Friday, May 3, 2024
Google search engine

रामघळ

सह्याद्रीची रूपेच न्यारी! जितकी रौद्र, तितकीच सुंदर. येथली उंचच उंच गिरीशिखरे, धडकी भरवणा-या द-या, बेलाग कडे, वळणदार जुन्या घाटवाटा, घनदाट जंगले यांसारख्यांवर अनेक भटके आणि फिरस्ते आपल्या भटकंतीची भूक भागवत असतात. या प्रत्येक सह्यरूपाला स्वतंत्र असा भटके मंडळीचा चाहता वर्ग आहे. सह्याद्रीच्या कुशीत लपलेली रामघळ हे भटक्यांचं एक आवडीचं ठिकाण.

shivtar ghal

गड-किल्ल्यांवर फिरायला जाणारा दुर्गप्रेमी येथल्या इतिहासाने प्रेरित झालेला असतो. जुन्या घाटवाटा पालथ्या घालणारा सह्याद्रीशी स्वत:चं नातं शोधत असतो. धडकी भरवणा-या द-या-खो-यांची वाट धुंडाळणारा साहसाला कवेत घेत असतो. घनदाट जंगलाच्या वाटा तुडवणारा यामध्ये निसर्ग,पशू-पक्षी, वनस्पती यांचा अभ्यास करताना दिसतो.

जुनी हेमाडपंथी, यादवकालीन मंदिरे पाहणारा मंदिरातील सौंदर्य एकलेच शोधत असतो, तर हजारो वर्षापूर्वी निर्मिलेल्या डोंगराच्या पोटातील लेण्या पाहताना आपल्या संस्कृतीची ओळख शोधत असतो. कितीतरी कारणे आहेत. या सर्वात साम्य मात्र एकच. ते म्हणजे फिरण्यातून आनंद वेचण्याचे!असो. ही सारी रूपे इतिहासाने भरलेली आणि भूगोलाने नटलेली आहेत.

सह्याद्रीत आश्चर्यही ब-याच ठिकाणी दिसते. याची कितीतरी उदाहरणे देता येतील. ते म्हणजे पुण्यातील मुळशी तालुक्यातील तेलबैलाची जुळी भिंतीची रुपे, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणारी सांधण व्हॅली, पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर टाकळी हाजी गावाजवळील कुकडी नदीवरील रांजण-खळगे, उन्हेरे येथील गरम पाण्याची कुंडे ही सारी ठिकाणे आपल्यासमोर येत असतात.

आश्चर्याने भरलेली आणि निसर्गाने निर्माण केलेली ही ठिकाणे म्हणजे विज्ञानाची तीर्थेच! इतिहास आणि भूगोलाव्यतिरिक्त यांना पदर असतो तो म्हणजे भू-विज्ञानाचा! आपल्या सामान्य दृष्टीला ते आश्चर्यच म्हणायला हवे. या आश्चर्यासारखी कितीतरी ठिकाणे आपल्याला भटकंतीदरम्यान भेटत असतात. असो. अशीच निसर्गनिर्मित आणि आश्चर्यमिश्रित ठिकाणे आहेत ती म्हणजे घळींची भटकंती!

डोंगराच्या पोटात असलेली, दगडात किंवा कातळातील कपार म्हणजेच घळ. भटकंती करता-करताच सह्याद्रीच्या अनेक वैविध्यपूर्ण ठिकाणे पाहायची आवड निर्माण झाली. अशा प्रेमातून डोंगरातल्या या घळींची भेट झाली. अन् सह्याद्रीचा नवा अवतारच जणू आम्हाला भेटला.

आपणा सर्वानाच रायगडमधील समर्थ रामदासांची पवित्र शिवथर घळ ब-यापैकी माहीत आहे. ती पाहिली. खूपच प्रसन्न वाटले. याच पंक्तीतली एक सुंदर घळ सातारा जिल्ह्यातील कोयनानगरजवळ आहे. तिचं नाव ‘रामघळ’. समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रामघळ म्हणजे डोंगरी सफारीचा एक सुंदर अनुभव होय. ही काहीशी अपरिचित. फक्त अस्सल भटक्यांच्याच ओळखीची आहे. म्हणूनच फिरण्यासाठी रामघळीचा सुरेख पर्याय निवडत वाट धरली ती कोयनानगरकडे..

सातारातून कोयनानगरला जावे लागले. तिथून कुंभार्ली घाटरस्त्यावरच हेळवाक नावाचे गाव लागते. या गावाच्या डाव्या बाजूलाच रामघळीकडे जाण्यासाठी वाट आहे. ही वाट चाफ्याचा खडक येथील धनगरपाडयापर्यंत जाते. तसं पाहिलं तर हेळवाक हे गावपट्टीच्या ट्रेकरसाठी नवीन नाही. कारण याच गावावरून साता-यातील दुर्गमात दुर्गम अशा भैरवगडाचा ट्रेक केला जातो. हा ट्रेक करतानाच्या वाटेवर एक फाटा फुटतो. येथून तासाभराच्या अंतरावर ही निसर्गरम्य रामघळ आहे. रामघळीत पोहोचल्यावर डोळे अक्षरश: विस्फारले जातात.

अर्धचंद्राकृती आडवी पसरलेली ही रामघळ आत जवळपास वीस फुटांपर्यंत आहे. वर डोक्यावर दगडाचे छप्पर. घळीतून दिसणारा समोरचा चांदोळी अभयारण्याचा हिरवाकंच नजारा. हे खरोखरच शब्दात उतरवणे कठीण काम. हा सारा परिसर निबीड अभयारण्यात स्थित आहे. आपण जर पावसाळ्यात गेलो तर आपल्यासारखा भाग्यवंत दुसरा कोणीही नाही.

या घळीवरूनच धबधबा पाण्याची पांढरीशुभ्र चादर पसरवून खाली पडत असतो. हा नजारा अनुभवण्यासारखं दुसरं सुख नाही. आम्ही एकदा पावसाळ्यात गेलो होतो. तेव्हा पाण्याचा प्रपात सौंदर्याचे वेगळेच मापदंड घेऊन घळीवरून खाली खोसळत होता. हे दृश्य बघितले आणि समर्थाच्या काही ओळी आठवल्या,

‘‘गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनि चालली बळे।
धबाबा लोटती धारा। धबाबा तोय आदळे।।’’

पावसाळा सोडून इतर ऋतूत आलो तरी रुक्षपणा आपल्याला जाणवणार देखील नाही. हिरव्यागार झाडांनी नटलेल्या या सदाहरीत जंगलात खरं तर कोणता ऋतू चालू आहे हे कळायला अवघडच! या अशा सुंदर जागेतच समर्थाचे वास्तव्य होते असे म्हणतात.

रामघळ म्हणजे ट्रेकरसाठी अस्सल डोंगरी मेवाच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. नजर जाईल तिथपर्यंत पसरलेलं घनदाट जंगल, एका बाजूला महाराष्ट्राला वरदान असलेलं कोयनेचं विशाल धरण, चहूबाजूंनी आपल्याला घेरलेल्या डोंगराच्या रांगा.. या सा-या सुंदर पसा-यातच आपण रामघळीची यात्रा केलेली असते. मात्र ही रामघळ सैर करताना माहितीगार अथवा वाटाडया घेणे केव्हाही चांगलेच, अन्यथा रानातल्या इतर वाटा तुम्हाला चकवा दिल्याशिवाय राहणार नाहीत.

रामघळीचा ट्रेक काही स्वतंत्ररित्या केला जात नाही. बहुतेक जण भैरवगड-प्रचितगड अथवा जंगली जयगडाला जोडूनच हा ट्रेक करतात. परंतु या ट्रेकदरम्यान रामघळीचं सौंदर्य आपल्यापासून दुर्लक्षित राहू नये म्हणूनच हा स्वतंत्र लेख-प्रपंच!

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. शिवथर प्रांतातील शिवथर घळीचे सत्य स्वीकारण्याचे आवाहन.
    सदर घळीचे फोटो आणि रचने संदर्भातील माहिती

    हीच खरी घळ ह्याचे ठोस पुरावे,
    1) छत्रपती शिवाजी महाराजांचे रामनगर पेठ वसवण्या संदर्भातील पत्र की श्री येऊन राहिल्याउपवरी येथील व्यापाऱ्यांकडून बारा वर्षे दिवाण माफ यावरून समर्थ वास्तव्याच्या कालावधीचा अंदाज करावा.
    पत्ता कोड नलवडा मौजे पारमाची ताा शिवथर
    दूसरे पत्र समर्थशिष्य योगीराज श्री कल्याण स्वामी यांनी दिवाकर गोसावी यांना पाठवलेल्या पत्रातील उल्लेख की श्री ….. च्या दरशनास पारमाचीस सिवथर प्रांती नवलवाडीयाचा कोड तेथे जाभलीच्या चउथरीयावर श्री संतोषरूप बैसले होते.
    जर शिवथर प्रांतात समर्थांच्या दर्शनाची जागेचा उल्लेख आहे.
    हे नलवडा वा नवलवाडी चा कोड म्हणजेच सध्याचे रामदास पठार.आणि शिवथर हा तेव्हाचा तालुका चे ठिकाण होते. हया येथील मंदिराच्या जागेचे आज ही सरकार दरबारी सातबारा वरील नाव मठाचा माळ असा आहे. हया ठिकाणाहून संशोधित शिवथरघळ अवघ्या सहाशे मीटर वर आहे म्हणजेच पायी पंधरा ते वीस मिनीट. ही दोन्ही पत्र विश्वासनीय आहेत व आज ही ती समर्थ वाग्देवताच्या बाड मध्ये पहायला मिळतात.
    2) घळीची भौगोलिक स्थान आणि रचनेचा उल्लेख समर्थ शिष्य गिरिधर स्वामी यांच्या समर्थ प्रताप मध्ये आहे तो खालील प्रमाणे
    समर्थे पर्वती केले येक गुप्तसदन।
    प्रसंगे ठेवावया देवार्चन।
    सूर्यप्रकाश उदक सन्निध उर्ध्वगमन।
    मार्ग सोपान करूनी जावे॥
    समर्थ प्रताप गिरीधरस्वामींनी समर्थ रामदास स्वामींच्या या सदनाचे वर्णन केले आहे. हे सदन पर्वतावर आहे, गुप्त आहे, तेथे प्रसंगी देवार्चन म्हणजेच देवघर ठेवता येते, सूर्यप्रकाश सन्निध आहे, म्हणजेच या गुप्तसदनाला पूर्व-पश्चिमेचा उगवतीचा व मावळतीचा सूर्यप्रकाश समोर आहे, उदक म्हणजे या रामगंगा धबधबा समोर ठेऊन उर्ध्वगमन म्हणजेच उर्ध्व दिशेने जावे आणि यासाठी मार्ग सोपा करून सोपान म्हणजे शिडीसारखे चढून जावे, अशी वर्णनानुरूप परिस्थिती आढळते.
    आज ही सरकार दरबारी घळीचे सातबारा वरील नाव मठाचा माळ असा आहे. तर बाजूच्या धबधबाचे नाव भटाचा माळ आहे.
    3) आनंदवनभुवनी म्हणजे समर्थांनी केलेल्या शिवथर प्रांतातील वास्तव्यातिल स्वानुभव,हया जागेचा महिमा आणि या जागेतच पुढे काहि घडणार आहे असा उल्लेख केला आहे. तसेच हया वनभुवनाला सर्व प्रथम मान दया अशी आज्ञा केली आहे. त्यातील काही ओवी देत आहे.

    गुप्त उदंड भुवने म्हणजे शिवथरघळ

    सकळ देवांची साक्ष | गुप्त उदंड भुवने |सौख्य जे पावणे जाणें | आनंदवनभुवनी ||१५||

    रामगंगा म्हणजे बाजूच्या धबधब्याचे वर्णन

    स्वर्गीची लोटली तेथे |रामगंगा महानदी |तीर्थासी तुळणा नाही | आनंदवनभुवनी ||१३ ||

    गुप्तगंगा चा उल्लेख

    ग्रंथी जे वर्णिली मागे .| गुप्तगंगा महानदी |जळांत रोकडे प्राणी | आनंदवनभुवनी ||१४

    अकरा हया अंकाची प्रचिती

    आक्रा आक्रा बहु आक्रा |काये आक्रा कळेचीना |गुप्त ते गुप्त जाणावे |आनंदवनभुवनी ||१७ ||

    दासबोध नव्याने लिहिल्याचा उल्लेख

    लिहिला प्रत्ययो आला | मोठा आनंद जाहाला |चढता वाढता प्रेमा |आनंदवनभुवनी ||३८ ||

    गणपतीला केलेली प्रार्थना त्याबद्दल

    जे साक्ष देखिली दृष्टी |किती कल्लोळ उठीले|विघ्न्घ्ना प्रार्थिले गेलो | आनंदवनभुवना ||८ ||

    देवालये दीपमाळा |रंगमाळा बहुविधा |पूजिला देव देवांचा | आनंदवन भुवनी || ४०||

    नवीन दासबोध लिहिल्याचा उल्लेख.

    वेद शास्त्र धर्म चर्चा |पुराणे महात्में किती |कवित्वे नूतने जीर्णे | आनंदवनभुवनी ||५० ||

    त्या ठिकाणचे महत्व:

    वेद तो मंद जाणावा | सिध्द आनंदवनभुवनी |आतुळ महिमा तेथे |आनंदवनभुवनी ||५२ ||

    मानसी प्रचीत आली | शब्दी विश्वास वाटला |कामना पुरती सर्वै | आनंदवनभुवनी ||५३ ||

    येथूनी वाचती सर्वै | ते ते सर्वत्र देखती | सामर्थ्य काय बोलावे | आनंदवनभुवनी ||५४ ||

    उदंड ठेविली नामे | आपस्तुतीच मांडिली |ऐसे हे बोलणे नाही | आनंदवनभुवनी ||५५ ||

    पुढे हया ठिकाणी खरे काही घडणार आहे त्याची कल्पना समर्थांना ठाऊक होती.आणि काय होईल ते पहावे हया ठिकाणी अस सावध करत आहेत.

    बोलणे वाउगे होते |चालणे पाहिजे बरे |पुढे घडेल ते खरे | आनंदवनभुवनी ||५६ ||

    स्मरले लिहिले आहे | बोलता चालता हरी |काये होईल पहावे | आनंदवनभुवनी ||५७ ||

    महिमा तो वर्णवेना | विशेष बहुतांपरी | विद्यापीठ ते आहे | आनंदवनभुवनी || ५८ ||

    सर्वसद्या कला विद्या | न भूतो न भविष्यती |वैराग्य जाहाले सर्वै |आनंदवन भुवनी ||५९ ||

    अशा सिद्ध स्थानास सर्वात प्रथम मान दया अशी समर्थांच्या आज्ञाचे स्मरण राहू दया

    ‘इति श्रीवनभुवनी नाम मान प्रथम॥’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट