Friday, May 3, 2024
Google search engine

चढणीचे मासे

चढणीच्या माशांमध्ये चवीला सर्वात मस्त म्हणजे मळये, त्यानंतर शेंगटी, मग खवळा, डेकळा, दांडकी, खडस, वाळव, काडी, करजुवा, झिंगू, सुळे.. तशी प्रत्येक भागात माशांची नावे वेगळी आणि चवही वेगळी.. अशी मासेमारी करणा-या तरु णांची-ज्येष्ठांची टोळकी ग्रुप करून येतात, मासेमारी करतात. वाटे पाडतात. काही वाटे घरी पोहोचतात तर काही वाटे पार्टीला वापरले जातात. ब-याच वेळा नदीकिनारीच किंवा शेतातच या पाटर्य़ा रंगतात.रिमझिमत्या पावसात गरमागरम माशाचे तिखले अहाहा..ऽऽ

fishपावसाची रिपरिप वाढू लागताच शेतकऱ्यांच्या जशी दैनंदिनी बदलू लागते तसा त्यांचा आहारही बदलतो. सहयाद्रीतील धबधबे वाहू लागतात. सहयाद्री ते सागर अशी ओहोळांची साखळी एकदा का पूर्ण झाली की वसुंधरेचे रूपच बदलून जाते. ख-या अर्थाने पावसाळयाला गती येते. ओहोळ खळाळू लागले की, एरव्ही उन्हाळयात पाण्यासाठी तहानलेल्या नदीतील कोंडी भरून वाहू लागतात. याच कोंडींमध्ये असलेले मासे आता नव्या जगात जाण्यासाठी सैरभैर धावू लागतात. जणू काही आता येथे राहणेच नको. यापेक्षाही चांगले तळे पाहूया म्हणून त्यांची शर्यत सुरू होते. खळाळत्या धबधब्यांच्या विरुद्ध दिशेने ते प्रवास करू लागतात. ही माशांची चढाओढ पाहणे म्हणजेच एक दिव्य असते.

साखळी सुटली की पुढचे दहा ते पंधरा दिवस चढणीच्या माशांचा उडणारा फर्रा आणि झालेली धावपळ, अंगावर रिमझिमणारा पाऊस आणि हातात एखादा दांडा घेऊन माशाला पकडण्यासाठी कसरत करणारी टोळी..सध्या मुलखातल्या गावांमध्ये दिसणारे हे दृश्य.

पावसाला सुरु वात होताच सुकलेले ओहळ, आटलेल्या नद्यांच्या कोंडी भरभरून वाहू लागल्या की एवढयाशा डबक्यात राहिलेले मासे मुक्त होतात. पाऊस कोसळतच असतो. प्रवाह वाढत जातो आणि माशांची झुंबड धावू लागते, पाण्यावर उडू लागते आणि या उडणा-या माशांना, सैरावैरा धावणा-या माशांना पकडण्यासाठी सर्वांची एकच धावपळ. अंधार पडल्यानंतर तर माशांची लगबग अधिकच वाढते. मग बत्तीवरची मासेमारी सुरू होते. अचानक प्रकाश पाहून मासे थबकतात आणि खवय्यांची शिकार होतात.

पाऊस धुवाधार बरसू लागताच माशांची चढाओढ लागते. त्यांना नव्या जगात जायची घाई असते आणि सैरभैर झालेल्या माशांना कधी एकदा पकडतो असे शेतक-याला झालेले असते. माशांची आणि शेतकरी या दोघांच्या पळापळीत मोठी कसरत रंगते. एरव्ही उन्हाळयात कोंडीच्या तळाशी जाऊन बसलेले हे गोडया पाण्यातील मासे पावसाबरोबर थव्याने पुढे सरकू लागतात आणि या माशांना पकडण्यासाठी सारेच जण सरसावतात. हरतऱ्हेची शस्त्रे बाहेर पडतात. ही शस्त्र म्हणजे या भागाची एक वेगळी ओळख आहे. डोम, आके, पागरे, हूक, भरीव बांबूच्या काठय़ांनी तयार केलेली गरी. आके (गोल छोटेखानी जाळयाचा प्रकार) पागरे (छोटे जाळे, याला लोखंडी किंवा जस्ताचे तुकडे वजनासाठी जोडलेले असतात.) हे साहित्य बाहेर पडते. गढूळ पाण्यामध्ये माशांच्या हालचाली टिपत त्यांना पकडण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न होतात. काही मंडळी नदीच्या मुख्य मोक्याच्या जागी ‘किव’ही घालतात. मासे मारण्यासाठीचा लाकडी सापळा तयार करतात. या साखळी लागण्याच्या दिवसात चढणीचे मासे मारण्यासाठी हौसे, नवसे तयार असतात. चढणीच्या माशांची मज्जा जेवढी सांगावी तेवढी थोडीच. माशांच्या कसरतीप्रमाणे त्यांच्या कलेने घेत अलगद पिशवीत भरणारे अनेक महाभागांची कसरत पाहण्यासारखीच असते.

चढणीच्या माशांमध्ये चवीला सर्वात मस्त म्हणजे मळये, त्यानंतर शेंगटी, मग खवळा, डेकळा, दांडकी, खडस, वाळव, काडी, करजुवा, झिंगू, सुळे. तशी प्रत्येक भागात माशांची नावे वेगळी आणि चवही वेगळया.. अशी मासेमारी करणा-या तरु णांची-म्हाताऱ्यांची टोळकी ग्रुप करून येतात, मासेमारी करतात. वाटे पाडतात. काही वाटे घरी पोहोचतात तर काही वाटे पार्टीला वापरले जातात. ब-याच वेळा नदीकिनारीच किंवा शेतातच या पाटर्य़ा रंगतात. रिमझिमत्या पावसात गरमागरम नुसते मीठ-मसाल्यात परतलेले मासे खाणे म्हणजे अहाहा.ऽऽ झणझणीत याचा अर्थ येथेच समजतो..

रात्री रॉकेलचे दिवे पेटवून नदीच्या किना-याने फिरत असताना सैरावैरा धावणारे मासे, कुल्र्याना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. हा हंगाम या माशांचा विणीचा हंगाम. चढणीचे मासे प्रवाहाच्या विरोधात पोहून जातात आणि नेमक्या ठिकाणी अंडी घालतात. हा त्यांच्या प्रजोत्पादनाचा फंडा असतो. नद्यांच्या पाण्याला यावेळी वेग असतो, परंतु चढणीच्या या माशांचा पिले जन्माला घालण्याचा आवेग त्याहीपेक्षा अधिक असतो. त्यामुळे ते प्रवाहाविरु द्ध पोहतात, टिकतात आणि त्यांचा जन्म सफल करतात. प्रत्येक मासा आपली पिलावळ वाढविण्याच्या इच्छेखातर हजारो अंडी कुशीत घेऊन पुढचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करत असतात. एकदा का कोंड सोडली की आगीतून फुफाटयातच असा त्यांचा प्रवास सुरू होतो. नदीचे पाणी पुरामुळे आजूबाजूच्या शेतात घुसते, हे मासे मग त्या शेतात मिळणारे किडे, कीटक, मुंगी यावर ताव मारतात. ज्याप्रमाणे पावसाळयात

पाऊस-पार्टीचे वेध

तरुणाईला लागतात तशीच त्या माशांचीही ती एक प्रकारची पार्टी असते, पण एकदा शेतात किंवा पाण्याबाहेर पडल्यानंतर या माशांना प्रवाहात परतणे अवघड होते आणि मग त्यांची शिकार होते. चढणीचे मासे मारण्यासाठी सारेच जण टपलेले असतात. उन्हाळयात हे मासे एवढया संख्येने कुठे असतात? पावसाबरोबर ते बाहेर कुठून पडतात? हा सर्वसामान्यांना प्रतिवर्षी पडलेला प्रश्न. रात्र होताच आज कुठच्या डोहाकडे मासे मारण्यासाठी जायचे. हा बेत काही मंडळी ठरवत असतात. मग दिवे काढले जातात. पूर्वी पेट्रोमॅक्सवरून मासेमारी केली जायची. हे दिवे धरण्यासाठी एक विशेष माणूस असायचा. हे दिवे धरण्याची पद्धतही वेगळी होती. कारण दिव्यावर पाऊस किंवा पाणी उडू नये. याची दक्षता घेतानाच पेटत्या दिव्याची धगही थेट हाताला लागूनही ही दक्षता बाळगणे गरजेचे असायचे. शिलूक, काठया, लाठया, जाळे घेऊन मासेमारी केली जायची. तासा-दोन तासात किना-यावर लपत-छपत असलेले मासे अथवा डोहातून बाहेर पळणा-या माशांना पकडण्यासाठी धावपळ सुरू होते.

अलीकडे दिव्याची रचना बदलली. आता रॉकेलच्या दिव्यापेक्षा चायनीज दिवे वापरात येऊ लागले आहे. या दिव्यांवर पावसाचा तेवढासा फरक पडत नाही. अलीकडे काही मंडळींनी खास मासेमारीसाठी वॉटरप्रुफ दिवे विकत घेतले आहेत. पकडून आणलेल्या माशाचे तिकले खाण्याचा मोह कुणाला थोपविता येणार नाही. केवळ मीठ, मसाला आणि हळदीचे पान, त्रिफळ घालून माशांचे केलेले कालवण ही तर मालवणी मुलखातली चढणीच्या माशांची खास थाळी असते. या थाळीचा ज्यांनी आस्वाद घेतला त्यांना चढणीचे माशांची लज्जत समजेल ज्यांनी घेतला नाही त्यांनी सुसाट कोकण गाठावे..

आता फक्त गरवणेच

मच्छीमार नौका बंद झाल्याने आता गरीने अथवा पागून मासे मिळविण्यास सुरुवात झाली असून युवक व मुले मासळी पकडण्याचा गर घेऊन खाडीत मासळी पकडताना दिसत आहेत, तर पहिला पाऊस पडल्यावर बाहेर येणा-या कुल्र्या पकडण्यासाठीही रात्री बत्ती घेऊन फिरताना दिसत आहेत. नदीतून अथवा वहाळातून चढणीचे मासे मारण्यासाठी छोटी जाळी लावली जातात. तर किनारपट्टीला मासळी पकडण्यासाठी गर टाकून तासन् तास बसावे लागते.
देवगड बंदरानजीकच ब-याचशा नौकांना किना-यावर येण्यासाठी जागा नसल्याने खाडीतच प्लास्टिकचा कागद घालून नौका उभ्या करून ठेवण्याशिवाय पर्याय दिसत नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतरही काही मच्छीमार बांधव आपल्या नौका किना-यावर आणण्यात मग्न आहेत.तर काहींच्या नौकांवर पावसाळयातील संरक्षण म्हणूनच झापांचे आच्छादन तसेच प्लास्टिक कागद बांधण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मासेमारीसाठी वापरण्यात येणारी जाळी तसेच अन्य सर्व सामान नीटनेटके ठेवण्याची लगबग दिसत आहे. दरवर्षी मे महिन्यातच हजेरी लावणारा पाऊस यावर्षी उशिरा दाखल झाला असून पावसाची वाट पाहणारा शेतकरी तसेच स्थानिक मच्छीमार मात्र पावसाची सुरुवात होताच आपल्या कामाला लागला आहे. परंतु खाडीला अद्याप पूर न आल्याने खाडीमध्ये माशांचा शिरकाव झाला नसल्याने मासे मिळण्याचे प्रमाण कमी असल्याचे मत येथील स्थानिक मच्छीमार बांधव व्यक्त करत आहेत.

अधिक प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यास खाडीला पूर येतो व त्या पुराबरोबरच मासे खाडीपात्रात शिरकाव करतात. या माशांमध्ये सुळे, तांबवसे, गुंजली आदी माशांचा समावेश असतो.पावसाळयातील खोल समुद्रातील मच्छीमार बंद असल्याने या माशांना चांगला भाव मिळतो.मात्र सध्या पावसाचा जोर कमी असून अद्यापही खाडीला पूर न आल्याने मासे मिळण्याचे प्रमाण कमी आहे.देवगड तालुक्यात वाडातर, टेंबवली-वानिवडे तर,मोंडतर, कट्टा, तारामुंबरी, मळई या खाडींमध्ये हे मासे मिळत असल्याने पारंपरिक पद्धतीने येथील स्थानिक मच्छीमार मासे पकडतात. याउलट परिस्थिती तांबळडेग, मोर्वे, मिठबांव या भागातील मच्छीमारांची असून पावसाळयात येथील मच्छीमारांना मात्र खाडीत मासे मिळत नसल्याने तीन महिने घरी जाळी विणणे यासारखी कामे करावी लागतात. देवगडमध्ये यावर्षीचा मासळी हंगाम हा मच्छीमारांच्या दृष्टीने तोटयातच गेला. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांची भिस्त आता पावसाळयातील पारंपरिक मच्छीमारीवर असून मुळातच पाऊस उशिरा दाखल झाल्याने मच्छीमारांच्या आशेवर पाणी पडले हे निश्चित. सध्या मच्छी मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने मच्छीचा भावही वधारला आहे. त्यामुळे अंडी व मटण व्यावसायिक मात्र तेजीत आहेत. देवगडमध्ये मच्छीच्या किमती या भरमसाट वाढल्या असून पापलेटच्या एका नगाची किंमत १५० ते २०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या वधारलेल्या किमती सर्वसामान्यांना परवडत नाहीत. लोकांनी आता सुके मासे, कालवे, तिसरे, मुळे व खेकडे घेण्यावरच भर दिला आहे.

या दिवसात सारेच काही झटपट उरकायचे असते.?पावसाला थांबण्याची हौस नसते. पदार्थ तयार करण्याच्या पद्धती तेवढयाच झटपट. खमंग हळदीच्या पानात मिरपूड, त्रिफळ, हळद, मीठ, मसाला घालून सोरकुलात किंवा चुलीवर केलेला माशांचा तिखला लय भारी. सध्या समुद्राची मासेमारी थांबली आहे.?अशा कालावधीत चढणीच्या माशांच्या तिखला खायचा बेत या मुलखात झक्कास जमतो.?गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत झणझणीत तिखले जिभेवर पोहोचण्यापूर्वी?लाळ गळत असते आणि खमंग वासाने एक घास अधिकच जातो. खरपूस वासामुळे चटणीही  खरवडून खावीसी वाटते.

जसे तिखले तसाच मोटलासुद्धा.. पकडलेल्या इवल्याशा माशांना हळद, मीठ, मसाला आणि कोकमची दोन सोलं टाकून हळदीच्या पानात पुरचुंडीप्रमाणे  गुंडाळले जाते. त्याला पुन्हा कुंबियाच्या पानाने बांधून ती रसरशीत आगीत भाजली जाते. पाऊस सुरू होताच घरातील पडवीमध्ये कांबळे सुकविण्यासाठी न्हाणी घरात अथवा चुलीवर उतव (ओले कपडे सुकविण्यासाठी बांधण्यात आलेली बांबूची चौकड) बांधले जातात. याच चुलीत हा मोटला टाकला जातो. काही मिनिटातच पानांचा रंग बदलतो आणि खमंग वास सुटतो. अहाहाऽऽऽ हाच तर स्वाद हळुवार पोहोचणा-या सर्देलेल्या थंडीतही हा मोटला स्वर्गीय थाळीचा आनंद देतो.

अलीकडे चढणीच्या माशांचा मोटला खाण्याचे भाग्य आजच्या पिढीला मिळत नाही. कारण पाऊस जसा बदलला आहे तसेच नदींचे प्रवाहही बदलले आहेत. अनेक कोंडी संपल्या आहेत. उन्हाळी होणा-या मासेमारीमुळे गोडया पाण्यातील या नदीतल्या माशांची पैदासही थांबली आहे. मळवे, डेकळय़ांचे कालवण आता दुर्मीळ होण्याची चिंता आहे. पुढचे पुढे, आज मात्र चढणीच्या माशांचा बेत सहयाद्रीतल्या अनेक गावांमध्ये रंगला आहे हे मात्र खरेच!.

साखळी लागण्याची आजही प्रतीक्षाच आहे. सध्या नद्यांमध्ये प्रवाहही कमी असून या प्रवाहावरून जाणारे मासे मारण्यासाठीची लगबग सुरू आहे. मासे मारण्यासाठी येंड, शेंडी, कांडाळी, आक्या, जावला, कोयता, शिलूक आदी साधने घेऊन हे हौशी लोक नद्या-नाल्यात फिरताना दिसतात. तर रात्रीच्या वेळी बत्तीच्या उजेडात हे लोक मासे पकडताना पाहायला मिळतात.

पाण्याच्या डोहातील मासे पकडण्याची एक पद्धती म्हणजे मासे पागवणे. एक मोठे जाळे घेऊन लोक ते या डोहात टाकतात व सर्व बाजूंनी पाण्याच्या तळाशी दाबून धरतात. यावेळी मध्ये फसलेले मासे या जाळयात अडकतात. कांडाळी म्हणजे एक लांब जाळे असते. हे जाळे पाण्याच्या प्रवाहात पाणी शांत असलेल्या ठिकाणी आडवे टाकले जाते. यामुळे वर जाणारे मासे या जाळयात अडकतात. पाण्याच्या खाली कोसळणा-या प्रवाहातून वर उडया मारून जाणारे मासे अलगदपणे शेंडीत झेलले जातात.

या शिवाय शिलूक आणि शिगेच्या सहाय्यानेही मासे मारले जातात. खवळे, मळवे, टोळ, शेंगटी, ठिगूर, वाळय, काडी आदी मासे सध्या जोरदार मिळत आहेत. कणकवलीच्या गडनदीपात्रात सध्या हे चढणीचे मासे मारण्यासाठी लोकांची मोठी वर्दळ आहे. मासेमारीची अनेक साधने घेऊन लोक दिवसरात्र या पात्रात फिरताना दिसतात.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. मी हा सर्व अनुभव माझ्या लहानपणी गावी घेतला आहे… किशोर राणे यांचा हा लेख खूपच छान आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट