स्त्रियांची अस्मिता आणि समाजाची नितीमत्ता अबाधित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या पुढाकाराने २००५ मध्ये राज्यातील डान्सबारवर बंदी घालण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने बारबंदीचा निर्णय घटनाबाह्य ठरवून राज्य सरकारला चपराक दिली होती. सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत गेल्या आठ वर्षांपासून डान्स बारवरील बंदी उठवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुंबईसह राज्यभरात डान्सबार सुरु होऊ शकतात. पण सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करण्याचा पर्यायही राज्य सरकारसमोर खुला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बार मालकांच्या बाजूने दिलेला निर्णय योग्य आहे का? मुंबईत पुन्हा डान्स बार सुरु होतील का? डान्सबार सुरु झाल्यास बारबालांच्या पोशाखासंदर्भात ‘ड्रेसकोड’ असावेत का? राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल केल्यास त्याचा फायदा होईल का?… प्रहार यूजर्सनी आपली थेट मते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा….
[EPSB]
‘मुंबईत पुन्हा छमछम’ »
बारबालांचा रोजगार काढून घेण्याचा अधिकार सरकारला नाही असे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठवली आहे.
[/EPSB]
चुकीचा निर्णय आहे. बार बंद कधी होते?
बारबालांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने त्यांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती पुनर्वसन करणात सरकारल अपयश आले आहे . आबा यावर बोला
वा प्रथम कोर्टाच्या आवारात लेडीज बार सुरु करा
न्यायालयाच्या निकालानंतर आराआर पाटलांची प्रतिक्रिया- बडे बडे न्यायालयामे छोटे छोटे निर्णय होते है
यंदाची गटारी डान्सबारमध्ये
आबा न्यायालयाच्या निर्णयावर अभ्यास करणार म्हणे.. इतके दिवस काय करत होता.
ABA NA KONI DOSH DAYCHA NAHI. TANY 1 CHAGLA NIRNAY GHETALA HOTA. SALA CHAGLA KAM KEL TARI NAV THEVNAR, VAIT KAM KEL TARI NAV THEVNAR. KHADHI TARI SATYCHI BAJU GHAY. DANCE BAR AJIBAT CHALU ZALE NAHI PAHIJET. TARUN PIDHI KUPACH VASNACHI AAHARI GELI AAHE. TANAY AAVRANE GARJECHE AAHE.