आली होती या विधानावरुन तटरक्षक दलाचे डीआयजी बी.के.लोशली यांनी घुमजाव केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील नेमके सत्य काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाकिस्तानातून आलेली ती बोट उडवून टाका. आपल्याला त्यांना बिर्याणी खाऊ घालायची नाही हे लोशली यांचे विधान वर्तमानपत्रांमध्ये प्रसिध्द होताच बुधवारी लोशली यांनी या विधानावरुन घुमजाव केले. माझ्या आदेशाने बोट उडवण्यात आली असे मी कुठेही म्हटलेले नाही प्रसारमाध्यमांमध्ये छापून आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत असे लोशली यांनी म्हटले आहे.
लोशली यांचे विधान सरकारने जी माहिती दिली त्या विरुध्द असून, नरेंद्र मोदी सरकारच्या अडचणी वाढवणारे आहे. तटरक्षक दलाच्या जवानांनी पाठलाग सुरु केल्यानंतर बोटीवरच्या संशयित दहशतवाद्यांनी बोट स्फोटामध्ये उडवून दिली अशी माहिती सरकारने दिली होती.
३१ डिसेंबरला नववर्ष स्वागताच्या मध्यरात्री पोरबंदरपासून ३६५ कि.मी. अंतरावर तटरक्षक दलाने संशयित बोटीचा पाठलाग सुरु केल्यानंतर बोटीमधील संशयित दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. परिस्थितीजन्य पुराव्यांवरुन ‘त्या’ बोटीचा दहशतवादाशी संबंध होता असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले होते. सरकारी अधिका-यानेच परस्पर विरोधी विधान केल्यामुळे या प्रकरणातील नेमके सत्य काय असा प्रश्न निर्माण होतो.
अहो कसले ” सत्य ” शोधत बसलात? बोट पाकिस्तान्मधुनच आली होती ना ? ती काय तुम्हा भारतीयांना मिठाईचे खोके घेवून
आली होती काय?? चवकशी च्या नावाखाली बिर्याणी खाण्याची स्वप्ने पहात बसू नका , फाईल बंद करा आणि चूप बसा,!