राज्यातील शाळांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ, खर्रा आदी खाऊन शाळेत येणा-या शिक्षकांना ताळय़ावर आणण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे.
मुंबई – राज्यातील शाळांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ, खर्रा आदी खाऊन शाळेत येणा-या शिक्षकांना ताळय़ावर आणण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. यापुढे शिक्षक शाळेत तंबाखूजन्य पदार्थ आणि दारूपानाचे सेवन करून आल्यास त्याच्यावर थेट बडतर्फीची कारवाई केली जाणार आहे. यासाठीचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला असून त्याची अंमलबजावणीही राज्यात सुरू करण्यात आली.
राज्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये राज्य सरकारने तंबाखूजन्य पदार्थावर कधीच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयात हे पदार्थ शाळा आणि परिसरात खाण्यासही बंदी असताना या निर्णयाला न जुमानता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालकही शाळांमध्ये मोठय़ा प्रमाणात तंबाखू, खर्रा आणि तंबाखूजन्य पदार्थ खाऊन येतात. तर ग्रामीण भागातील सरकारी, अनुदानित शाळांमध्ये काही शिक्षक दारूचे सेवन करून शाळेत येत असल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर याचा परिणाम होतो.
शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार शाळांमध्ये तंबाखू, खर्रा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ आणि दारूचे सेवन करून शिक्षक आलेल्या शिक्षकांना सुरुवातीला समज देऊन त्यांचे प्रमोशन रोखण्यात येईल. तसेच सरकारकडून मिळणा-या सर्व सोयी-सुविधांपासून वंचित ठेवण्याची कारवाई केली जाणार आहे. तसेच एखाद्या शिक्षकाने शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज केला असेल आणि तो शिक्षक जर तंबाखू, खर्रा आदींचे सेवन करत असेल तर त्यासाठीचा प्रस्ताव रोखला जाणार आहे. यानंतरही जर या तंबाखूखाऊ शिक्षकांमध्ये सुधारणा झाली नाही तर या शिक्षकांचा अहवाल शिक्षण विभागाकडे पाठवून त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई केली जाणार आहे.
या शिक्षकांना शाळेच्या गटारांत जिवंत गाडा!