नोबेल पारितोषिक हा जगातला सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
सी. व्ही. रामन हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचं पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रामन असं होतं. १९३० मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. शिवाय १९५४ मध्ये भारतरत्न आणि १९५७ मध्ये त्यांना लेनिन शांतता हा पुरस्कारही देण्यात आला होता. सी. व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे सात नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचं शिक्षण चेन्नईला झालं.
१९१७ ते १९३३ पर्यंत त्यांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅचरिंग) यासाठी ते ओळखले जाऊ लागले. चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.
२८ फेब्रुवारी : राष्ट्रीय विज्ञान दिन—–
डॉ. सी. व्ही. रमण यांनी त्यांचे विकिद्रणाबद्दलचे संशोधन (रामन परिणाम) १९२८ फेब्रुवारी २८ या दिवशी जाहीर केले . पुढे त्यांना त्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. म्हणून हा दिवस ’राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून पाळला जातो. १९८७. पहिला राष्ट्रीय विज्ञान दिन २८ फेब्रुवारी १९८७ रोजी साजरा करण्यात आला होता. सी. व्ही. रामन हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचं पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रामन असं होतं. १९३० मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. शिवाय १९५४ मध्ये भारतरत्न आणि १९५७ मध्ये त्यांना लेनिन शांतता हा पुरस्कारही देण्यात आला होता. सी. व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे सात नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचं शिक्षण चेन्नईला झालं. १९१७ ते १९३३ पर्यंत त्यांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅचरिंग) यासाठी ते ओळखले जाऊ लागले. चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.
रामन परिणाम: प्रकाशाचा किरणांमध्ये वातावरणातील विविध कणांमुळे किंवा मूलद्रव्यामुळे प्रकाशाच्या तरंगलांबीमध्ये बदल होतो. जेव्हा प्रकाशाचे किरण कणरहित पारदर्शक रासायनिक मूलद्रव्यामधून प्रवास करतो, त्या वेळी प्रकाशाच्या किरणांच्या दिशांमध्ये बदल होतो. त्यातील अधिक प्रमाणातील प्रकाशाची तरंगलांबी बदलत नाही. त्यातील काही किरणांची तरंगलांबी मूळ प्रकाश किरणापेक्षा वेगळी असते. याला रामन परिणाम या नावाने ओळखले जाते. प्रकाशकिरण अत्यंत सूक्ष्म कणांवर पडल्यानंतर सर्व दिशांना विखुरतो. याला प्रकाशाचे विकिरण म्हणतात. आकाश निळे दिसण्याचा संबंध सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करताना होणाऱ्या विकिरणाशी आहे. सर्वांत कमी तरंगलांबी असणाऱ्या निळ्या रंगाचे जास्त प्रमाणात विकिरण तयार होतात. विकिरण झालेला प्रकाश आपल्या डोळ्यांना दिसल्याने आकाश निळे भासते. पूर्वी असे मानले जाई, की आकाशाच्या निळ्या रंगाच्या परावर्तनामुळे समुद्राचे पाणी निळे दिसते. यावरही रामन यांनी पाणी आणि बर्फामधून होणाऱ्या प्रकाशाच्या विकिरणांचा अभ्यास करत समुद्राच्या निळाईचे कारण प्रकाशाचे पाण्याच्या रेणूमुळे होणारे विकिरणच असल्याचे दाखवून दिले. या संशोधनानंतर प्रकाशाच्या विकिरणाच्या आण्विक प्रक्रियेसंबंधी, रचनेविषयी भांडार खुले झाले. रासायनिक संयुगाची रचना ठरविण्यामध्ये रामन परिणामाची मोलाची मदत झाली. दोन हजारापेक्षा अधिक रासायनिक संयुगांची रचना निश्चित करणे शक्य झाले. पुढे लेसर किरणांचा शोध यातून लागला. पुढे दोन वर्षांत झालेली दहा हजारांपेक्षा अधिक संशोधने रामन परिणामावर अवलंबून होती. आपल्या रोजच्या जीवनातही सिग्नलच्या दिव्यांचे रंगासारख्या अनेक बाबी या प्रकाशाच्या विकिरणानुसार ठरवलेल्या असतात.
————————————————————————————————————-
विज्ञानप्रसारासाठी काय करता येईल? समाजात विज्ञानप्रसाराची आत्यंतिक गरज लक्षात घेता संबंधित उपक्रम विज्ञान दिनापुरते मर्यादित नसावेत. सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत वैज्ञानिक माहितीची मांडणी केली जावी. विशेषतः मराठी आणि हिंदीतूनही वैज्ञानिक माहिती दिली जावी. उपक्रमांमधील तोचतोपणा टाळून अधिक आकर्षक आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जावेत. सोशल मीडियाचाही आधार घ्यावा. संशोधन संस्थांनी वर्षातून एक विज्ञान दिन राबविण्यापेक्षा महिन्यातून एक असा विज्ञान दिन राबवला, तर अधिकाधिक विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत विज्ञान पोचू शकेल आणि विज्ञान दिनाची उद्दिष्टे खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकतील. प्रत्येक संशोधन संस्थेत स्वतंत्र विज्ञानप्रसार विभाग असावा. ज्याच्या माध्यमातून आपल्या विषयाचे ज्ञान सातत्याने सर्वसामान्यांपर्यंत पोचवता येईल.
—————————— विज्ञान दिनाच्या शुभेच्छा —————————————————
माणसातील माणुसकीचे आणि ईश्वरतेचे आपल्या साहित्यातून अखंड पूजन करणारा महान कवी… निराशेच्या अंधःकारात आशेच्या उल्का पेरून, तेजाचे स्फुलिंग चेताविणारा महान ऋत्विज… माणसाला ईश्वराच्या हवाली न करता माणसाच्याच मनात ईश्वरता जागविणारा एक महर्षी आर्य कवी…. मराठी सारस्वताला आपल्या प्रतिभेच्या आणि प्रज्ञेच्या मंगलमय किरणांचा आल्हाददायक प्रकाश देणारे महाकवी कुसुमाग्रज…..!!! मराठी साहित्यातील एक स्थितीकीर्ती लेखक म्हणून राजमान्य,लोकमान्य, आणि समीक्षकमान्य असलेले… वि.स. खांडेकरनंतरचे आधुनिक मराठी साहित्याचे एकमेव लेखक ,ज्यांनी विविधप्रकारी साहित्यनिर्मिती तर केलीच पण त्याचबरोबर वाचकांची, रसिकांची, समीक्षकांची आपुलकी मिळविली. त्यांच्या साहित्याने जसा रसिकांचा जिव्हाळा मिळविला तसच एक आदरणीय व्यक्ति म्हणून, समजाचा एक घटक म्हणून मराठी भाषेचा एक सच्चा लेखक म्हणूनही सन्मान मिळविला…. मराठी कवितेला आणि नाटकाला एक विशिष्ट वळण देणारे….. तसेच रसिकाच्या अभिरुचीला आपल्या साहित्यानेउंचावणारे….विष्णू वामन शिरवाडकर….!!!
एक श्रेष्ठ कवी म्हणून कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर जेवढे लोकप्रिय होते, तेवढेच ते नाटककार म्हणूनही लोकप्रिय होते. कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध असे विविध वाङ्मयप्रकार कौशल्याने हाताळून त्या सार्या प्रांतांत आपल्या प्रतिभेचा दरारा निर्माण करणारे एक उच्च प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणजे कुसुमाग्रज होत. त्यांच्या समग्र साहित्य निर्मितीत कवितेला अग्रपूजेचा मान तर आहेच पण लेखकांच्या इतर भूमिकांपेक्षा कुसुमाग्रज कवी म्हणून साहित्यिक विश्वात नाटक करा इतकेच ज्ञात आहेत. त्यांच्या साहित्यविश्वाचे आधारदेठ म्हणजे त्यांची कविवृत्ती आहे. विजयासाठी माझी कविता आधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही खंत तिजला मारावयाची अशी कुसुमाग्रजांच्या कवितेची वाटचाल आहे. त्यांना संस्था वं संस्थानिक अपेक्षित नव्हते. फक्त ‘ सदस्यत्व’ नसलेले तर परस्पर’संबंधावर’ आणि सामुहिक नात्यावर प्रतिष्ठानरूपी स्मारक त्यांना अभिप्रेत होते.सामान्यमाणूस हे कुसुमाग्रजांचे दैवत होते.