घराघरांत लोकप्रिय झालेल्या ‘श्री’ आणि ‘जान्हवी’ अर्थात शशांक आणि तेजश्री यांनी प्रत्यक्षातही काडीमोड घ्यायचा निर्णय घेतला आहे.
पुणे- झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय मालिकेतील जोडी श्री आणि जान्हवी म्हणजेच शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी ख-या आयुष्यातही परस्परापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
मालिकेप्रमाणे ख-याखु-या आयुष्यातही दोघांचा विवाह घटस्फोटाच्या उंबरठयापर्यंत येऊन पोहोचला आहे.
शंशाकने पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. मागच्याचवर्षी आठ फेब्रुवारी २०१४ रोजी पुण्यात दोघे विवाहबध्द झाले होते.
या दोघांनी विवाहबध्द होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असल्याने प्रसिध्दीमाध्यमांमध्ये त्यांचा विवाह चर्चेचा विषय ठरला होता. मालिकेतील त्यांची परस्पराबद्दलची ओढ, समजूतदारपणा प्रेमळ नाते पाहून प्रत्यक्षात त्यांनी विवाहबध्द होण्याचा निर्णय घेतला तेव्हा या मालिकेवर प्रेम करणा-या प्रेक्षकांनी त्यांना मनापासून आर्शिवाद दिले होते.
मात्र हा विवाह फार काळ टिकू शकला नाही. सध्या मालिकेमध्येही दोघांच्या घटस्फोट ट्रॅक सुरु आहे. त्यामुळे सुरुवातीला प्रेक्षकांना हा प्रसिध्दीचा स्टंट वाटला होता. मात्र हा स्टंट नसून, ख-याखु-या आयुष्यातही ही जोडी विभक्त होणार आहे.
नका करू रे असे…