रेल्वेने प्रवास करताना एखादी अडचण आली आणि रेल्वे पोलिसांची मदत घ्यायची असल्यास किंवा एखादी गोष्ट रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यायची असल्यास, रेल्वेची हेल्पलाईन सेवा त्वरित आठवत नाही.
मुंबई – रेल्वेने प्रवास करताना एखादी अडचण आली आणि रेल्वे पोलिसांची मदत घ्यायची असल्यास किंवा एखादी गोष्ट रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यायची असल्यास, रेल्वेची हेल्पलाईन सेवा त्वरित आठवत नाही.
या समस्येसंदर्भात हायकोर्टाने यापूर्वी विचार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांच्या मदतीकरिता नवीन चार आकडी हेल्पलाईन सेवा करण्यात येणार आहे. १५१२ ही चार आकडी सेवा येत्या २२ ते २४ फेब्रुवारीपर्यंत प्रवाशांकरिता उपलब्ध केली जाईल, अशी माहिती रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली आहे.
मुख्य म्हणजे ही सेवा संपूर्ण देशभरात कार्यरत राहणार आहे.सध्या रेल्वे पोलिसांची ९८३३३३११११ ही दहा अंकी सेवा कार्यरत आहे. मात्र संकटकाळी रेल्वेची हेल्पलाईन आठवणे कठीण जाते. तर काही वेळा मोबाईल नेटवर्कबाबत अडचणी येत असल्याने पोलिसांनाही मदत पुरवण्यात अडचणींचा सामना करावा लागतो.
अनेक वेळा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते, अशा वेळी नेटवर्क जॅम केल्याने जुन्या हेल्पलाईनवरून संपर्क साधणे शक्य होत नाही. मात्र नव्याने सुरू करण्यात येणारी हेल्पलाईन ही नेटवर्क नसतानाही कार्यरत राहणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना पोलिसांची मदत मिळविणे आता अधिक सोयीस्कर होणार आहे.
मुख्य म्हणजे ही सेवा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून इतर राज्यात असतानाही या सेवेची मदत मिळणार आहे. त्यामुळे येणा-या काळात रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होऊ शकतो, असा विश्वास रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी व्यक्त केला आहे.
नवीन हेल्पलाईनची वैशिष्टय़े
१५१२ हा लक्षात राहील असा सोपा क्रमांक.
नेटवर्क नसतानाही संपर्क साधता येणार.
संपूर्ण देशभरात ही सेवा उपलब्ध होणार.
रेल्वेव्यतिरिक्त एखादी मदत हवी असल्यास संबंधित यंत्रणेला कळविले जाणार.
एखादा रेल्वे प्रवासी चार जणांच्या जागेकरिता संपूर्ण जागा अडवून आमचा ग्रुप आहे, म्हणजे रिजर्वेशनच समजा अशा प्रकारची अरेरावी करायला लागला. अशा वेळेस कोणाचे ताळू तापणार नाही आणि कोण त्या प्रवाशांशी मारामारी करणार नाही. याचे उत्तर रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी द्यावे. अशा वेळेस जर हेल्प लाईन ला फोन केला तर त्याच्याच ग्रुप मधील माणसे हा खोट बोलतो असा आत्मविश्वास रेल्वे पोलिसांमध्ये निर्माण करतील, आज काल मोबाईलचे रेकोर्डींग तेव्हा केले जाते जेव्हा त्या व्यक्तीस आजूबाजूच्या व्यक्ती तापवत असतात. कित्येक प्रवाशांचे या करिता प्रत्येक डब्ब्यात सीसीटीवि लावण्याचे मत आहे, वाटल्यास २ टक्के रक्कम पासात किंवा तिकिटात वाढवून दिलीत तर ते हसत मुखाने देतील. यामुळे एखाद्याचे म्हणणे सत्य आहे हे सिद्ध करता येईल, नाहीतरी “ये अंधा कानून है और अदालत सबूत मांगता है” अशी हाक न्यायदेवतेची आहे. पण किती दिवस हि न्यायदेवता आंधळी म्हणून राहील कधीतरी कोणीतरी त्या अंध न्यायदेवतेस डोळे देतीलच. “नेत्रदान हे सर्वात श्रेष्ठदान” हे ब्रीदवाक्य हि आहे. म्हणून आपल्या न्यायदेवतेस सीसीटीविच्या रुपात दोन नव्हे तर कावळ्या सारखा एक किंवा शंकरासारखा तिसरा डोळा मिळाला म्हणून आपण समजूया. “जय हिंद जय महाराष्ट्र”.