‘ऑन डय़ुटी २४ तास’ असणारे भारतातील पोलीस खाते कामाच्या ओझ्याने दबले आहे. पोलीस अधिकारी व शिपायांना रोज सरासरी ११ तासांहून अधिक काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या शरीर व मनावर मोठा ताण येत आहे.
नवी दिल्ली – ‘ऑन डय़ुटी २४ तास’ असणारे भारतातील पोलीस खाते कामाच्या ओझ्याने दबले आहे. पोलीस अधिकारी व शिपायांना रोज सरासरी ११ तासांहून अधिक काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या शरीर व मनावर मोठा ताण येत आहे. याचा सर्वात मोठा फटका त्यांच्या कामावर होत आहे.
पोलीस संशोधन व विकास संस्थेने देशातील ९० टक्के पोलीस ठाण्यातील अधिकारी व शिपायांचा अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. ६८ टक्के पोलीस स्टेशनमधील अधिका-यांना आणि ७६ टक्के वरिष्ठ अधिका-यांना रोज ११ तासांपेक्षा जास्त डय़ुटी करावी लागते.
तसेच २७.७ टक्के पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि त्यांच्या ३०.४ टक्के वरिष्ठ अधिका-यांना १४ तासांपेक्षा अधिक काम करावे लागते. तसेच ७३.६ टक्के पोलिसांना महिन्यातून एकदाही साप्ताहिक रजा मिळत नाही. त्यातही सर्वात वाईट बाब म्हणजे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी रजा रद्द करून त्यांना तातडीने कामाला बोलवले जाते, असे अहवालात नमूद केले आहे.
पोलीस ठाण्यामध्ये काम करणा-या अधिका-यांनी सांगितले की, कामाचे अनियमित असल्याने त्याचा मोठा परिणाम कार्यक्षमतेवर होतो. अनेक पोलिसांना या कामाच्या पद्धतीमुळे शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. पोलिसांना कौटुंबिक व सामाजिक जीवनाला मुकावे लागते, असेही अहवालात सांगितले आहे.
कामाचा दबाव असतानाही त्यांना नीतिधैर्य, स्वयंप्रेरणा आणि स्वप्रतिमा जपण्याचे भान राखावे लागते. पोलिसांचे कामाचे जादा तास आणि अन्य सरकारी आस्थापनातील कर्मचा-यांचे अतिरिक्त कामाचे तास यात तुलना होऊ शकत नाही. त्यामुळेच पोलिसांना अतिरिक्त कामाच्या तासाचा चांगला मोबदला द्यायला हवा किंवा रजा मंजूर करायला हवी, अशी शिफारस अहवालात केली.
‘ऑन डय़ुटी २४ तास’ सर्वसाधारण माणसांकरिता फार मोठ्या जोखमीचे काम आहे. किमान १ हफ्ता जरी पोलिसातील किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने जर का असे काम केले तर त्याचे शरीर पुष्कळ पोकळ होते, उभे राहण्याचे तर सोडा,चालण्या फिरण्याची हि शक्ती त्याच्या शरीरात राहत नाही. ‘ऑन डय़ुटी २४ तास’मध्ये किमान ४ ते ५ तासांची विश्रांती करण्यास एखादे विश्रांतीगृह पोलिस चौकीत बांधण्यात यावे. उद्या जर कुठे हमला झाला किंवा कोणतीही विपरीत घटना घडली तर तेथील जनताच पोलिसांबद्दल अपशब्द बोलण्यास मागेपुढे पाहत नाही. त्यातूनच सरकार त्यांना अतिरिक्त जागा भरण्यास मुबा हि देत नाही. आपले घर संसार सोडून ते फक्त देशाच्या आणि सर्व सामान्य जनतेच्या सेवेकरिता प्राणपणास लावून लढत आहेत.