राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या अभिभाषणात उल्लेख केलेल्या योजनांची मोदी सरकारने प्रत्यक्ष अंमलबजावणी करून दाखवावी, असे आव्हान मंगळवारी कॉँग्रेसने दिले.
नवी दिल्ली- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या अभिभाषणात उल्लेख केलेल्या योजनांची मोदी सरकारने प्रत्यक्ष अंमलबजावणी करून दाखवावी, असे आव्हान मंगळवारी कॉँग्रेसने दिले. यूपीएने राबवलेल्या विविध योजना नवीन पॅकिंगमध्ये मोदी यांनी सादर केल्या आहेत.
लोकसभेत आमची सदस्यसंख्या कमी असली तरीही जनहिताच्या योजना राबवण्यासाठी आम्ही सरकार दबाव ठेवणार आहोत. लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, महाभारतात कौरवांच्या तुलनेत पांडव संख्येने कमी होते. मात्र तरीही पांडवांचा पराभव त्यांना करता आला नाही. काँग्रेस पक्ष पुन्हा उभा राहून सत्तेवर येईल. रालोआने आपण कायम सत्तेत राहू असे समजू नये, असा टोलाही त्यांनी मारला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनावरील प्रस्तावावर बोलताना खर्गे म्हणाले की, नवीन सरकारच्या जाहीरनाम्यात नवीन काहीच नाही. मोदी यांनी केवळ नवीन पॅकेजिंग केले आहे. भाजपकडे मार्केटिंगचे कौशल्य चांगले आहे. मात्र, केवळ बोलून गरिबांचे पोट भरणार नाही. तुम्ही प्रचारतंत्रावर देश चालवू शकत नाहीत. लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाल्याबद्दल अहंकार दाखवू नका, असा टोला त्यांनी मारला.
काँग्रेसच्या जाहीरनाम्याची मोदी सरकारकडून नक्कल
केंद्रामध्ये स्थापन झालेल्या नव्या सरकारकडून गेल्या दहा वर्षात आम्ही राबवलेल्या जाहीरनाम्याची नक्कल केली जात असून रालोआने ज्या योजना जाहीर केल्या आहेत, त्यातील ९० टक्के योजना आम्ही यापूर्वीच सुरू केल्या होत्या, असा आरोप काँग्रेसने केला आहे. राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत केलेल्या आभारप्रदर्शन ठरावावर बोलताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हा आरोप केला.
लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी भाजपचे अभिनंदन केले. मात्र, त्याच वेळी लोकांनी या पक्षावर टाकलेल्या जबाबदारीची आठवणही त्यांनी भाजपला करून दिली. जनादेश, सत्ता आणि पैसा कधीही कोणा एकाकडे कायमचे राहत नाही, असे त्यांनी सांगितले.
“चोरांच्या उलट्या बोंबा” ही म्ह्ण आठवली.
अरे हे कसले पांडव हे तर दानव! राणे साहेब आता तरी ह्या दानावांक सोडून मानवा कडे येवा! कोकणाक तुमची गरज असा पण कॉंग्रेसच्या करनटेपनाक लोक कनटाले ह्यत म्हणून साहेब पडले ह्यो तुमचो पराभव नाय हा ह्यो कोन्ग्रेचो पराभव असा! … पुन्हा एकदा भराडे मातेचा दर्शन घेवा..कोकणचो विकास होच आपलो ध्येय हा!