दोन वर्षापूर्वी म्हाडाने काढलेल्या सोडतीतील विजेत्यांपैकी ९१ गिरणी कामगारांनी मुदतीत घराची रक्कम न भरल्याने त्यांच्या घराचा ताबा रखडला आहे.
मुंबई – दोन वर्षापूर्वी म्हाडाने काढलेल्या सोडतीतील विजेत्यांपैकी ९१ गिरणी कामगारांनी मुदतीत घराची रक्कम न भरल्याने त्यांच्या घराचा ताबा रखडला आहे. रक्कम पूर्ण भरली असली, तरी ती मुदतीत भरणे आवश्यक होते. त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी हा विषय म्हाडा आता प्राधिकरणापुढे मांडणार आहे.
१९ गिरण्यांच्या जमिनीवर काढण्यात आलेल्या सोडतीत ६ हजार ९२५ गिरणी कामगार विजेते ठरले. आतापर्यंत जवळपास पावणेसहा हजार घरांचा ताबा मिळाला आहे. यातील ९१ अर्जदारांची पात्रता निश्चित झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या मुदतीत घराची रक्कम भरली नाही. त्यामुळे त्यांना घराचा ताबा द्यायचा की नाही, या पेचात म्हाडा आहे.
त्यामुळे हा पेच सोडवण्यासाठी म्हाडा हा विषय प्राधिकरणापुढे मांडणार आहे. घराचा ताबा मिळावा यासाठी अर्जदारांना म्हाडा कार्यालयात फे-या माराव्या लागत आहेत. पै-पै करून उशिरा का होईना अर्जदाराने घराची रक्कम भरली. पण, घराचा ताबा रखडल्याने घर हातातून जाणार तर नाही ना, अशी भीती गिरणी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आहे.
घराची रक्कम पूर्ण भरली आहे तरी देखिल ताबा देत नाहीत मि काय करु