Friday, May 3, 2024
Google search engine
Homeप्रतिबिंबटोल ‘फ्री’ची टोलवा-टोलवी

टोल ‘फ्री’ची टोलवा-टोलवी

राज्य सरकार केवळ कोकणवासीयांना गृहीत धरते असेच वारंवार दिसत आहे. कोकणात जाण्यासाठी टोल फ्रीची घोषणा केली गेली. प्रत्यक्षात मात्र टोम माफी नव्हतीच. केवळ कोकणवासीयांची दिशाभूल करण्यासाठीच जाहीर केलेला हा निर्णय होता. गणेशोत्सवाचे पाच दिवस गेल्यानंतर या टोल फ्री विषयासंदर्भात कोणी फार चर्चाही करणार नाही असे वाटल्यानेच सत्ताधा-यांनी याकडे हवे तसे लक्ष दिलेले नाही.

kharghar toll nakaअसंख्य कोकणवासीय मुंबईकर गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रतिवर्षी कोकणात येत असतात. यावर्षीही हे कोकणवासीय मुंबईकर कोकणामध्ये आपल्या गावी यायला उत्सुक होते. परंतु गेल्याच महिन्यात मुंबई-गोवा महामार्गावरील महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळला. यातच भर म्हणून की काय, राज्य आणि केंद्र सरकारने दुर्लक्ष केलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था झाली.

पनवेल ते बांदा या मार्गामध्ये जागोजागी झालेली रस्त्याची चाळण. त्यामुळे रस्ता आणि खड्डा शोधणे वाहनचालकाला अवघड झाले. मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवापूर्वी चार दिवस अगोदर आणि नंतर महामार्गावरी वाहतूक कोंडी होणार असल्याने कोकणवासीय मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार नाही, याची खात्री असल्यानेच काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी गेल्याच महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन एक सविस्तर स्वरूपाचे निवेदनही सादर केले.

या निवेदनामध्ये मुंबईकर कोकणवासीयांना गावाकडचा प्रवास कसा त्रासदायक ठरू शकतो यासंबंधीची माहितीही दिली. यासाठी मुंबईतून कोकणात जाणा-या मुंबईकर वाहनचालकांकडून मुंबई-पुणे-कोल्हापूर या मार्गावरील टोल नाक्यावर टोल घेतला जाऊ नये. राज्य सरकारने टोल फ्रीची घोषणा करावी अशा प्रकारची आग्रही मागणी आ. नितेश राणे यांनी केली.

यानंतर १५ दिवस वाट पाहून अखेर आ. राणे यांनी राज्य सरकार टोल फ्रीची घोषणा करणार नसेल तर स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणा-या मुंबईकरांना टोल न देता सोडण्यात येईल. अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली. यानंतर सिंधुदुर्गचे तात्काळ पालकमंत्री आणि राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणा-या वाहनचालकांकडून मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गावर टोल घेतला जाणार नाही, असे जाहीर केले आणि केवळ श्रेय मिळण्यासाठी जाहीर केलेला हा निर्णय मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री यांनी डोळे वटारताच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अवघ्या दोन तासांत मागे घेतला.

टोल फ्री संबंधी मी काही बोललोच नाही, तसे मला म्हणायचे नव्हते अशी सारवासारव केली. यानंतर स्वाभिमान संघटनेच्या वतीने कोकण स्टिकर लावून टोल नाक्यांवरून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या गाडया सोडण्यात आल्या. हे घडल्यानंतर राज्य सरकारने तीन दिवसांसाठीची टोल माफी जाहीर केली. त्यासाठी सुरुवातीला आरटीओ कार्यालयाकडून पासेस दिले जाणार, असे जाहीर केले. त्यातच संबंधित पोलीस स्टेशनकडूनही पासेस दिले जातील, असे जाहीर झाले.

सुरुवातीलाच आरटीओ कार्यालयीन अधिका-यांनी या संबंधीचे आदेश आमच्यापर्यंत आले नाहीत, असे सांगितले. त्यामुळे साहजिकच मुंबईतील कोकणवासीयांमध्ये टोल फ्रीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली. यात वाहनचालकांनी कागदपत्रांची नोंदणी करून कोकणला गाडया मार्गस्थ केल्या.

परंतु मुंबई-पुणे-कोल्हापूर या मार्गातील दोन ठिकाणी पासेस चालत नाहीत. टोल भरावा लागेल अशी दमदाटीची भाषा करत टोल भरून घेतल्यानंतरच गाडया कोकणात मार्गस्थ झाल्या. कोकणात टोल भरून पोहचलेल्या कोकणवासीयांनी यासंबंधी प्रचंड नाराजी व्यक्त केली. टोल फ्रीची घोषणा करणा-या राज्य सरकारने पुणे-कोल्हापूर मार्गावरील या दोन्ही टोल नाक्यांवर ज्या कंत्राटदार कंपन्या आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारकडून टोल फ्रीची घोषणा किती तकलादू आणि फसवी होती हे या निमित्ताने समोर आले आहे. मुंबईकर कोकणवासीयांनी राज्य सरकारच्या या दुटप्पी भूमिकेचा सोशल मीडियाद्वारे चांगलाच समाचार घेतला आहे.

एकीकडे राज्य सरकारकडून टोल फ्रीची घोषणा केली गेली. प्रत्यक्षात मात्र टोल फ्री नव्हताच. केवळ कोकणवासीयांची फसवणूक करण्यासाठीच जाहीर केलेला हा निर्णय होता. गणेशोत्सवाचे पाच दिवस गेल्यानंतर या टोल फ्री विषयासंदर्भात कुणी काही फार चर्चा करणार नाही असे वाटल्यानेच सत्ताधा-यांनी याकडे हवे तसे लक्ष दिलेले नाही.

राज्य सरकारने खरोखरच कोकणवासीयांचा विचार करून टोल माफीची घोषणा केली असेल तर उद्दामपणे वागणा-या आणि सरकारचे आदेश पायदळी तुडवणा-या त्या दोन टोल नाक्यांवरील टोल गोळा करणा-या कंपन्यांवर राज्य सरकारने कारवाई करणे आवश्यक आहे. टोल वसुलीचे हे प्रकार घडत असतानाही संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडून किंवा पालकमंत्र्यांकडून यासंबंधी कोणतेही भाष्य केले गेले नाही.

यामुळे टोल नाक्यांवरील कंत्राटदार कंपनी आणि राज्य सरकारमधील मंत्री यांच्या ‘समझोत्याने’च हा वसुलीचा फंडा राबवला गेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणे-कोल्हापूर मार्गावरील सातारानजीकच्या किणी येथील टोल नाक्यावर मुंबईकडून येणा-या आणि सरकारकडून देण्यात आलेला पास असतानाही टोल भरल्याशिवाय वाहनांना पुढे जाऊ दिले जात नव्हते.

तशा स्वरूपाची तक्रार कोल्हापूर पोलीस अधीक्षकांकडे लेखी स्वरूपातही मुंबईहून कोकणात आलेल्या गणेशभक्तांनी केली आहे. यामुळे ही केवळ सोशल मीडियावरची चर्चा नव्हे तर मुंबईतून कोकणात स्वत:ची वाहने घेऊन आलेल्या असंख्य कोकणवासीयांना आलेला तो अनुभव आहे. यामुळे राज्य सरकार आणि त्यातील सरकारमधील कोकणातील मंत्री आता कोणती भूमिका घेणार ते दिसेलच.

शेतकरी हैराण..!

कोकणात एकीकडे फळबागायती विकसित करण्याकडे ओढा असतानाही आजही गावोगावी शेतकरी भातशेती लावतात. खरे तर कोकणात केली जाणारी ही भातशेती फार किफायतशीर असते असे नाही; परंतु वडिलोपार्जित असलेली शेती पडीक राहील त्यामुळे परवडत नसतानाही भातशेती केली जाते. जमिनीची मशागत, बियाण्यांची पेरणी आणि त्यानंतर लावणी या सर्व भातशेती लागवडीच्या प्रक्रियेमध्ये मोठया प्रमाणावर खर्चही होतो.

गावात असणा-या शेतकरी कुटुंबालाही हे सारे अवघड झाले आहे. अशा स्थितीत भातशेती केल्याचे मानसिक समाधान लाभते. केवळ यासाठीच गावोगावी आजही न परवडणारी ही भातशेती शेतकरी करतात. यावर्षी भातशेतीवर ‘करपा’ नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि चांगल्या पावसाने बहरलेल्या भातशेतीचे या रोगाने मोठे नुकसान केले आहे.
कोकणातील भातशेतीची ही दुरवस्था झालेली असताना आणि कोकणातील शेतकरी या करपाच्या प्रादुर्भावाने होणा-या नुकसानीने चिंताक्रांत असतानाही राज्य सरकारचा कृषी विभाग मात्र काही करताना दिसत नाही.

सर्वसाधारणपणे गेली अनेक वर्षे करपाचा प्रादुर्भाव भातशेतीला होतो. परंतु कृषी विभाग किंवा कोकण कृषी विद्यापीठाचा संशोधन विभागही यासंबंधी काही संशोधन करताना
दिसत नाही.

शेतकरी स्वत:च गेल्या काही वर्षातील जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारे भातशेती वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. नव्याने विकसित केलेल्या काही भातबिण्यांच्या जातींची मोठया प्रमाणावर शेतकरी पेरणी करतात. नव्याने विकसित झालेल्या या भातबियाण्याला देखील नवनवीन रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. हे रोखण्यासाठी आवश्यक असणा-या उपाययोजनेसंबंधी कृषी विभागाकडून शेतक-यांना मार्गदर्शन होणे अपेक्षित असते.

परंतु राज्य सरकारचा कृषी विभाग नालाबंडिंग बंधारे बांधण्यातच धन्यता मानतो. त्यापलीकडे जाऊन या विभागाचे काही काम असते, याची जाणीवही या विभागात काम करणा-या अधिकारी, कर्मचा-यांना नसावी. यावर्षीही या करपाच्या झालेल्या प्रादुर्भावाने भातशेतीचे चांगले पीक येईल की नाही याच चिंतेत शेतकरी आहे.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. महाराष्ट्राचा TOLL TAX हा एक मोठा झोल आहे. गुजरातमध्ये एक बाई टोलनाकायेचे TOLL TAX काढून आपले वेर्च्यासवे दाखवून देते आणि आपल्ये महाराष्ट्रामध्ये CM आणि त्यांचे पुढारी अजून टोलवाटोलवी करतात.
    आमदार नारायण राणे साहेब आत्ता रस्त्यावर उतरायला लागणार.
    कोकणातल्या रस्त्यांची अवस्था फार खराब झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट