पाकिस्तानने मंगळवारी पाच तासांमध्ये दोन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यात यात भारताच्या एका नागरिकाचा मृत्यू झाला.
जम्मू- पाकिस्तानने मंगळवारी पाच तासांमध्ये दोन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. तीन वेगवेगळ्या भागात पहाटे साडेपाचपासून केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) १२ चौक्यांना लक्ष्य केले होते. अनेक निवासी भागांमध्येही मोर्टार तोफांचा मारा करण्यात आला. यात भारताच्या एका नागरिकाचा मृत्यू झाला.
मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता परगवाल आणि कांचक सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याने गोळीबार केला. भारताच्या बीएसएफ जवानांनीही गोळीबार करुन पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानकडून दुस-यांदा गोळीबार सकाळी ११ वाजता आरएस पूरा सेक्टरमध्ये करण्यात आला. त्याआधी रविवार आणि सोमवारी ही पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता.
या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या चार दिवसातच पाकिस्तानने आतापर्यंत १० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. तर जुलैमध्ये १८ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून यात तीन जवान व एक नागरिक अशा चौघांचा मृत्यू झाला होता.
श्री मनोहर पर्रीकर साहेब मांडवी नदीतले मासे पकडून / तळून ते दिल्लीत राजनाथ साहेबांना पाठवीत आहेत कि काय ?
जरा इस्रायेल या देशाचे अनुकरण करा म्हणावं .