स्त्रियांनी अन्याय सहन न करता अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. आपल्यातील न्यूनगंड काढून आत्मसन्मानाने जगायला शिकले पाहिजे, असे ठाम मत ‘सर्वहारा जन आंदोलना’च्या नेत्या उल्का महाजन यांनी नोंदवले.
अलिबाग- स्त्रियांनी अन्याय सहन न करता अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. आपल्यातील न्यूनगंड काढून आत्मसन्मानाने जगायला शिकले पाहिजे, असे ठाम मत ‘सर्वहारा जन आंदोलना’च्या नेत्या उल्का महाजन यांनी नोंदवले.
अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे पी. एन. पी. एज्युकेशन सोसायटी मुख्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘तेजस्विनी पुरस्कार’ वितरण समारंभात प्रमुख वक्त्या म्हणून उल्का महाजन बोलत होत्या. महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते, पी. एन. पी. एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सुनीता गायकवाड, वीणा शेटे, अश्विनी वास्कर, ललिता बंगेरा, लतिका गुरव यांना या वेळी ‘तेजस्विनी पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.
उल्का महाजन म्हणाल्या की, ‘मुलगी नको’ या भूमिकेमुळे केवळ त्या कुटुंबावर परिणाम होत नाही तर समजावर त्याचा विपरित परिणाम होतो. समाजाचा समतोल बिघडतो. याचा विचार महिलांनी करावा. काही लोकांतील विकृतीमुळे महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. ही विकृती घालवण्यासाठी महिलांनी आपल्या मुलांत मुलगा व मुलगी असा भेद न करता त्यांना समान वागणूक द्यावी. मुलांवर चांगले संस्कार करावेत. स्त्री सक्षम झाली तर माणुसकी सक्षम होईल.
महिलांनी आपल्यातील क्षमता ओळखून काम केले पाहिजे. विकृतीवर संस्कृतीने मात केली पाहिजे, असे मत महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी व्यक्त केले. महिलांनी स्वत:कडे सहानुभूतीने पाहू नये. सहानुभूती महिलांना मागे नेते. आपण जसा विचार करतो तसे घडते. त्यामुळे महिलांनी सकारात्मक विचार करावा, असे पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील म्हणाल्या. पुरस्कार विजेत्या महिलांनी मनोगत व्यक्त केले. अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रफुल्ल पवार यांनी सूत्रसंचालन केले. हर्षद कशाळकर यांनी आभार मानले.
‘सर्वहारा जन आंदोलना’च्या नेत्या उल्का महाजन यांनी स्त्रियांनी अन्याय सहन न करता अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे असे ठाम मत नोंदवले,पण समाजात कित्येक अशा स्त्रिया आहेत ज्यांचे आपल्या नवऱ्याशी पटत नसेल, तर त्या दुसऱ्याच्या नवऱ्यास किंवा तरुण मुलाला अडकवण्याच्या प्रयत्नात असतात. आपल्या नवऱ्याची कमजोरी न दाखवता दुसऱ्या स्त्रीच्या संसारात ढवळाढवळ करून त्यांचा सुखी संसार उध्वस्त करण्याच्या प्रयत्नात असतात. अशा स्त्रियांची ओळख उल्का महाजन यांच्यासारख्या नेत्यांना कशी पटेल? जर ती व्यक्ती आपल्या जाळ्यात अडकली नाही तर मुद्दामून पोलिस चौकीत त्या व्यक्तीबद्दल खोट्या तक्रारी करणे, त्याचा पैसा खोट्या तक्रारी करून उकळणे, असे प्रकार कित्येक ठिकाणी चालतात, तोंडावर आम्ही चांगल्या अशा दर्शवणाऱ्या कित्येक स्त्रिया या समाजात वावरत आहेत. स्त्री हि अबला नसून सबला आहे हे प्रतिबिंब कित्येक वेळेस दर्शविण्यात आले आणि ह्याची सुरुवात इ.स. १६००पासूनच “सावित्री बाई”सारख्या स्त्रीने केली.ज्यांनी स्त्रियांना भरपूर मानाची पदवी दिली.‘सर्वहारा जन आंदोलना’ या संस्थेमुळे तरी अशा स्त्रिया सुधारतील अशी पुरुष मंडळी आशा बाळगतील.