पश्चिम रेल्वे मार्गावरील फुकटय़ा प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अशा फुकटय़ांवर कारवाईचा फास आणखीनच आवळला आहे.
मुंबई – पश्चिम रेल्वे मार्गावरील फुकटय़ा प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अशा फुकटय़ांवर कारवाईचा फास आणखीनच आवळला आहे. जून महिन्यात पश्चिम रेल्वेने विशेष मोहीम राबवून १ लाख ७३ हजार फुकटय़ांवर कारवाई केली.
त्यांच्याकडून तब्बल ७ कोटी ८५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. गेल्या वर्षी जून महिन्यात केलेल्या कारवाईच्या तुलनेत यंदाची ३१.३९ टक्क्यांनी वाढ झाल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले. तसेच आरक्षित तिकिटांमध्ये हस्तांतरण करणा-या १७७ प्रवाशांना पकडण्यात आले.
त्यांच्याकडून २ लाख १४ हजार रुपये वसूल करण्यात आले. फुकट प्रवास करणारे १२८३ भिकारी आणि फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली. त्यातील ९६ जणांना तुरुंगाची हवा खावी लागली. १७५ विद्यार्थी आणि वयोवृद्धांना महिलांच्या डब्यातून प्रवास करताना पकडण्यात आले.
अंधा ” कानून ” म्हणतात ते ह्याला !!!