राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या शिबिरांमध्ये हिंदू दहशतवादाला खतपाणी मिळत असल्याचे खळबळजनक विधान केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
जयपूर– राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या शिबिरांमध्ये हिंदू दहशतवादाला खतपाणी मिळत असल्याचे खळबळजनक विधान केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. जयपूर येथे सुरु असलेल्या चिंतन शिंदे यांच्या या विधानामुळे नव्या वादाला सुरुवात केली आहे.
आरएसएस आणि भाजपच्या शिबिरांमध्ये सहभागी झालेले लोक समझौता एक्स्प्रेस, मक्का मशिद आणि मालेगाव सारख्या ठिकाणी स्फोट घडवून आणतात आणि अल्पसंख्याकांवर आरोप करतात, असे शिंदे यांनी सांगितले. यासंदर्भात सरकारकडे पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार याबाबात गंभीर असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी, इशान्य भारतातील तणाव आणि नक्षलवाद हे देशापुढील महत्त्वाचे प्रश्न असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, शिंदे यांच्या या विधानावर भाजपने आक्षेप नोंदवला आहे. तसेच काँग्रेसने माफी मागण्याची मागणी केली आहे. शिंदे यांच्याविधानावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजप नेते मुख्तार अब्बास नखवी यांनी केली आहे.
तुम्ही देशाचे केंद्रीय गृहमंत्री आहात, संपूर्ण देशाची कायदा आणी सुव्यवस्था (आणी सत्ता सुध्दा) आणी कुठल्याही रंगाचा दहशतवाद असला तरी नुसती तोंडाची वाफ आणी देशाचा वेळ कशाला दवडता, देशाच्या अल्पसंख्यकांना न्याय मिळवून देताना आणी देशात घुसखोरी करणा-यांविरूध्द तुमची पावले(पाय) जर कोणी ओढत असेल, देशाविरूध्द जर षड्यंत्र करत असेल तर नुसते गंभीरपणे विचार आणी सतर्क राहून कसे चालेल असा नुसता बाष्कळ्पणा न करता कृती करा, दोषींना पकडा, डांबा कोठडीत, कारवाई करा. अहो, अशी षड्यंत्रे अनेक वर्षांपासून जर आपल्या देशात चालू आहेत अस म्हणता, तर मग देशाच्या गृहखात्याचे हे अपयश नाही का. तुमच्याकडे एखाद्या गल्लीबोळाची सुरक्षा हातात नाही तर संपूर्ण देशाची आहे ह्याची जाणीव ठेवा.
गृहमंत्र्यांची बोलण्याआधी किमान गृहपाठ तरी करावा..एका जबाबदार पदावर असताना धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान करणे अत्यंत अशोभनीय…