लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी लोकांना ‘अच्छे दिन’ आणू, असे आश्वासन दिले होते. विशेषत: महागाईने हैराण झालेल्या लोकांना त्यांनी सत्तेवर आल्यावर महागाई कमी करू व परदेशी बँकांत ठेवलेला काळा पैसा देशात आणू, अशी महत्त्वाची आश्वासने दिली होती; परंतु…
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी लोकांना ‘अच्छे दिन’ आणू, असे आश्वासन दिले होते. विशेषत: महागाईने हैराण झालेल्या लोकांना त्यांनी सत्तेवर आल्यावर महागाई कमी करू व परदेशी बँकांत ठेवलेला काळा पैसा देशात आणू, अशी महत्त्वाची आश्वासने दिली होती; परंतु मोदी सरकार केंद्रात सत्तेवर येऊन तीन महिने उलटले तरी महागाई कमी होण्याबाबत आणि काळा पैसा शोधून काढण्याबाबत अद्याप कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. उलट सरकारच्या निर्णयांमुळे महागाईचा भडका उडाला व लोकांना आपले ‘आपले अच्छे दिनां’चे स्वप्न भंगते आहे, असे वाटू लागले. सरकारच्या चाली पाहून लोकांना असेही वाटत आहे की, हे सरकार जनहिताचे निर्णय घेण्याऐवजी राजकीय डावपेचांवरच भर देत आहे. भाजप सरकारने सूत्रे हाती घेतल्याबरोबर पहिला मोर्चा पूर्वीच्या सरकारने नियुक्त केलेल्या विविध राज्यांच्या राज्यपालांकडे वळवला. सरकारने काही राज्यांच्या राज्यपालांना राजीनामे देण्यास सांगितले व बहुतेक राज्यांच्या राज्यपालांनी राजीनामे दिले. पश्चिम बंगालचे राज्यपाल एम. के. नारायणन, छत्तीसगडचे शेखर दत्त, नागालँडचे राज्यपाल अश्विनी कुमार, उत्तर प्रदेशचे बी. एल. जोशी यांनी राजीनामा दिला. गुजरातच्या राज्यपाल कमला बेनिवाल यांची मिझोरामला बदली करण्यात आली; पण नंतर पदाचा दुरुपयोग केल्याबद्दल त्यांना पदावरून हटवण्यात आले तसेच पोदुचेरीचे राज्यपाल वीरेंद्र कटारिया यांनाही हटवण्यात आले होते. महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मात्र राजीनामा देण्यास नकार दिला. महाराष्ट्रासारख्या मोठया व महत्त्वाच्या राज्याच्या राज्यपालाने राजीनामा देण्यास नकार दिल्याने सरकारची पंचाईत झाली व सरकारला काही काळ का होईना गप्प बसावे लागले. पण आपल्या नेहमीच्या ‘थंडा करके खाना’ या धोरणाप्रमाणे मोदी सरकारने काही दिवस वाट पाहिली. महागाई वाढल्याने संतप्त झालेली जनता, विरोधी पक्षांची निदर्शने व राज्यपालांवर संक्रांत आणल्याने झालेली टीका यामुळे सरकारने ‘बंडखोर’ राज्यपालांबाबतीत सबुरीचे धोरण स्वीकारले होते. पण उडालेला धुरळा खाली बसताच सरकारने राज्यपाल शंकरनारायणन यांना राज्यपाल पदावरून हटवण्याचा ‘अहिंसक’ उपाय योजला. सरकारने शंकरनारायणन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून मिझोरामच्या राज्यपालपदी झालेली बदली हा शंकरनारायणन यांचा अवमानच होता. हा अवमान ते सहन करणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामाच देणे पसंत केले. या संबंधात शंकरनारायणन यांनी कुणाचाही आणि कसलाही मुलाहिजा न बाळगता रोखठोक भूमिका घेतली. मिझोरामला केलेली बदली नाकारत त्यांनी राजीनामा थेट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठवून दिला. राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राचा अतिरिक्त कारभार गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. विशेष म्हणजे शंकरनारायणन हे नुसते राजीनामा देऊन स्वस्थ बसले नाहीत, तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या भूमिकेबद्दल आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, राज्यपाल पद हे राजकारणापलीकडील पद असते. राज्यपाल हा कुठल्याही पक्षाचा नसतो, तो राज्यघटनेचा घटक असतो. आपण आपल्या कारकिर्दीत कधीही राजकारण आणले नाही. मोदी सरकार सूडाचे राजकारण करते आहे की नाही, हे तुम्हीच ठरवा, असेही ते पत्रकारांना म्हणाले. साधारणत: कुठलाही राज्यपाल प्रस्थापित सरकारविरुद्ध बोलत नसतो. पण शंकरनारायणन यांनी मोदी सरकारवर पत्रकार परिषद घेऊन शरसंधान केले आहे. याचे एक कारण असे की, शंकरनारायणन यांची राज्यपालपदाची कारकीर्द स्वच्छ होती. त्यांनीही कधीही वादग्रस्त विधाने करून किंवा वर्तन करून विरोधकांना धारेवर धरले नाही. राजकारणात नव्या गोष्टी घडत असतात व जुन्या गोष्टींकडे बघायला कुणाला वेळ नसतो. पण आता लोकांच्या हे लक्षात आले आहे की, मोदी सरकारच्या जनहिताच्या आणि विकासाच्या योजना अमलात आणण्याऐवजी मोदी सरकार राजकीय डावपेच खेळण्यातच अधिक रस घेत आहे. आता या सरकारचे लक्ष महाराष्ट्र, हरयाणा या राज्यातील विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लवकरच होणार असल्याने मोदी सरकारला काँग्रेसने नेमलेले राज्यपाल शंकरनारायणन नकोच होते. निवडणुकीनंतर जर राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर अशा वेळी शंकरनारायणन महायुतीला अडचणीचे ठरू शकतात, या हिशेबाने शंकरनारायणन यांना हटवण्याचा डाव सरकारने टाकला. याचा अर्थ असाही होऊ शकतो की, लोकसभेच्या निवडणुकीतील यशानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीतही महायुतीला भरघोस यश मिळेल, अशी खात्री असलेल्या भाजप-शिवसनेने ‘आता आमचेच राज्य’ अशा गर्जना केल्या होत्या. मात्र, आता भाजपला आणि शिवसेनेला समजून चुकले आहे की, विधानसभेची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. विधानसभेच्या निवडणुकीची गणिते वेगळीच असतात. जागावाटप आणि मुख्यमंत्री कुणाचा हा वादही अद्याप सुटलेला नाही. महायुतीतील अन्य पक्षही जादा जागांसाठी ओढाताण करत आहेत. मोदी यांचा करिष्मा यावेळी चालेल, असेही नाही. अशा परिस्थितीत निर्वविाद यशाने हुलकावणी दिली तर मोक्याच्या क्षणी आपला राज्यपाल असलेला बरा म्हणूनच शंकरनारायणन यांना दूर करण्यात आले आहे. वास्तविक राज्यपालपद असावे की नसावे, याबाबत अधूनमधून वाद होत असतो. त्याबाबत तज्ज्ञांची मतेही व्यक्त होत असतात. पण ज्या अर्थी हे पद घटनेप्रमाणे अस्तित्वात आहे, त्या अर्थी या पदाचा मान राखला गेलाच पाहिजे, यात वाद नाही. पण मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून पूर्वीच्या राज्यपालांची गच्छंती सुरू झाली व ती शंकरनारायणन यांच्या राजीनाम्याने पूर्ण झाली आहे. राज्यपालांचा तर अवमान करण्यात आला आहेच, पण काँग्रेस मुख्यमंत्री असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमात अपमान झाला आहे. सोलापूरच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी व हुल्लडबाजी करून अपमान केला. त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार नाही, असे जाहीर केले आहे. हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनीही अशीच घोषणा केली आहे. राज्यपालांच्या अवमानाचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शंकरनारायणन अपमान प्रकरणावरून भाजपचा निषेध केला आहे. या चाली आणि सूडाचे राजकारण मोदी सरकारच्या एक दिवस अंगलट आल्यावाचून राहणार नाहीत.
[EPSB]
कुरापती सुरूच
भारताच्या सीमेवर गोळीबार करणे, घुसखोरी करणे, जवान वा नागरिकांवर गोळीबार करून त्यांची हत्या करणे, हा पाकिस्तानच्या हाडीमासी खिळलेला जुनाट रोग आहे. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी शांतता व सलोख्याची कितीही भाषा केली तरी त्यांची मूळ प्रवृत्ती व भारताविषयी असूया व वैरभाव कायम असल्याचा अनुभव भारताला वेळोवेळी येतो.
[/EPSB]
शंकर नारायणन यांनी सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या विरुद्ध चौकशीला नकार दिला होता आणि येथे संपादक महाशय लिहितात कि राज्यपाल स्व्त्छ होते . किती खोटे लिहिणार हो . खर काय ते लिहाना
Sriyut S,R,K, yans sadarcha Prahaar paper Eka namankit CONGRESSI netyachaa aahe ,tenva jaraa japunach liha ,mazi ek vinanti ,