सर्व धर्मांमध्ये दोन आपत्यांचा नियम सक्तीचा केला नाही तर हिंदू मुलींना पाकिस्तानाप्रमाणे बुरख्यात ठेवावे लागेल, असे वादग्रस्त वक्तव्य क्रेंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी केले.
पाटणा- भारताला लोकसंख्येबाबतच धोरण बदलण्याची गरज आहे, सर्व धर्मांमध्ये दोन आपत्यांचा नियम सक्तीचा केला नाही तर हिंदू मुलींना पाकिस्तानाप्रमाणे बुरख्यात ठेवावे लागेल, असे वादग्रस्त वक्तव्य क्रेंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी केले.
पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बाघा येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गिरीराज सिंग उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कुटुंब नियोजनाचे धोरण सर्वांना समान असायला पाहिजे, या मागणीवर जोर धरला. कार्यक्रमाला अनेक साधू आणि आरएसएसचे स्वयंसेवक होते.
बिहारमध्ये सात जिल्हे असे आहेत जेथे मुस्लिमांचे प्रमाण अधिक असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. त्यामुळे लोकसंख्येचे संतुलन राखण्यासाठी सर्व धर्मांमध्ये दोन आपत्यांचे बंधन घालणारा कायदा सक्तीचा करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी उपस्थित केली.
गिरीराज यांनी हिंदूच्या घटत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. लोकसंख्या नियंत्रणाचा नियम बदलला पाहिजे तेव्हाच हिंदू मुली सुरक्षित रहातील. नाहीतर पाकिस्तानप्रमाणे आपल्या मुलींना बुरख्यामध्ये ठेवावे लागेल, असे गिरीराज म्हणाले.
वादग्रस्त विधान??? मग तुम्ही मेडियावाले खरा का बोलत नाहीत कि खरच २ अपत्य असल्याचा नियम करण्याची गरज आहे????