हृतिक आणि कंगना राणावत यांच्यातील जवळीक सध्या वाढत असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
हृतिक रोशन आणि नर्गिस फाखरी डिनरला गेल्याची, त्यांच्यात काही असल्याची चर्चा बरीच रंगली होती. मात्र नंतर कळलं की हृतिक रोशनचा खास मित्र उदय चोपडा आणि नर्गिसमध्ये काही गैरसमज झाले होते. ते गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न हृतिक करत होता. मग काय सगळ्यांचीच भ्रमनिराशा झाली.
त्यानंतर हृतिकला एका महिलेबरोबर चित्रपटगृहातून बाहेर पडतानाही अनेकांनी पाहिले होते. या वेळी ही महिला कोण आहे, याचा शोध घेण्याचा ब-याच जणांनी प्रयत्न केला. अखेर त्या महिलेचा शोध लागला. ती महिला हृतिकच्या मित्राची बायको होती जी हृतिकला भेटायला आली होती. त्यामुळे या बातमीलाही तिथेच पूर्णविराम लागला.
आता नवीन चर्चेला उधाण आले आहे. हृतिक आणि कंगना राणावत यांच्यातील जवळीक सध्या वाढत असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. काही जणांचं तर असंही म्हणणं आहे की, हे दोघे त्यांच्या नात्याला घेऊन खूपच गंभीर आहेत. हृतिकच्या वडिलांना अर्थात राकेश रोशन यांनाही असं वाटतंय की आता हृतिकने पुन्हा एकदा लग्नाबाबत विचार करायला हवा. अर्थात,याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनी हृतिकलाच दिला आहे.
त्यामुळे हृतिक काय निर्णय घेणार याकडे राकेश रोशनसह सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हृतिक आणि कंगनाची ओळख तशी जुनीच आहे. ‘काईट्स’मध्ये या दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हृतिक बारबरा मोरीकडे आकर्षित झाला होता. याच कारणामुळे हृतिक आणि सुझानमध्ये दुरावा निर्माण झाला होता आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कंगना नाराज झाली होती.
अर्थात कंगनाचं नाराज होण्याचं कारण वेगळंच होतं. या चित्रपटातील तिची भूमिका इतकी कमी केली की, या चित्रपटात तिचा उल्लेख पाहुणे कलाकार म्हणून झाला. कंगनाच्या बाबतीत झालेल्या या अन्यायाची जबाबदारी हृतिकने स्वत: घेतली आणि ‘क्रिश -३’ मध्ये त्याने कंगनाला खलनायिकेची भूमिका दिली. कंगनानेही जुन्या गोष्टी विसरून ही भूमिका स्वीकारली आणि तेव्हापासून त्यांच्यात पुन्हा मैत्री झाली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हृतिक आणि कंगना मागील काही दिवसांपासून सतत एकत्र दिसत आहेत. दोघांनाही सध्या एक-दुस-याची साथ आवडत असल्याने ते बराच वेळ एकत्र घालवत आहेत. हे दोघे एकमेकांना किती दिवस साथ देणार हे येत्या काळात कळेलच.
बर आहे बुवा ! लग्नाची पत्रिका आम्हाला पाठवायला विसरू नकोस रे बाबा !