ग्रामीण भागातील महिला आणि त्यांच्या समुदायांना इंटरनेट साक्षरतेचे धडे देण्यासाठी टाटा ट्रस्ट आणि गुगल इंडिया यांनी ‘इंटरनेट साथी’ या नावाचा खास उपक्रम हाती घेतला आहे.
मुंबई- ग्रामीण भागातील महिला आणि त्यांच्या समुदायांना इंटरनेट साक्षरतेचे धडे देण्यासाठी टाटा ट्रस्ट आणि गुगल इंडिया यांनी ‘इंटरनेट साथी’ या नावाचा खास उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा शुक्रवारी टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या उपस्थितीत करण्यात आली. गुजरात, राजस्थान आणि झारखंड येथे या उपक्रमाला सुरुवात होऊन पुढे देशभरात तो राबवण्यात येणार आहे. आठ महिन्यांत ४,८०० खेडय़ांत पोहोचून ५ लाख महिलांना इंटरनेटचे धडे दिले जाणार आहेत.
या उपक्रमाच्या घोषणेवेळी टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. डिजिटली कनेक्टेड भारतामुळे जगाशी जोडले जाणार असल्याचे नागरिकांमध्ये मोठी शक्ती निर्माण होणार आहे. सरकारच्या वतीने सुरू झालेल्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमामुळे भारत जगामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘इंटरनेट साथी’विषयी बोलताना इंटरनेटच्या माध्यमातून भारताला साक्षर करण्यास मदत होईल. देशात ज्या महिलांना औपचारिक जीवन जगता येत नाही त्यांच्या आयुष्याला यामुळे कलाटणी मिळेल. त्यांच्या छोटय़ा-मोठय़ा व्यवसायांना यामुळे देशाच्या कानाकोप-यात नेण्यात हातभार लागेल, असे टाटा म्हणाले. लहानपणीच्या आठवणी जागवताना त्यांनी फोनचे कनेक्शन मिळवण्यासाठी लोकांना १० वष्रे लागत होती. मात्र खोलवर झालेल्या फोनच्या प्रसारामुळेच आज लोकांचे जीवन सुसह्य झाले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून येत्या १८ महिन्यांमध्ये ४५०० गावांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या कालावधीत पाच लाख महिलांना इंटरनेट साक्षर करण्याचे लक्ष्य आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना इंटरनेटचा उपयोग आणि लाभ यावरील मूलभूत प्रशिक्षण इंटरनेट सायकल कार्ट्सच्या माध्यमातून दिले जाणार आहे.
शहरी महिलांच्या तुलनेत ग्रामीण महिला इंटरनेट साक्षरतेच्या बाबतीत खूपच मागे आहेत. ग्रामीण भागात सध्या केवळ १२ टक्केच महिलांना इंटरनेट अवगत असल्याचे गुगलचे आग्नेय आशिया आणि भारतातील व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन म्हणाले.
जिओ टाटा गुगल !