मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात येणा-या ‘बीएमएस’ या व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पाचव्या सेमिस्टरची लेखी परीक्षा ही सोमवारपासून सुरू होत आहे.
मुंबई- मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात येणा-या ‘बीएमएस’ या व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पाचव्या सेमिस्टरची लेखी परीक्षा ही सोमवारपासून सुरू होत आहे. मात्र या परीक्षेला बसलेल्या अल्केश दिनेश मोदी वित्तीय व व्यवस्थापन अभ्यासक्रम संस्थेच्या तब्बल १२० विद्यार्थ्यांना रविवारी सायंकाळपर्यंत हॉल तिकीट देण्यास विद्यापीठाकडून दिरंगाई करण्यात आली. त्याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना सोसावा लागला.
विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या अल्केश दिनेश मोदी वित्तीय व व्यवस्थापन अभ्यासक्रम संस्थेच्या १२० विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट विद्यापीठाच्या परीक्षा विभाग आणि एमकेसीएलने शनिवापर्यंत तयार केले नव्हते. विद्यापीठाची ही अनागोंदी अनेक सिनेट सदस्यांच्या लक्षात आल्याने त्यासाठी परीक्षा विभागाला धारेवर धरले. यामुळेच परीक्षा विभागाने रविवारी सायंकाळपर्यंत बहुसंख्य विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट देण्याची प्रक्रिया सुरू होती, तर अनेकांना याविषयीची माहितीही मिळालेली नव्हती. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत संभ्रम होता.
अल्केश दिनेश मोदी व्यवस्थापन संस्थेत बीएमएसच्या पाचव्या सेमिस्टरला असलेल्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सोमवारी सुरू होत आहे. मात्र या परीक्षेसाठी १२० विद्यार्थ्यांनी विविध निकषांची पूर्तता केली नसल्याचे कारण सांगून या संस्थेने विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट देण्याची कार्यवाही रोखली होती. यासंदर्भात संस्थेचे संचालक डॉ. सतीश रत्नपारखी यांच्याशी विचारणा केली असता मी खूप कामात व्यस्त असल्याने याविषयी काही बोलू शकत नसल्याचे सांगत उडवाउडवीचे उत्तर दिले.
यासंदर्भात सिनेट सदस्य संजय वैराळ आणि इतर सदस्यांनी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांच्याशी भेट घेऊन बीएमएसच्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट तात्काळ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी मागणी केली. विद्यार्थ्यांचा काहीही दोष नसताना ऐन परीक्षेच्या पूर्वी दिनेश मोदी व्यवस्थापन संस्थेकडून नाहक त्रास दिला जात असल्याची बाबही परीक्षा नियंत्रकांच्या निदर्शनास आणून दिली असल्याची माहिती सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी ‘प्रहार’शी बोलताना दिली.
मुंबईविद्यापीठातील बीएमएसच्या विभागातील कर्मचार्याकडेच प्रवेशअर्ज आले नसतील,परंतु संजय वैराळ, युवा सेना सिनेट सदस्य यानी जेव्हा तेथील परीक्षा नियंत्रक, दिनेश भोंडे याना जेव्हा जाब विचारला तेव्हा बीएमएसच्या प्रत्येक महाविद्यालयातून प्रवेशअर्ज मागवण्यात आले असतील.जर प्रवेशअर्ज वेळीच आले असते तर तेथील डेटाएंट्री ओपरेटरनि ते वेळीच फिडिंग करून दिले असते. विद्यापीठातील कर्मचा-यास त्यांचे मासिक वेतन व अतिरिक्त पगार (ओवरटाइम)वेळच्या वेळेवर देण्यात येते, ते जर वेळेवर दिले नसते तर त्यानी हे मुद्दामून केले असे विद्यार्थी वर्ग प्रशासन विभागास बोलू शकतात. तसे बघाल तर तेथील कर्मचारी संघटनासुद्धा प्रत्येक विभागात जाउन कोणत्या विभागात किती काम असते आणि त्याकरिता लागणारे मनुष्यबळ भले तात्पुरत्या कर्मचारी वर्ग घेऊन का होईना ते बळ पुरवण्याच्या पुरेपूर प्रयत्नात असतात. त्यांची कार्यालयीन कामे बघून ते इतरत्र कोठे जागा रिक्त आहे का? याच्या चौकश्या भरपुर प्रमाणात करतात. प्रवेशअर्जाचि चौकशी कर्मचार्याने का करावी