श्रीलंकन समुद्र सीमेच्या जवळ असणा-या कॅचाथिवू टापूजवळ मच्छीमारासाठी गेलेल्या तामिळनाडूतील २७०० मच्छीमारांवर श्रीलंकन नौसैनिकांनी हल्ला केला.
रामेश्वरम – श्रीलंकन नौदलाकडून भारतीय मच्छीमारांना त्रास देणे सुरुच असून, बुधवारी रात्री श्रीलंकन समुद्र सीमेच्या जवळ असणा-या कॅचाथिवू टापूजवळ मच्छीमारासाठी गेलेल्या तामिळनाडूतील २७०० मच्छीमारांवर श्रीलंकन नौसैनिकांनी हल्ला केला.
कॅचाथिवू टापूजवळ मच्छीमारी सुरु असताना, बोटीतून आलेल्या श्रीलंकन नौसैनिकांनी भारतीय मच्छीमारांवर दगडफेक केली आणि सहा बोटींवरील मच्छीमारीच्या जाळया कापून टाकल्या तसेच या भागात मच्छीमारी करु नका अशी धमकीही दिली.
रामेश्वरम येथे अधिका-यांनी ही माहिती दिली. दोन दिवसापूर्वीच चुकून श्रीलंकेच्या सागरी हद्दीत गेलेल्या २५ भारतीय मच्छीमारांना श्रीलंकन नौदलाने अटक केली होती. भारत आणि श्रीलंकेच्या अटकेत असलेल्या मच्छीमारांच्या सुटकेसाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु असताना, श्रीलंकन नौदल सातत्याने भारतीय मच्छीमारांवर कारवाई करत आहे.
meri billi aur muzse myav.