दोन महिन्यांपूर्वी नाशिकच्या घाऊक बाजारात ४० रुपये किलोला मिळणारा टोमॅटो चक्क दोन रुपये दराने मिळत असल्याने शेतक-यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे.
नाशिक- दोन महिन्यांपूर्वी नाशिकच्या घाऊक बाजारात ४० रुपये किलोला मिळणारा टोमॅटो चक्क दोन रुपये दराने मिळत असल्याने शेतक-यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे. टोमॅटो बाजारात विकण्यापेक्षा रस्त्यावर फेकणेच योग्य ठरेल, असे शेतक-यांनी सांगितले.
महाराष्ट्रातून टोमॅटो, आंबा, द्राक्षे, डाळिंबाचे उत्पादन मोठयाप्रमाणावर होते. ही पीके मोठया प्रमाणावर निर्यात केली जातात. त्यामुळे राज्याला मोठे परकीय चलन मिळते. मात्र, या फळांचे भाव घसरल्याने उत्पादनाचा खर्चही भरून निघणे कठीण बनले आहे.
गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. पूर्वी २० किलो टोमॅटोला ८०० रुपये मिळत होते. आता फक्त ४० रुपये मिळतात. सरकारने पाकिस्तान व बांगलादेशला टोमटो निर्यात करण्यास बंदी घातल्यानंतर भावांमध्ये घसरण झाली. यंदा पाऊस उशीरा सुरू झाल्याने चांगले पीक येण्याची शक्यता मावळली आहे, असे शेतक-यांनी सांगितले.
सध्या अन्य राज्यातूनही टोमॅटोची मागणी कमी झाली आहे. तसेच शेतीसाठी कामगार मिळत नसल्याने आणि अवेळी पावसामुळे पीकांचे नुकसान झाले आहे. घाऊक बाजारात दोन रुपयाने मिळणारा टोमॅटो शहरांमध्ये १० ते ३० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांचीही या सर्व बाबींमध्ये लूट सुरू आहे.
महाराष्ट्राच्या टोमॅटोला दिल्ली, मुंबई व कोलकात्याची मोठी बाजारपेठ असते. मात्र कोलकात्याच्या व्यापा-यांनी यंदा उत्तर प्रदेश व बिहारमधून टोमॅटो मागवले आहेत. त्याचाही परिणाम महाराष्ट्रातील शेतक-यांवर झाला आहे.
करा भाजप ला मतदान अजून