९ सप्टेंबरला चीनमध्ये पतंग उत्सव असतो. तर आपल्याकडे मकरसंक्रातीला पतंग बदवण्यात येतो. मकरसंक्रातीच्या दिवशी आकाशात विविध रंगांचे-ढंगांचे पतंग उडत असल्याचे मनोहरी चित्र आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहत आहोत. पण पतंग उंच उडण्यासाठी आणि त्यांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा पक्ष्यांसाठी प्राणघातक होत आहे. त्यामुळे राज्यात अशा मांजावर बंदी आणण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्याचे स्वागत करताना या निर्णयाची कडक अंमलबजावणी कशी करायची, यासाठीचे नियोजन सरकारला आखावे लागणार आहे.
मकरसंक्रातीला मुंबई, अहमदाबाद, दिल्लीसह देशात मोठया प्रमाणात पतंग उडवण्यात येतो. संक्रांतीची मजा म्हणून आपण पतंग उडवतो. पण या पतंगासाठी वापरण्यात येणा-या मांजात काचेचे बारीक तुकडे असतात. पतंगाच्या मांजाला पक्ष्यांच्या पायांचा स्पर्श झाल्यास ते कापले जातात. त्यामुळे संक्रांतीनंतर दुस-या दिवशी असे अनेक गंभीर जखमी झालेले पक्षी प्राण्यांच्या दवाखान्यात आणण्यात येतात.
प्राण्यांसाठी काम करणा-या ‘पेटा’ या संस्थेने मांजावर सर्वत्र बंदी घालण्यात यावी यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घेऊन महाराष्ट्राला मांजावर बंदी घालण्यासंदर्भात पत्र पाठवले होते. त्यानुसार राज्य सरकारने मांजावर बंदी आणली आहे. त्यानुसार केवळ मांजावर नव्हे तर मांजाची विक्री आणि साठवणुकीसाठीही बंदी घालण्यात?आलेली आहे. ही बंदी केवळ मकरसंक्राती पुरती मर्यादित राहू नये, ती कायमस्वरूपी असणे आवश्यक आहे. कारण आपल्याकडे फक्त मकरसंक्रांतीलाच पतंग उडवत नाहीत तर पावसाळा सोडून अन्य मोसमातही पतंग उडवण्यात येतात. पतंगाच्या षौकामुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.
छंद, आवड म्हणून पतंग उडवण्याची परंपरा मध्ययुगीन काळापासून आहे. अशा पतंगाच्या विविध स्पर्धाही त्याकाळी होत असत. पण काळ जस जसा बदलत जातो, त्यानुसार त्या त्या काळाची परिमाणेही बदलत जात असतात. त्यामुळे सध्याच्या काळात पतंग उडवणे हा आपल्यासाठी एकवेळ छंद, आवड असू शकते. पण त्यातून बिचा-या मुक्या पक्ष्यांच्या जीवावर बेतत असेल तर ते चुकीचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने मांजावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचे स्वागत करताना अशा मांज्याच्या पतंग आपण उडवणार नाही. कोणी जर अशा मांज्याचा साठा करत असेल तर त्याबाबतची माहिती पोलीस यंत्रणांना देणे गरजेचे आहे. त्याशिवाय मांजाची खरेदी व विक्री थांबणार नाही. पक्षी आपल्यासारखे बोलत नाहीत. पण त्यांनाही वेदना होत असतात. या वेदनांची दखल मानवाने घेतलीच पाहिजे.
पतंगा वॉर बंदी आणने गरजेचे आहे कारण यामुळे पर्यावरणयाचे संतुलन बिघडते.