देशात गायींच्या प्रश्नावर सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पहिल्यांदाच आपले मौन सोडले.
नवी दिल्ली- गोरक्षणाच्या नावाखाली समाजविघातक शक्तींची दुकानदारी सुरू आहे. यामुळे आपला संताप अनावर होत आहे. हत्या करण्यापेक्षा प्लॅस्टिक खावून अधिक गायींचा मृत्यू होत आहे. या कथित गोरक्षकांना गायीची एवढी काळजी असेल तर त्यांनी गाईना प्लॅस्टिक खाण्यापासून रोखावे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. देशात गायींच्या प्रश्नावर सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पहिल्यांदाच आपले मौन सोडले.
‘माय गव्हर्मेंट’ या उपक्रमाच्या दुस-या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी ‘टाऊनहॉल’ या अमेरिकेतील पद्धतीचे आयोजन केले होते. या पद्धतीत राष्ट्रप्रमुख अनौपचारिकपणे नागरिकांशी संवाद साधतात. या वेळी पंतप्रधान मोदींना विचारलेल्या प्रश्नांवर मोदींनी उत्तरे दिली. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशात गायीच्या प्रश्नावरून झालेल्य हिंसाचाराबाबत मोदी सरकार व भाजपावर जोरदार टीका होत आहे. त्यामुळेच मोदी यांनी या प्रश्नी वक्तव्य केले.
देशात गायीवरून होणा-या प्रश्नांबाबत पंतप्रधान मोदी यांनी बाळगलेले मौन पहिल्यांदाच सोडले. ते म्हणाले की, देशात ८० टक्के गोरक्षक सकाळी गायी संरक्षणाचा धंदा करतात तर रात्रीच्या वेळी ते अवैध धंद्यात गुंतलेले असतात. या सर्वाची माहिती गोळा करण्याचे आदेश आपण सर्व राज्य सरकारला दिले आहेत.
ते म्हणाले की, गोरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवणा-यांचा मला राग येतो. गोरक्षणाच्या नावाखाली ते आपले काळे धंदे लपवतात. गायींची हत्या होण्यापेक्षा त्या प्लॅस्टिक खाऊन मरण पावतात. ज्यांना गोसेवा करायची आहे, त्यांनी गायींना प्लॅस्टिक खाण्यापासून रोखावे. ती त्यांची मोठी सेवा ठरेल, अशा शब्दात मोदींनी कथित गोरक्षकांना फटकारले.
आपण केलेल्या गोसेवाची माहिती देताना मोदी म्हणाले की, आपण स्वत: गायींसाठी खास शिबीर आयोजित केले होते. त्यावेळी गायींवर शस्त्रक्रिया केली होती. त्यावेळी एका गायीच्या पोटातून डॉक्टरांनी दोन बादल्या भरून प्लॅस्टिक काढले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
आपल्या सरकारचे परदेश धोरण हे ‘भारताला प्राधान्य’ या तत्वावर आधारले आहे. सध्याच्या जगात देशांमध्ये गटातटाचे राजकारण संपुष्टात आले आहे. प्रत्येक देश दुस-या देशाशी जोडलेला आहे.
मोदीजी मी आपल्या या वक्त्व्याचा नीषेध करतो कारण लातो के भूत बातो से नहीं मानते, कायदे कमजोर असल्यामुळे गोहत्या करणारे कोर्टात आरामशीर सुटतात. हिन्दू धर्मात गाईला माता समान मानले आहे आईची ह्त्या किंवा कापणा-याला तशीच शिक्षा झाली पाहीजे. मोदीजी कृपया मतांसाठी धर्माशी तडजोड करू नका….
जय महाराष्ट्र