अभिनेता सैफ अली खान याला दिलेला पद्मश्री पुरस्कार मागे घेण्यासंदर्भात केंद्र सरकार विचार करत आहे.
नवी दिल्ली– अभिनेता सैफ अली खान याला दिलेला पद्मश्री पुरस्कार मागे घेण्यासंदर्भात केंद्र सरकार विचार करत आहे.
सैफवर मुंबईतील न्यायालयात खटला सुरु असून हा पुरस्कार मागे घ्यावा अशी तक्रार माहितीच्या अधिकाराचे कार्यकर्ते एस.सी.अग्रवाल यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे १४ मार्च रोजी केली होती. अभिनय क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सैफला २०१०मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.
एका हॉटेलमध्ये मारहाण केल्याप्रकरणी सैफवर न्यायालयात खटला सुरु आहे. त्यामुळे त्याला दिलेला पुरस्कार मागे घ्यावा अशी मागणी अग्रवाल यांनी केली होती. यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने पुरस्कार मागे घेण्यासंदर्भात विचार सुरु असल्याचे उत्तर अग्रवाल यांना दिले आहे.
सैफने फेब्रुवारी २०१२मध्ये मुंबईतल्या कुलाबा हॉटेलमध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका व्यावसाईकाला मारहाण केली होती. या प्रकरणी सैफसह अन्य दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र महानगर न्यायदंडधिका-यांनी त्या दोघांना मार्चमध्ये दोषमुक्त केले होते.
ह्या शेंम्बद्याचे कोणते कर्तृत्व पाहून श्रीमती ,पाटील बाइनि ह्याला “पद्मश्री “बहाल केले ???