राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेल्या शिकवणीमुळेच सर्जिकल स्ट्राईक होऊ शकले, असे वादग्रस्त विधान संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सोमवारी केले.
अहमदाबाद- पाकव्याप्त काश्मिरात लष्कराच्या कारवाईचे संपूर्ण श्रेय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिल्याने देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. महात्मा गांधीजींची जन्मभूमी असलेल्या गुजरातचे पंतप्रधान व गोव्याचे संरक्षणमंत्री आणि सर्जिकल हल्ल्याचे समीकरण वेगळेच होते. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेल्या शिकवणीमुळेच सर्जिकल स्ट्राईक होऊ शकले, असे वादग्रस्त विधान पर्रिकर यांनी सोमवारी केले.
येथील निरमा विद्यापीठात आयोजित केलेल्या ‘आपले लष्कर जाणून घ्या’ या कार्यक्रमात बोलताना पर्रिकर म्हणाले की, उरी हल्ल्यात आपले १८ जवान मारले गेल्यानंतर पंतप्रधान मोदी व माझ्यावर मोठेच संकट उभे ठाकले होते. सोशल मीडिया व प्रसारमाध्यमातून आमच्यावर चहुबाजुनी टीका होत होती. अखेर २९ सप्टेंबरच्या रात्री सर्जिकल हल्ला झाला. त्यानंतर देशातील वातावरण बदलून गेले. पंतप्रधान मोदी व मी संघाच्या शिकवणीत तयार झालो. त्यामुळेच दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणारा सर्जिकल हल्ला शक्य झाला, असे त्यांनी सांगितले.
गेल्या पाच ते सहा वर्षापासून पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. याबाबतची आकडेवारी तुम्ही पाहू शकता. आता भारताकडून अत्यंत प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले जात आहे.
सर्जिकल हल्ल्यानंतर काही राजकीय नेते पुरावे मागत होते. त्यावर पर्रिकर म्हणाले की, जेव्हा भारतीय लष्कराचा मुद्दा उपस्थित केला जातो तेव्हा कोणीही शंका घेऊ नये. भारतीय लष्कर हे जगातील सर्वोत्तम, व्यावसायिक व शौर्य गाजवणारे सैन्य आहे. त्यामुळे लष्कराकडून कोणीही पुरावे मागावेत, असे मला वाटत नाही.
सर्जिकल हल्ल्यानंतर देशात दोन महत्वपूर्ण बदल घडले. भारतीयांमध्ये एकात्मतेची भावना वाढीस लागली आणि सुरक्षेबाबत राष्ट्रीय सुरक्षेबाबत मोठी जनजागृती झाली आहे, असे त्यांनी सांगितले. सुरक्षेत काही त्रूटी राहिल्या का ? असे विचारताच पर्रिकर म्हणाले की, काही त्रूटी असल्यास त्यात सुधारणा केली जाईल. सरकार राष्ट्रीय सुरक्षेाबाबत अत्यंत गंभीर आहे.
गुजरातमध्ये पाकिस्तानातून काही लोक अवैधरित्या घुसत आहेत, असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की , सीमावर्ती भागात सीमा सुरक्षा दलाने सुरक्षा कडक केली आहे. हा भाग अत्यंत दुर्गम व दलदलीचा असून तेथे कुंपण घालणे शक्य नाही. मात्र आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत असून सुरक्षेतील त्रूटी दूर करत आहोत. त्यामुळे अवैध व्यक्तीला भारतात घुसायला मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला.
राष्ट्रीय सुरक्षेबाबत जागृती वाढली
सर्जिकल हल्ल्यानंतर देशात राष्ट्रीय सुरक्षेबाबत जागृती वाढली. देशभरातून मला संशयास्पद हालचालींचे ईमेल्स येत आहेत. नागरिकांना एखादी चुकीची घडताना दिसल्यास त्याची माहिती पोलीस किंवा मला ईमेलने पाठवा. मला येणारे अर्ध्याहून अधिक ईमेल्स हे संशयास्पद हालचालींचे असतात. असंख्य माजी सैनिकांनी देशाची सेवा करण्याची संधी मागितली आहे. ते निवृत्त झाले आहेत, मात्र लढण्याची वृत्ती अजूनही कायम आहे.
khup motta Vaagh maarlat.! Aata maase pakdit raahu naka..husshar raaha.dushman chavtallelaa aahe.kahihi karoo shakel.!!!