नविन सरकार सत्तेत आल्यापासून जातीय तेढ निर्माण केल्याने दंगलीत वाढ झाल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे.
थिरुअनंतपूरम- नविन सरकार सत्तेत आल्यापासून जातीय तेढ निर्माण केल्याने दंगलीत वाढ झाल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे.
केरळमधील प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिका-यांशी संवाद साधताना सोनिया गांधींनी सत्ताधा-यांवर सडकून टीका केली. देशातील काही राज्यात जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण केली जात आहे. धार्मिक भावना भडकावून जातीय दंगली घडवून देशात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही त्या म्हणाल्या.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अवघ्या ११ आठवड्यात तब्बल ६०० जातीय दंगली घडल्याचे सोनिया गांधी यांनी यावेळी सांगितले. यात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. मुझफ्फरनगरमध्ये २०१३ मध्ये झालेल्या जातीय दंगलींचे लोण राज्याच्या अन्य जिल्ह्यातही पसरले आहे. मीरत येथे तर धर्मांतर आणि धार्मिक स्थळी एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचे सांगून लोकांच्या भावना भडकवल्या जात आहेत. अशाप्रकारे दंगलीचे वाढत असलेले प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. यूपीएच्या कार्यकाळात जातीय दंगल क्वचितच झाली असेल, असा दावाही त्यांनी केला.
मात्र सोनिया गांधी यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे पंतप्रधान कार्यालयातील केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
यापूर्वी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर जातीय दंगलीवरुन जोरदार टीका केली होती.
ह्या कोन्ग्रेसी बाईंच्या काळांत जातीय दंगली झाल्या नव्हत्या काय ????
म्याडम म्याड झाली आहे.जातीय दंगलीत एक विशिष्ठ समाज इतर समाजाशी दंगली किंवा कुरापती काढताना दिसतो.सद्ध्या मध्य पूर्वेत जी शांतता सलोखा प्रेम नांदते आहे ती अशा लोकांमुळेच.अशा लोकांच्या प्रवृत्तीमुळे म्यादमच्या घरातील दोन माणसे जीवाला मुकली आहेत.म्याडम देशापुढे गरिबी कुपोषण भ्रष्टाचार व शिक्षण हे महाप्रश्न असताना नकोते फालतू प्रश्न उभे करून स्वतच्या नसलेल्या बुद्धीची शोभा करू नये.तसेच प्रहारने अशे भिकारडे लेख प्रकाशित करू नये.