Friday, May 3, 2024
Google search engine
Homeसंपादकीयअग्रलेखमोदींचे सुडाचे राजकारण

मोदींचे सुडाचे राजकारण

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी लोकांना ‘अच्छे दिन’ आणू, असे आश्वासन दिले होते. विशेषत: महागाईने हैराण झालेल्या लोकांना त्यांनी सत्तेवर आल्यावर महागाई कमी करू व परदेशी बँकांत ठेवलेला काळा पैसा देशात आणू, अशी महत्त्वाची आश्वासने दिली होती; परंतु…
Narendra Modi & Najeeb Jungलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी लोकांना ‘अच्छे दिन’ आणू, असे आश्वासन दिले होते. विशेषत: महागाईने हैराण झालेल्या लोकांना त्यांनी सत्तेवर आल्यावर महागाई कमी करू व परदेशी बँकांत ठेवलेला काळा पैसा देशात आणू, अशी महत्त्वाची आश्वासने दिली होती; परंतु मोदी सरकार केंद्रात सत्तेवर येऊन तीन महिने उलटले तरी महागाई कमी होण्याबाबत आणि काळा पैसा शोधून काढण्याबाबत अद्याप कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. उलट सरकारच्या निर्णयांमुळे महागाईचा भडका उडाला व लोकांना आपले ‘आपले अच्छे दिनां’चे स्वप्न भंगते आहे, असे वाटू लागले. सरकारच्या चाली पाहून लोकांना असेही वाटत आहे की, हे सरकार जनहिताचे निर्णय घेण्याऐवजी राजकीय डावपेचांवरच भर देत आहे. भाजप सरकारने सूत्रे हाती घेतल्याबरोबर पहिला मोर्चा पूर्वीच्या सरकारने नियुक्त केलेल्या विविध राज्यांच्या राज्यपालांकडे वळवला. सरकारने काही राज्यांच्या राज्यपालांना राजीनामे देण्यास सांगितले व बहुतेक राज्यांच्या राज्यपालांनी राजीनामे दिले. पश्चिम बंगालचे राज्यपाल एम. के. नारायणन, छत्तीसगडचे शेखर दत्त, नागालँडचे राज्यपाल अश्विनी कुमार, उत्तर प्रदेशचे बी. एल. जोशी यांनी राजीनामा दिला. गुजरातच्या राज्यपाल कमला बेनिवाल यांची मिझोरामला बदली करण्यात आली; पण नंतर पदाचा दुरुपयोग केल्याबद्दल त्यांना पदावरून हटवण्यात आले तसेच पोदुचेरीचे राज्यपाल वीरेंद्र कटारिया यांनाही हटवण्यात आले होते. महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मात्र राजीनामा देण्यास नकार दिला. महाराष्ट्रासारख्या मोठया व महत्त्वाच्या राज्याच्या राज्यपालाने राजीनामा देण्यास नकार दिल्याने सरकारची पंचाईत झाली व सरकारला काही काळ का होईना गप्प बसावे लागले. पण आपल्या नेहमीच्या ‘थंडा करके खाना’ या धोरणाप्रमाणे मोदी सरकारने काही दिवस वाट पाहिली. महागाई वाढल्याने संतप्त झालेली जनता, विरोधी पक्षांची निदर्शने व राज्यपालांवर संक्रांत आणल्याने झालेली टीका यामुळे सरकारने ‘बंडखोर’ राज्यपालांबाबतीत सबुरीचे धोरण स्वीकारले होते. पण उडालेला धुरळा खाली बसताच सरकारने राज्यपाल शंकरनारायणन यांना राज्यपाल पदावरून हटवण्याचा ‘अहिंसक’ उपाय योजला. सरकारने शंकरनारायणन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून मिझोरामच्या राज्यपालपदी झालेली बदली हा शंकरनारायणन यांचा अवमानच होता. हा अवमान ते सहन करणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामाच देणे पसंत केले. या संबंधात शंकरनारायणन यांनी कुणाचाही आणि कसलाही मुलाहिजा न बाळगता रोखठोक भूमिका घेतली. मिझोरामला केलेली बदली नाकारत त्यांनी राजीनामा थेट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठवून दिला. राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राचा अतिरिक्त कारभार गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. विशेष म्हणजे शंकरनारायणन हे नुसते राजीनामा देऊन स्वस्थ बसले नाहीत, तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या भूमिकेबद्दल आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, राज्यपाल पद हे राजकारणापलीकडील पद असते. राज्यपाल हा कुठल्याही पक्षाचा नसतो, तो राज्यघटनेचा घटक असतो. आपण आपल्या कारकिर्दीत कधीही राजकारण आणले नाही. मोदी सरकार सूडाचे राजकारण करते आहे की नाही, हे तुम्हीच ठरवा, असेही ते पत्रकारांना म्हणाले. साधारणत: कुठलाही राज्यपाल प्रस्थापित सरकारविरुद्ध बोलत नसतो. पण शंकरनारायणन यांनी मोदी सरकारवर पत्रकार परिषद घेऊन शरसंधान केले आहे. याचे एक कारण असे की, शंकरनारायणन यांची राज्यपालपदाची कारकीर्द स्वच्छ होती. त्यांनीही कधीही वादग्रस्त विधाने करून किंवा वर्तन करून विरोधकांना धारेवर धरले नाही. राजकारणात नव्या गोष्टी घडत असतात व जुन्या गोष्टींकडे बघायला कुणाला वेळ नसतो. पण आता लोकांच्या हे लक्षात आले आहे की, मोदी सरकारच्या जनहिताच्या आणि विकासाच्या योजना अमलात आणण्याऐवजी मोदी सरकार राजकीय डावपेच खेळण्यातच अधिक रस घेत आहे. आता या सरकारचे लक्ष महाराष्ट्र, हरयाणा या राज्यातील विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लवकरच होणार असल्याने मोदी सरकारला काँग्रेसने नेमलेले राज्यपाल शंकरनारायणन नकोच होते. निवडणुकीनंतर जर राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर अशा वेळी शंकरनारायणन महायुतीला अडचणीचे ठरू शकतात, या हिशेबाने शंकरनारायणन यांना हटवण्याचा डाव सरकारने टाकला. याचा अर्थ असाही होऊ शकतो की, लोकसभेच्या निवडणुकीतील यशानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीतही महायुतीला भरघोस यश मिळेल, अशी खात्री असलेल्या भाजप-शिवसनेने ‘आता आमचेच राज्य’ अशा गर्जना केल्या होत्या. मात्र, आता भाजपला आणि शिवसेनेला समजून चुकले आहे की, विधानसभेची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. विधानसभेच्या निवडणुकीची गणिते वेगळीच असतात. जागावाटप आणि मुख्यमंत्री कुणाचा हा वादही अद्याप सुटलेला नाही. महायुतीतील अन्य पक्षही जादा जागांसाठी ओढाताण करत आहेत. मोदी यांचा करिष्मा यावेळी चालेल, असेही नाही. अशा परिस्थितीत निर्वविाद यशाने हुलकावणी दिली तर मोक्याच्या क्षणी आपला राज्यपाल असलेला बरा म्हणूनच शंकरनारायणन यांना दूर करण्यात आले आहे. वास्तविक राज्यपालपद असावे की नसावे, याबाबत अधूनमधून वाद होत असतो. त्याबाबत तज्ज्ञांची मतेही व्यक्त होत असतात. पण ज्या अर्थी हे पद घटनेप्रमाणे अस्तित्वात आहे, त्या अर्थी या पदाचा मान राखला गेलाच पाहिजे, यात वाद नाही. पण मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून पूर्वीच्या राज्यपालांची गच्छंती सुरू झाली व ती शंकरनारायणन यांच्या राजीनाम्याने पूर्ण झाली आहे. राज्यपालांचा तर अवमान करण्यात आला आहेच, पण काँग्रेस मुख्यमंत्री असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमात अपमान झाला आहे. सोलापूरच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी व हुल्लडबाजी करून अपमान केला. त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार नाही, असे जाहीर केले आहे. हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनीही अशीच घोषणा केली आहे. राज्यपालांच्या अवमानाचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शंकरनारायणन अपमान प्रकरणावरून भाजपचा निषेध केला आहे. या चाली आणि सूडाचे राजकारण मोदी सरकारच्या एक दिवस अंगलट आल्यावाचून राहणार नाहीत.

[EPSB]

कुरापती सुरूच

Firing by Pakistan's side near Jammuभारताच्या सीमेवर गोळीबार करणे, घुसखोरी करणे, जवान वा नागरिकांवर गोळीबार करून त्यांची हत्या करणे, हा पाकिस्तानच्या हाडीमासी खिळलेला जुनाट रोग आहे. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी शांतता व सलोख्याची कितीही भाषा केली तरी त्यांची मूळ प्रवृत्ती व भारताविषयी असूया व वैरभाव कायम असल्याचा अनुभव भारताला वेळोवेळी येतो.

[/EPSB]

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. शंकर नारायणन यांनी सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या विरुद्ध चौकशीला नकार दिला होता आणि येथे संपादक महाशय लिहितात कि राज्यपाल स्व्त्छ होते . किती खोटे लिहिणार हो . खर काय ते लिहाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट