काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय लोकशाहीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण शूर जवावांनी प्राणांचे बलिदान देऊन देशाचे रक्षण केले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी म्हणाले.
हजारीबाग – काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय लोकशाहीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण शूर जवावांनी प्राणांचे बलिदान देऊन देशाचे रक्षण केले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी म्हणाले.
काश्मीर खो-यात शुक्रवारी झालेल्या चार दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच या विषयावर बोलले. ते झारखंडमध्ये हजारीबाग येथील प्रचारसभेत बोलत होते.
दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झालेल्या जवानांना त्यांनी या सभेत श्रध्दांजली वाहिली. सोमवारी श्रीनगर शहरात मोदींची सभा होत आहे. काश्मीर खोरे शुक्रवारी बारा तासांच्या आत झालेल्या चार दहशतवादी हल्ल्यांनी हादरले.
मोदी लष्कराच्या जवानांचे श्रेय फुकटचे घेऊ नका इतके वर्षे आपण व आपला पक्ष इतर सरकारांना पाकीस्थान बरोबर युद्ध करण्या साठी दोष देत होता. आता वाट कशाशी पाहता आहे .५६ इंच छाती आहे ना? आपल्या लाशकाराचा अभिमानाच आहे. जयहिंद.