पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी रशियाचा दोन दिवसांचा अत्यंत महत्त्वपूर्ण दौरा पार पाडला. रशिया आणि भारत हे दोघेही पारंपरिक मित्र आणि अनेक क्षेत्रांत गेली सहा दशके परस्परांना सहकार्य करणारी मित्रराष्ट्रे. १९४७मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताला अनेक अडचणींना आणि समस्यांना तोंड द्यावे लागले व अडचणींची आणि समस्यांची ही मालिका चालूच राहिली.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी रशियाचा दोन दिवसांचा अत्यंत महत्त्वपूर्ण दौरा पार पाडला. रशिया आणि भारत हे दोघेही पारंपरिक मित्र आणि अनेक क्षेत्रांत गेली सहा दशके परस्परांना सहकार्य करणारी मित्रराष्ट्रे. १९४७मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताला अनेक अडचणींना आणि समस्यांना तोंड द्यावे लागले व अडचणींची आणि समस्यांची ही मालिका चालूच राहिली. जगातील लष्करी आणि आर्थिकदृष्टया बलाढय असलेल्या राष्ट्रांपैकी कुणीही भारताचा मित्र नव्हता.
उलट दुस-या महायुद्धानंतर तत्कालीन सोव्हिएत रशियाविरुद्ध शीतयुद्धात उतरलेल्या अमेरिका आणि इंग्लंडने स्वातंत्र्यानंतर भारतीय उपखंडात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन रशियाला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. विशेषत: अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री जॉन फॉस्टर डलेस यांनी फळणीनंतर निर्माण झालेल्या पाकिस्तानचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन पाकिस्तानशी दोस्तीचा हात पुढे करून व त्याच्यावर लष्करी आणि आर्थिक मदतीचा वर्षाव केला आणि पाकिस्तानला जवळ केले. तेव्हापासून पाकिस्तान व अमेरिका ही मित्रराष्ट्रे झाली व पाकिस्तान अमेरिकेच्या मदतीवर भारताविरुद्ध आक्रमक बनत गेले.
अमेरिकेच्या गोटात असलेली इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी इत्यादी राष्ट्रांची सहानुभूतीही तेव्हापासून पाकिस्तानलाच राहिली. अशा परिस्थितीत भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यावेळच्या सोव्हिएत रशियाशी दोस्ती केली व रशियाच्या नेत्यांनीही हातचे काही राखून न ठेवता भारताला सर्व प्रकारची मदत केली. भारताला लष्करी साहित्याची तर मदत वेळोवेळी केली. अमेरिकेने जेव्हा पाकिस्तानला लष्करी सामग्रीचा व आर्थिक मदतीचा ओघ चालू ठेवला होता तेव्हा भारताला त्या काळात रशियाच्या मदतीचा मोठा आधार होता. रशियाने भारताला केवळ लष्करी मदतच केली, असे नव्हे तर भारताला संयुक्त राष्ट्र संघात नेहमी आणीबाणीच्या क्षणी पाठिंबा दिला.
एवढेच नव्हे तर मोक्याच्या प्रसंगी भारताच्या बाजूने नकाराधिकार वापरला. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले तेव्हाही रशियाने भारताची बाजू घेतली. भारत आणि रशियाच्या या पारंपरिक मैत्रीचा अध्याय आजही पुढे सुरू आहे व पंतप्रधान डॉ. सिंग यांचा दौरा हे या अध्यायाचेच नवे पान आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग रशियाच्या दौ-यावर असताना त्यांना ‘मॉस्को स्टेट इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स’ने मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित केले. त्यावेळी झालेल्या समारंभात भाषण करताना सिंग यांनी या परंपरागत मैत्रीचा आवर्जून उल्लेख केला व या जुन्या मित्राचे भारताच्या दृष्टीने जराही महत्त्व कमी झालेले नाही, असे सांगितले. भारताच्या संरक्षणाच्या गरजांसाठी रशिया भविष्यकाळातही भारताचा जवळचा सहकारी असेल, असे सांगितले व रशियाच्या लष्करी मदतीबाबत कुणाच्या मनात शंका असेल तर ती सिंग यांनी आपल्या या भाषणाने दूर केली आहे.
दोन्ही देशांतील मैत्रीचे महत्त्व विशद करताना पंतप्रधानांनी केवळ रशियाच्या लष्करी मैत्रीवर भर दिला नाही, हे विशेष! या मदतीचा उल्लेख करताना सिंग यांनी या दोन्ही देशांतील नागरिकांना परस्परांविषयी जिव्हाळा वाटत आहे व या जिव्हाळ्यामुळेच दोन्ही देशांतील संरक्षणविषयक सहकार्य बळकट झाले पाहिजे, असेही सिंग यांनी सांगितले. केवळ संरक्षणच नव्हे तर अणुऊर्जा, संरक्षण, व्यापार अशा विविध क्षेत्रांतील सहकार्याचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी दोन्ही देशांतील संबंध आणखी दृढ होणार असल्याची ग्वाही दिली, हे महत्त्वाचे आहे.
या ग्वाहीला आजच्या बदललेल्या परिस्थितीत निश्चित महत्त्व आहे. कारण गेल्या काही वर्षात भारताने संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात खूप मोठी मजल मारली आहे. अलीकडेच भारताने संपूर्णपणे भारतात बनलेल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण केले व चीनसारख्या प्रतिस्पर्धी देशालाही धक्का दिला. भारताने चीनमधील शहरेही मा-याखाली येतील, अशी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनवली आहेत. अंतराळ संशोधनातही भारताने आघाडी घेतली असून भारताची मंगळावर यान पाठवण्याचीही तयारी सुरू आहे. अनेक क्षेत्रांत भारताने आपले नपुण्य सिद्ध केले आहे.
आज परिस्थिती सर्वच दृष्टीने बदलली आहे. फ्रान्स, जर्मनी, जपानसारख्या देशांनी भारताला विविध प्रकारची मदत देण्याची तयार दर्शवली आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी भारताला संरक्षणविषयक सहकार्य देऊ केले आहेच. भारत व रशियाची मैत्री आजही दृढ आहे व भविष्यातही दोन्ही देशांतील संबंध अधिक बळकट होणार आहेत. राजकीय परिस्थिती कितीही बदलली, शेजारी देशांमध्ये कोणतीही राजवट आली तरी भारताच्या या देशांबरोबरील संबंधातील अडचणी आणि अडथळे तेच आहेत, उलट ते वाढले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तान आणि त्याचा मित्र चीन यांनी जणू काय भारताविरुद्ध कट केल्याप्रमाणे आळीपाळीने सीमेवर गोळीबार व घुसखोरी करून कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. चीनने अरुणाचल प्रदेश, लडाखमध्ये सातत्याने घुसखोरीचे प्रकार चालूच ठेवले आहेत व सीमेवरील अनेक प्रदेशांवर चीन आपला हक्क सांगत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानमधील निवडणुकीत विजय मिळवून सत्तेवर आल्यानंतर भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शरीफ यांच्या भारताविरुद्धच्या कारवायांचा काळा इतिहास माहीत असणा-यांना शरीफ आपल्या शब्दाला कितपत जागतील, याची शंका होतीच. शिवाय पाकिस्तानमध्ये कोणताही नेता सत्तेवर आला तरी त्याच्या भारतविरोधी कारवाया आणि कारस्थाने थांबत नाहीत, असा भारताला अनुभव आहेच. शरीफ सत्तेवर आल्यानंतर काही दिवसांतच अधिक दाहकपणे हा अनुभव येत आहे.
भारत-पाक सीमेवर पाकिस्तानी सनिकांचा रोज गोळीबार आणि घुसखोरी सुरू आहे. सीमेवर गस्त घालणा-या भारतीय जवानांवर पाकिस्तानी सनिक केवळ गोळ्या झाडत नाहीत तर स्वयंचलित शस्त्रांनी त्यांना टिपून त्यांची हत्या करत आहेत. पाकिस्तानी सनिकांच्या लष्करी गणवेशात दहशतवाद्यांना घुसवण्याची कारवाई पाकिस्तानने करून भारतीय जवानांची हत्या घडवून आणली. रोज गोळीबार करून आणि दहशतवादी कृत्यांना साहाय्य करून पाकिस्तान पुन्हा कानावर हात ठेवत आहे.
सीमेवर सतत गोळीबार करून आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून अस्थिर व अशांत वातावरण निर्माण करून काश्मीर प्रश्न जगापुढे आणण्याचा पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा नेहमीच प्रयत्न सुरू असतो. याच प्रयत्नांतून नवाझ शरीफ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांना काश्मीर प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. पण अमेरिकेने मध्यस्थीची ही सूचना फेटाळून लावली आहे. उपखंडातील पाकिस्तानच्या या कारवाया पाहता व चीनचे आक्रमक पवित्रे लक्षात घेता रशियाची मैत्री भारताला किती मोलाची आहे व ती दृढ करण्याची किती आवश्यकता आहे, हे लक्षात यावे.
USSR ALWAYS GOOD WITH INDIA but india should not forget that our great Mr:- Lal bahdur Shashtris case