आम्हाला सहा महिन्यांची मुदत द्या, आम्ही पाकव्याप्त काश्मिरातील सर्व दहशतवादी तळ उद्ध्वस्त करू, अशी मागणी लष्कराने सरकारकडे केल्याची चर्चा आहे.
नवी दिल्ली- आम्हाला सहा महिन्यांची मुदत द्या, आम्ही पाकव्याप्त काश्मिरातील सर्व दहशतवादी तळ उद्ध्वस्त करू, अशी मागणी लष्कराने सरकारकडे केल्याची चर्चा आहे.
पाकव्याप्त काश्मिरातील सर्जिकल हल्ल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची योजना केली आहे. वरिष्ठ लष्करी अधिका-याने सांगितले की, लष्कराच्या वरिष्ठ नेतृत्वाने एकाच हल्ल्याने दहशतवाद्यांचे नुकसान होणार नसल्याचे स्पष्ट केले. दहशतवाद्यांना जेरीस आणायचे असल्यास मध्यम मुदतीची मोहीम राबवणे गरजेचे असल्याचे सांगितले.
लष्करातील अत्यंत अनुभवी धोरणात्मक अधिका-याने सांगितले की, काश्मीरमध्ये लष्कर व सीमा सुरक्षा दलावर दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले होत आहेत. तसेच हे दहशतवादी अन्यत्रही हल्ले करू शकतात. त्यामुळे दहशतवाद्यांचे लाँचपॅड उद्ध्वस्त करण्याची मोहीम राबवली पाहिजे. दहशतवाद्यांना माघार घ्यायला लावली पाहिजे. त्यातूनच काही निष्पन्न होऊ शकेल.
किमान सहा महिने ही योजना राबवली पाहिजे. केवळ एका मोहिमेने काहीही हातीशी लागणार नाही.
भारताच्या सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे सूत्रधार भारतात येत्या काही आठवडय़ांत अधिकाधिक दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
पाकव्याप्त काश्मिरात आणखीही लाँचपॅड असतील. त्यांना उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे, असे मत एका लष्करी अधिका-याने व्यक्त केले.
aage bado! Rajkiy chamchonko kuch bhi poocho mat.! Oonko apni kursi ke saath chipakkye baithne
Do ,!