कोल्हापूर जिल्ह्यातील ९ टोलनाके बंद करण्यात आले मात्र मुंबई टोलनाक्यांबाबत कोणताही निर्णय अद्याप झाला नसल्याने मुंबईकरांवरील टोलधाड कायम राहणार आहे.
मुंबई- राज्यातील ९ टोलनाके ३ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आले आहोत. हे टोलनाके कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मात्र मुंबई टोलनाक्यांबाबत कोणताही निर्णय अद्याप झाला नसल्याने मुंबईकरांवरील टोलधाड कायम राहणार आहे.
कोल्हापुरातील टोल बंद करण्यासाठी येथील जनतेसह सर्वपक्षीय एकवटले होते. त्यावर टोल बंदीचे लेखी आश्वासन देऊनही टोल वसूली सुरुच होती.
त्यामुळे संतापलेल्या स्थानिक लोकांनी शिरोली आणि फुलेवाडी टोलनाक्यावर तोडफोड केली होती. सोबत कोल्हापूरकरांनी एक दिवस कोल्हापूर बंद ठेवून फडणवीस सरकारचा निषेध केला होता.
संतप्त जमावाकडून फुलेवाडी टोलनाका पेटवण्यात आला होता. कोल्हापूरमधील टोल विरोधी आंदोलनाने हिंसक वळण धारण करुन सत्ताधा-यांची कोंडी केली होती.
असे असले तरी मुंबई प्रवेशद्वारावरील टोलबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबतचा चौकशी अहवाल सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यावर नक्कीच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी सारवासारव चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात येते. त्यामुळे जोपर्यंत मुंबई टोलबंदीचा निर्णय होत नाही तोपर्यंत मुंबईकरांवरील टोलधाड मात्र कायम राहणार आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील एकप्रकारे मुंबईकरांवर अन्याय करीत असल्याची जोरदार चर्चा यानिमित्ताने मुंबईकरांमध्ये सुरु आहे.
३ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आलेले ९ टोलनाके
कळंबा, बार्शी, कोल्हापूर राधानगर, फुलेवाडी, रसनोबतवाडी, आर के नगर, शिये नाका, शिलोरी नाका, उचगाव नाका, शाहू नाका
वाहन खरेदी करताना शासन एक वेळचा वाहन कर वसूल करते. तो पैसा जातो कुठे. त्या पैसातून पूल- रस्त्याचे काम झाले पाहिजे. परतू तसे घडत नाही. शासनाने या पैअशाचा ताळेबंद प्रथम janate समोर ठेवावा. व नंतरच टोळ वसुलीचा पर्याय स्वीकारावा. विकास जनतेला हवा आहे. परतू टोळधाड यांचे खिसे भरून नव्हे. हे लक्षात घ्यावे.