माणूस माणसांपासून दुरावला जात आहे. विशेषत: अल्पसंख्याकांकडे कायम संशयाने पाहिले जात आहे. त्यामुळे अल्पसंख्याक तरुणांच्या मनातही कायम असुरक्षिततेची भावना येत आहे. यावेळी अल्पसंख्याकांविषयीची द्वेषाची भावना ज्यांच्या मनात आहे ती कमी करीत असतानाच अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटेल यासाठी ठोस प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग काम करीत असतो. या आयोगावर अॅड. सुलेखा कुंभारे यांची नुकतीच नियुक्ती झाली.
आंबेडकरी विचारांचा वारसा कुंभारे यांना वडील प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्याकडून मिळाला. अनेक आंदोलनात त्या लहानपणापासूनच सहभाग घेतल्यामुळे समाजभान मनामध्ये हळूहळू कोरले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता आणि स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकार देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचले पाहिजेत म्हणून धडपडणारी एक पिढी आहे, त्या पिढीच्या प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सत्ता असल्याशिवाय आपल्या मनातील योजनांना आकार देता येणार नाही, त्यामुळे त्यांनी विधानसभेच्या निवडणुकाही लढविल्या. १९९९ साली त्या कामठीतून निवडून आल्या होत्या. आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपदाची संधी त्यांना मिळाली आहे. पाणीपुवरठा आणि स्वच्छतामंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांच्यावर टालेल्या जबाबदारीला त्यावेळी त्यांनी चांगला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.
राजकीय तडजोडीमध्ये अलीकडे त्यांची भारतीय जनता पार्टीशी जवळीक वाढल्याची चर्चाही होती. महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर त्यांना राज्यमंत्रीपद दिले जाईल, अशीही चर्चा होती. मात्र, आपल्याला आता राजकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक कामात रस असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले. कदाचित सामाजिक कार्याकडे असलेला त्यांचा ओढा लक्षात घेऊनच राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगावर त्यांची नियुक्ती करण्यात आली असावी.
अल्पसंख्याक समाजातील लोकांचे प्रश्न सोडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची मोठी जबाबदारी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगावर आहे. अल्पसंख्याकांमध्ये मुस्लीम, बौद्ध, शीख, पारशी, जैन, ख्रिश्चन समाजघटकाचा समावेश आहे. अल्पसंख्याकांच्या न्याय्य हक्कांबरोबरच त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व शैक्षणिक पुनरुत्थानासाठी प्रयत्न करू, असा विश्वास कुंभारे यांनी व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता सांगितली पण ती कोणालाच नको आहे, मला कसे जास्त भेटेल हे सगळे बघतात. मग ते जातीच्या आधारावर असो किंवा धर्माच्या.
त्यांनी बंधुता सांगितली पण ती फक्त जाती पूरती व आपल्या घरा पूरती मर्यादित आहे. आणि स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार झाला आहे.
“ध्यास सामाजिक समतेचा” घेतानाच जातीच्या आणि धर्माच्या आधारावर केली जाणारी केवढी हि असमानता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने लोकांना फसवणे बंद करा!!