गोविंदांचे अपघात टाळण्यासाठी यावर्षीपासून ठाण्यातील ‘संस्कृती’ प्रतिष्ठानने दहीहंडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे- उत्सवप्रिय ठाण्यात यंदा संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडीत थरांचा थरथराट पाहायला मिळणार नाही. सानपाडयातील बालगोविंदाच्या मृत्यूपाठोपाठ एका तरुण गोविंदाचा सरावादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटना दोन दिवसांत घडल्याने उत्सवापूर्वीच दु:खाचे सावट पसरले आहे. यापार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानचा ‘दहीकाला’ साधेपणाने करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. उत्सवातून जमा होणारी रक्कम रिक्षातून उडी मारल्याने अत्यवस्थ असलेल्या स्वप्नाली लाड या तरुणीच्या वैद्यकीय खर्चासाठी देण्याचे ठरवण्यात आले आहे.
मागील अनेक वर्षात ठाणे व मुंबईतील दहिकाला उत्सव सण म्हणून साजरा करण्यापेक्षा त्याला इव्हेंटचे स्वरूप आले आहे. लाखमोलाच्या बक्षीसांठी थरांच्या जिवघेण्या स्पर्धेमुळे अनेकांना कायमचे अपंगत्व अथवा मृत्यूही होतो. त्यातच सरकारने बालगोविंदांना दहीहंडी उत्सवात सहभागी करून घेऊ नये, असे आदेश दिले होते. त्यामुळे ‘संस्कृती प्रतिष्ठान’ने थरांची हंडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या उत्सवात लाखोंची बक्षीसे असणार नाहीत. थरांची जिवघेणी स्पर्धा न करण्याचा निर्णय सरनाईक यांनी घेतला आहे. मात्र प्रतिकात्मक दहीहंडी उभारून हा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. गोविंदा पथकांना सुरक्षा कवचाचे वाटप करणार असून सरकारने दहीहंडीचा समावेश साहसी क्रीडा प्रकारात करण्याची मागणी सरनाईक यांनी केली.
पोलिसांचे खास अभिनंदन
ठाणे पोलिसांनी दहीहंडी उत्सव साजरा करणा-या आयोजकांना आवाजाची मर्यादा आखून दिली आहे. या निर्णयाचे ‘अंतरंग ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थतर्फे स्वागत करण्यात आले आहे. पोलिसांच्या या निर्णयाने आशेचा किरण निर्माण झाला आहे,’ असे संस्थेचे सचिव अशोक पाटील यांनी ठाण्याचे सहपोलिस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांना लिहिलेल्या आभारपर पत्रात म्हटले आहे. दहीहंडीत कायदा पायदळी तुडवणा-या आयोजकांविरोधात पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे. अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.
[EPSB]
आणखी एका गोविंदाचा मृत्यू
जोगेश्वरी येथे आणखी एका गोविंदाचा सरावादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दहीहंडीचा सराव बेतला जिवावर
दहीहंडीचा सराव करताना रविवारी उंचावरून पडलेल्या सानपाडयातील बालगोविंदाचा उपचाराअभावी मृत्यू झाला.
[/EPSB]
प्रताप सरनाईक यांचे त्रिवार अभिनंदन त्यांनी घेतलेला निर्णय खूपच चांगला आहे आपल्याल उदंड आयुष्य लाभो