इराकमधील भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी भारतीय नौदल पर्शियाच्या आखातात तैनात केले आहे.
नवी दिल्ली- इराकमधील भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी भारतीय नौदल पर्शियाच्या आखातात तैनात केले आहे.
केंद्र सरकारच्या आपात्कालिन गटाची बैठक शुक्रवारी झाल्यानंतर सरकारच्या आदेशावरून नौदलाची ‘आयएनएस म्हैसूर’ ही युद्धनौका पर्शियाच्या आखातात दाखल झाली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत ती तेथेच राहणार आहे.
इराकमध्ये दहा हजाराहून अधिक भारतीय अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी नौदलाची दुसरी युद्धनौका ‘आयएनएस तर्कश’ही एडनच्या आखातात तैनात केली आहे. गरज पडल्यास या युद्धनौकेला नागरिकांच्या सुटकेसाठी वापरण्यात येईल, असे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले.
भारतीय हवाई दलाने आपली ‘सी-१७’ आणि ‘सी-१३० जे’ सुपर हक्र्युलस ही विमाने सज्ज ठेवली आहेत.
भारत सरकारची एक चांगली कृती!जगात आपली ताकद दाखविण्याची आणखीन एक संधी.