यूपीए सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘आधार’ कार्डाच्या अंमलबजावणीतील मोठा अडथळा दूर झाला आहे.
नवी दिल्ली – यूपीए सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘आधार’ कार्डाच्या अंमलबजावणीतील मोठा अडथळा दूर झाला आहे. केंद्रीय गृहखात्याने ‘आधार’ला पूर्ण सहकार्य देऊ केले असून त्याला सर्वत्र मान्यता मिळणार आहे. या कार्डामुळे लाभार्थीची ओळख पटवणे शक्य होईल.
सर्व राज्य सरकारना पाठवलेल्या पत्रात केंद्रीय गृहखात्याने सांगितले की, एका नागरिकाला आधार क्रमांक मिळाल्यानंतर ओळखपत्र म्हणून तो कुठेही वापरता येऊ शकतो. आधार क्रमांकाच्या सहाय्याने ‘केवायसी’ म्हणून बँकेत खाते उघडता येऊ शकते.
ऑनलाइन तिकीट बुकिंग, पासपोर्टसाठी अर्ज करताना ते वापरता येऊ शकते. स्थलांतर करणा-या नागरिकांना या आधार कार्डचा चांगला उपयोग होऊ शकतो. या कार्डच्या सहाय्याने सरकारला अनेक योजना सुरळीतपणे राबवता येऊ शकतात.
माहिती शक्ती आहे
माहिती शक्ती आहे