दागिने आपल्या शरीरस्वास्थ्याचीही काळजी घेतात. काही रोग बरे करण्यास मदत करतात, असं आयुर्वेदात नमूद केलं आहे. दागिन्यांच्या आयुर्वेदिक गुणधर्माविषयी दिलेली माहिती-
धातूंपासून बनवल्या गेलेलया दागिन्यांचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. ते दागिने शरीराच्या काही बिंदूंवर प्रभाव टाकतात. त्यामुळे शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते. मन आणि शरीर प्रसन्न राहतं. सोन्याचे दागिने शरीरावर कंबरेच्या वरील भागात तर चांदीच्या दागिन्यांना संपूर्ण शरीरभर परिधान केलं पाहिजे, असं आयुर्वेदात सांगितलं आहे. दागिन्यांचं महत्त्व पुढीलप्रमाणे –
बिंदी : बिंदी या अलंकारामुळे मेंदूला थंडावा मिळतो. महिलांच्या भांगेत भरलं जाणारं सिंदूर हे लाल ऑक्साइडयुक्त असतं. दोन्ही भुवयांमध्ये लावलेली बिंदी आज्ञाचक्राला सक्रिय ठेवते. मानसिकशक्ती आणि स्मरणशक्ती वाढवण्यास पोषक ठरते, असं मानतात.
माथ्यावरील टिका : कपाळावरील टिक्क्यामुळे संवेदनशक्ती स्नायूंच्या एकूण तंत्रावर नियंत्रण ठेवते, असं मानलं जातं.
कर्णफुलं किंवा भिकबाळी : कानात एकूण शरीराशी संबंधित असे जवळजवळ ८० केंद्रबिंदू आहेत. कानात कर्णफुलं किंवा भीकबाळी घातली तर हे सर्व बिंदू प्रभावित होतात. विविध रोगांवर नियंत्रण ठेवलं जातं. यामुळे फेफरं येणं, टॉन्सिल, हार्निया या व्याधींपासून सुटका मिळते, असं मानलं जातं.
नथ : हा दागिना घालण्याची प्रथा आजकाल कमी होत चालली आहे. पण नथ घालण्याने कफाच्या आणि नाकाच्या रोगांपासून बचाव होतो, असं मानलं जातं.
रत्नहार, मोत्याचा कंठा, नेकलेस : हे दागिने परिधान केल्याने गळय़ाच्या विशिष्ट भागांवर दाब पडतो. डोळयांतील तेज पुष्कळ वेळ टिकून राहतं. गलगंड आणि मानेखालची हाडं यांच्यावर होणा-या अनिष्ट परिणामांचा प्रभाव कमी होतो. गळयाच्या सर्व संभाव्य रोगांवर ही आभूषणं घालणं फायदेशीर मानलं जातं.
बाजूबंद :हा अलंकार खांदा आणि हाताचा कोपरा या दरम्यान घालतात. हा फक्त हृदयाचीच कार्यक्षमता वाढवत नाही, तर खांदा आणि हात यांना जो वेदनांचा त्रास होतो, त्यापासून सुटका करतो. बाजूबंद घालणारी स्त्री संयमी बनते, असं मानतात.
बांगडया : स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगडयांचा चांगला उपयोग होतो. त्या घातल्याने त्यांच्या चेह-याला तेज येतं. दात दुखणं, रक्तदाब कमी-जास्त होणं यावर या बांगडयांचा अनुकूल परिणाम होतो. बोबडेपणा, तोतरेपणा यांच्यावरही उपयोग होतो, असं मानलं जातं.
अंगठी : हाताच्या प्रत्येक बोटात अंगठी घालण्याची पद्धत आहे. अंगठी बोटात घातल्यास ती अनेक प्रकारच्या रोगांवर प्रभावी ठरते. मसलन आणि कनिष्टिका म्हणजे शेवटचं लहान बोट (करंगळी) आणि तिच्या जवळचं बोट यांच्यात अंगठी घातली की घाबरट, हृदयरोग, हृदयशूळ आणि मानसिक तणाव यांपासून होणारा त्रास कमी होतो. कफासंबंधीच्या तक्रारी, प्लिहा, लिव्हर याबाबतीतल्या ज्या तक्रारी असतात त्या कमी होतात. तर पित्तवाताच्या विकारांवर आणि पचनासंबंधीच्या तक्रारींबाबत चांदीची अंगठी घालणं फायदेशीर ठरतं. कफ, दमा किंवा शरीराला कंप येणं याबाबतीत तांब्याची अंगठी बोटात घालणं उपयुक्त ठरते.
कंबरपट्टा : कंबरेला कंबरपट्टा घालणा-या महिलांची पचनशक्ती वाढते. मासिक पाळी योग्य प्रकारे येते. त्यांना कंबर दुखणं, पाठदुखी वगैरे तक्रारींना तोंड द्यावं लागत नाही, असं मानलं जातं.
पायातील आणि बोटातील कडया : या घातल्यामुळे टाचा दुखणं, घोटे आणि पाठीच्या खालच्या भागात वेदना होत नाहीत. रक्तप्रवाह उत्तम प्रकारे चालू राहतो. तसंच महिलांना हिस्टेरिया, श्वास यांचा त्रास जाणवत नाही, असं मानलं जातं.
जोडवी : पायात जोडवी किंवा तत्सम प्रकारच्या वस्तू घातल्या तर प्रसूतिवेदना कमी होतात. ताप येणं, चक्कर येणं या बाधा होत नाहीत, असं मानलं जातं.
All of the information supplied can make it difficult to decide which of these amazing devices to purchase. Plan funerals, send cheap nfl jerseryss cheap and send sympathy gifts, using free product reviews and write your own unbiased customer reviews. Seriously, think of that commercial with the expensive toy and the toddler with the box that the expensive toy came in. Courage concentrates the mental forces on the task at hand. You can see it on your time and on your own pace (you can pause, you can take a brake and login another time to see the rest of it) without annoying commercials. That mutt is about as smart as a fence post.