जव्हारच्या आदीवासी भागात जमीनीखालून कोणतातरी गूढ आवाज बुधवारी पहाटे ऐकू आल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
ठाणे – जव्हारच्या आदीवासी भागात जमीनीखालून कोणतातरी गूढ आवाज बुधवारी पहाटे ऐकू आल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. मात्र हा आवाज नेमका कुठून येतो, कसा येतो हे कळत नाही.
सकाळी साडे सहा वाजता स्थानिकांना पहिल्यांदा आवाज ऐकू आला. त्यानंतर नऊ वाजता दोन वेळा पुन्हा या आवाजाची पूनरावृत्ती झाली. या गूढ आवाजाने भयभीत झालेले सर्व आदीवासी घराबाहेर पडले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातही हाच आवाज ऐकू आला होता असे काही स्थानिकांचे म्हणणे आहे.
हा आवाज मोठा नसला तरीही त्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरत आहे, असे विक्रमगडचे आमदार चिंतामण वांगा यांनी सांगितले. दरम्यान, या आवाजाचा माग काढण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या संबंधित अधिका-यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ak tar ha avaj daivik asu shakato… nahitar dusar karan…bicharya adivasimadhe ghbarat pasaravun javwhr chi jaga konala tari balakavaychi asel….