कोकणात राहणारा बाबल्या, शिकला सवरला शहरात राहू लागला त्याला मालवणी बोलायची लाज वाटू लागली, माझ्या अंगाला शेण लावा आणि मला बैल म्हणा असचं काहीसं.
असा रसाळ गोजिरी
आवशिक खावं म्हटल्यानं
तरी माया पाझरता
आवशीचो घोव म्हटल्यानं
तरी प्रेम वतता
वॉशिंग मशीन इली
आनी सकळा व्हळार
जावाचा बंद झाला
घर घंटी इली आनी
व्हनीबाय जात्यार
बसाना झाली
ट्रॅक्टर इलो आनी
बाबल्यानं जॉत धरुचा
सोडून दिल्यान
इरला आता दिसा ना झाला
उकडय़ा तांदळाची
प्येज शिजा ना झाली
आये म्हणता मराठी बोल
बाबा म्हणता विग्लीश शाळेत जा
पप्पा मम्मीच्या या गोंधळात
सकला नकला खयं धापू झाला
हडे तडे इलंस गेलंस क रून
बाबाचो स्टेटस खालत्ये इलो
आताशी म्हातारी करवादता
कोनश्याक बसान दुखा गाळता
कान तिचे आशालेत आयकाक
आराडगे बांडके सांज जावदे
आये माझी बेगीन घरां येवनी
बाबल्या तुयां झेटलीमन झालंस
इसरा नको आपल्या मायबोलीक
जिवाच्या आकांतान आनी
बोंबलेच्या देठापासून
जप तिका फुलासारखी
मालवणी ती मालवणी
माझा वय आता ४९ वर्ष्या आसा. मी आयुष्याची फक्त ४ वर्ष्या माझ्या गावात देग्य्यात रव्लय्य. बाकीचा आयुष्य गोवा मुंबई आणि बाहेच्या देशात गेला. अमेरीकेत पण रवान इलाय पण कधीही मालवणी विसरलाय नाय. माझी घर्कारीनचो जल्म जालो मद्रास मध्ये आणि आयुष्य गेला मुंबईमध्ये पण ती सुधा मालवणी इसरली नाय.
By the way great poem, really touched my heart. It depict the ground reality of today.