अन्य राज्यांतून कांद्याची आवक वाढल्याने येत्या दोन-तीन आठवडय़ात कांद्याच्या किमती कमी होतील, असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केला.
नवी दिल्ली- महाराष्ट्रातून, देशातील इतर राज्यांतून कांद्याची आवक वाढल्याने येत्या दोन-तीन आठवडय़ात कांद्याच्या किमती कमी होतील, असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे गुरुवारी वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला.
खरीप हंगामातील कांद्याचे उत्पादन वाढणार असल्याबाबतची चर्चा काही शेतकरी व व्यापा-यांशी केल्यानंतर आपण या मतावर आलो आहोत, असे ते म्हणाले. काही प्रमाणात कांदा परदेशातून आयात केल्याने पुरवठा वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. कांद्याचे भाव वाढल्याने महागाईसुद्धा वाढली असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र गहू व तांदळाची किंमत स्थिर राहिली आहे.
कांद्याचा देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी कांद्याचा किमान निर्यात दर ४० टक्क्यांनी वाढवून ९०० डॉलर प्रतिटन केला. याआधी कांद्याचा किमान निर्यात दर ६५० डॉलर प्रतिटन होता.
पाकिस्तानचा कांदा मुंबईत दाखल
चीन आणि इजिप्तपाठोपाठ आता थेट पाकिस्तानमधून नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आयात करण्यात आला आहे. मात्र घाऊक बाजारात या कांद्याचे भाव ४० रुपये प्रतिकिलो असल्याने कांद्याच्या भावावर फारसा परिणाम झालेला नाही. पाकिस्तानमधून दोन कंटेनर कांदा आयात करण्यात आला. मात्र या कांद्याचा दर्जा चांगला नसल्याने विशेष विक्री झाली नसल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे.
कांद्याचे भाव लवकरच कमी होतील एवढा विश्वास जर आहे,तर भाववाढीमागील कारणही यांनाच ठाऊक असेल..