सकल मराठा क्रांती मोर्चाचे वादळ १४ डिसेंबर रोजी नागपूर विधानसभेवर धडकते आहे. मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी नागपुरात निघणारा हा मोर्चा यंदाच्या हिवाळी अधिवेशनातला सर्वात मोठा मोर्चा असेल.
नागपूर- सकल मराठा क्रांती मोर्चाचे वादळ १४ डिसेंबर रोजी नागपूर विधानसभेवर धडकते आहे. मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी नागपुरात निघणारा हा मोर्चा यंदाच्या हिवाळी अधिवेशनातला सर्वात मोठा मोर्चा असेल. मराठा समाजाने आतापर्यंत जिल्ह्या- जिल्ह्यांतून मोर्चे काढले. हे सारे मोर्चे लाखा-लाखांचे होते. १४ तारखेचा मोर्चा राज्यस्तरीय आहे. राज्यभरातून लोक येत असून हा मोर्चा अभूतपूर्व असेल असा आयोजकांना विश्वास आहे.
समाजाच्या शिस्तीप्रमाणे हा मोर्चा मूक आणि शांततापूर्ण राहणार आहे. धंतोलीतील यशवंत स्टेडियममधून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होईल आणि निर्धारित मार्गाने तो विधानसभेवर जाईल. मुंबईहून दोन विशेष रेल्वेगाडय़ांनी समाज बांधव येत आहेत. याशिवाय, हजारो लोक स्वत:च्या वाहनाने दाखल होत आहेत. या सरकारला शक्ती दाखवायचीच अशा जिद्दीने समाज कामाला लागला आहे.
मोर्चाची सारी तयारी झाली आहे. रविवारी बाईक रॅली काढून जनजागरण करण्यात आले. आयोजकांनी सांगितले की, मोर्चासाठी येणा-या समाजबांधवांसाठी २० हॉल आणि पाच ठिकाणी चहा-पाणी व नाश्त्याची सोय करण्यात आली आहे. शहरात प्रवेशाच्या पाच महत्त्वाच्या केंद्रांवर समाजाचे कार्यकर्ते पाहुण्यांचे स्वागत करणार आहेत. धंतोली परिसरात तब्बल २० ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ठोस असे काही सांगितले नाही. त्यामुळे समाजात रोष असून त्याचे दर्शन मोर्चात दिसणार आहे. मोर्चाच्या दिवशी अधिवेशनाचे कामकाज असले तरी समाजाचे सर्वपक्षीय आमदार मोर्चात सहभागी होतील असा विश्वास, असा अंदाज आहे.
या मोर्चासाठी महाराष्ट्र आणि विदर्भातून हजारो कार्यकर्ते आणि मराठा समाजाची जनता नागपूरकडे कूच करणार असल्यामुळे विशेष रेल्वे गाडय़ांची मागणी मध्य रेल्वेकडे करण्यात आली होती. मात्र मध्य रेल्वेने ही मागणी फेटाळली. त्यानंतर महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित करून असा इशारा दिला होता की, जर विशेष गाडया सोडण्यास रेल्वेने नकार दिला तर १४ डिसेंबर रोजी सीएसटी स्थानकातून एकही गाडी सोडू?दिली जाणार नाही. या इशा-यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तातडीने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना विशेष रेल्वे गाडया सोडण्याच्या सूचना दिल्या, त्यानुसार मुंबई?व नागपूर आणि वाशिमहून नागपूर अशा विशेष गाडया सोडण्याची व्यवस्था करण्यात आली.
त्यानुसार १४ डिसेंबरच्या मोर्चाला एक मराठा-लाख मराठाचे कार्यकर्ते?आता मोठया संख्य़ेने नागपुरात पोहोचणार आहेत. नागपुरात जबरदस्त थंडी असल्यामुळे त्या तयारीने कार्यकर्त्यांनी यावे, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. नागपूरचा मोर्चा?अभूतपूर्व?होईल, अशी ग्वाही संयोजकांनी दिलेली आहे.
Ek Maratha Lakh Maratha !!