कुडाळ मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पराभवाने सिंधुदुर्गसह कोकणचे व महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्ग- कुडाळ मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव ही बातमी एकूण व्यक्तीश: मला मोठा धक्का बसला आहे. नारायण राणे यांच्या पराभवाने सिंधुदुर्गसह कोकणचे व महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली आहे.
खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर पुढे म्हणाले, गेल्या २० वर्षात नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या विकासासाठी जे देदीप्यमान योगदान दिले त्यांच्याकडे मतदारांनी दुर्लक्ष केले याचे आश्चर्य वाटते. सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असणा-या आणि राज्य स्तरावर वजनदार नेता म्हणून ख्याती असणा-या नेत्याचा पराभव कुडाळ मतदारसंघातील मतदारांनी करणे ही अतिशय दु:खदायक घटना आहे, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
नितेश राणे यांना शुभेच्छा
त्याचबरोबर कणकवली विधानसभा मतदारसंघात प्रमोद जठार यांच्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभा घेऊनही नितेश राणे यांनी मोठय़ा मताधिक्क्याने ३० वर्षे भाजपकडे असलेली जागा काँग्रेसकडे खेचून आणली. ही फारच अभिमानाची गोष्ट असून त्यांच्या राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, असेही त्यांनी म्हटले आहे.
राणे साहेबांचा पराभव सुन्न करणारा आहे. असला कर्तबगार , सडेतोड , कर्मवीर, निर्मल चारित्र्य असलेला नेता जनतेने नाकारावा हे महाराष्ट्राचे नाही तर भारताचे दुर्दैव आहे.
राणे साहेबांनी मात्र जनतेला वाराय्वर सोडू नये हीच विनंती . लेकरू चुकते पण आईबाप त्याला माफ करतात.
नितेश ला विधानसभा गाजवणार यात शंकाच नाही.
खरोखर दुर्दैवि प्रकार झाला ahe. असा धडाडीचा आणि जिद्दी नेता पडणे हे खरोखर नुकसानदायक आहे . महार्ष्ट्राच्या हितासाठी लढणारा आणि प्रचंड कामसू नेता ह्यावेळी विधानसभेत nasel. आता कळेल लोकांना राणे साहेब काय होते ते.
NARAYAN RANE SAHEB HE KOKANCHE SHARAD PAWAR AHET, ASHA DHADAKEBAJ KARYASMARAT NETYALA HARUN KOKANCHE BHARUN N NIGHANARE NUKSAN KOKANCHA MANSANA SOSAVE LAGEL. KOKNI MANSACHE DURDAIV MHANAVE LAGEL.
खरच धक्कादायक निकाल आहे — राणे साहेब जिंकायला पाहिजे होते — त्याच्या सारख्या आक्रमक नेत्याची विधिमडळात उणीव जाणवेल — नक्कीच कोंकणातल्या जनतेला केलेली चूक कळेल व राणे साहेबांना पुन्हा निवडून देयील…