शेळी गाभण असताना तिच्या शरीराची प्रथिने व ऊर्जेची मागणी वाढलेली असते. शरीरात आलेले अघटक वापरण्यासाठी प्राधान्यक्रम ठरलेला आहे.
शेळी गाभण असताना तिच्या शरीराची प्रथिने व ऊर्जेची मागणी वाढलेली असते. शरीरात आलेले अघटक वापरण्यासाठी प्राधान्यक्रम ठरलेला आहे. प्रथम शरीराची ठेवण, नंतर शरीराची वाढ, गर्भधारणा, नंतर गर्भाची वाढ, नंतर दूध या क्रमाने शरीरात उपलब्ध झालेले अन्नघटक प्राधान्याने वापरले जाते.
ज्या चा-यात हे अन्नघटक व सत्त्वे जास्त प्रमाणात असतात. त्याच चा-यावर पोषण चांगले होत असल्याने त्यास पौष्टिक चारा समजला जातो. गर्भारपणात केवळ चराईने शेळय़ांच्या सत्त्वाची गरज पुरवली जात नाही. उन्हाळय़ामध्ये गवतातील प्रथिनांचे प्रमाण ४ टक्क्यांपेक्षा कमी होते. सामान्यपणे इतर कोणत्याही उपलब्ध वैरणीपेक्षा झाडपाल्यामध्ये प्रथिने, क्षार व जीवनसत्त्वे यांचे प्रमाण जास्त असते.
त्याकरता अंजन, कांबन, सिसम, बोर, उंबर, इद्रगा, शेवरी व खर इत्यादी झाडे लावून जोपासना केल्यास शेळय़ांचे पोषण चांगले होते. ० टक्के ते ३५ टक्केतृणवर्गीय धान्य, १५ टक्केचुनी, २०-२५ टक्केपॅड, २ टक्केखनिज मिश्रण, १ टक्केमीठ यापासून केलेले २०० ते ३०० ग्रॅम भरडा खाद्य, गाभण मादीला शेवटच्या महिन्यात दिल्यास गर्भाची चांगली वाढ होऊन २ ते २.५ किलो वजनाची पिल्ले निघतात.
त्यामुळे पिल्लांची सुरुवात चांगली होण्यास मदत होते. अशा प्रकारे शेळय़ांच्या आहाराबाबत काही नियमांचे पालन केल्यास चालू व्यवस्थापनापासून शेळीपालकांना फायदा वाढवता येईल. गाभण शेळीला टी.टी.ची लस देणे जरुरीचे आहे.
करडाची काळजी
नवजात करडाच्या नाकातील व तोंडातील घाण मादी साफ करते. गोणपटाने अथवा कपडय़ाने सर्वाग पुसून घ्यावे. त्यामुळे रक्तप्रवाह सुरू होते. नवजात कारडाला त्याच्या वजनाच्या १/१० इतका चिक (पहिले दूध) द्यावा, त्यामुळे करडात नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती येते. करडांना जन्मानंतर ४ ते ६ तासांनी चिक पाजल्यास त्याचे पोटात शोषण होऊ शकते. चिक पाजल्यामुळे मरतुकीचे प्रमाण २ टक्केव ३ टक्केकमी करता येते.
दिवसातून ३ ते ४ वेळा करडाला मातेकडे दूध पिण्यासाठी सोडावे किंवा बाटलीतून मातेचे किंवा गाईचे दूध पाजावे. जे दूध दिवसाला ४००पासून सुरुवात करून ६०० ते ७००पर्यंत हळूहळू वाढवत जावे. यावेळी करडे साधारणत: ७ ते ८ किलो वजनाची होतील व त्यांचे वय ६ आठवडे असेल. नंतर हे दुधाचे प्रमाण कमी करत जाऊन साधारणत: करडे २ महिन्यांची झाल्यावर दूध पूर्णपणे बंद करावे. याशिवाय ३ ते ४ आठवडय़ांनंतर करडांना दररोज प्रत्येकी ५० ग्रॅम आंबोण मिश्रण द्यावे. मिश्रण करडांना मिळणे आवश्यक आहे.
माझ्या कडे५० शेळ्या आहेत मला आंबोन मिक्ष.बददल माहीती पाहिजे