झारखंडच्या मंत्री नीरा यादव एका नव्या वादात अडकल्या आहेत.
रांची – माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या निधनाआधीच त्यांना श्रद्धांजली वाहणा-या झारखंडच्या मंत्री नीरा यादव एका नव्या वादात अडकल्या आहेत. बिहार हा भारताचा शेजारील देश असल्याचे विधान नीरा यादव यांनी केल्याने त्यांच्या सामान्य ज्ञानावर प्रश्वचिन्ह निर्माण झाले आहे.
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले यावर उत्तर देताना त्यांनी हे अजब उत्तर दिले.
झारंखडचे नेते बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार का असे विचारले असता, बिहार हा भारताचा शेजारील देश आहे आणि भाजपा तेथेही प्रचार करेल असे यादव म्हणाल्या.
याआधीही यादव यांनी अब्दुल कलाम यांना निधनाआधीच श्रद्धांजली वाहत वाद निर्माण केला होता.२० जुलैला एका शाळेतील कार्यक्रमादरम्यान कलाम यांच्या फोटोला हार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली होती. हा फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
मला वाटतंय तिला मेंटल हॉस्पिटल मध्ये भारती करायला पाहिजे ..//;’\