Friday, May 3, 2024
Google search engine
Homeमजेत मस्त तंदुरुस्तस्थूलपणा आणि आयुर्वेद

स्थूलपणा आणि आयुर्वेद

बदलत्या जीवनशैलीमुळे अलीकडे तारुण्यातच लठ्ठ होण्याचं प्रमाण वाढलं आहे. शरीरातील प्रत्येक अवयव ही ईश्वराने दिलेली देणगी आहे. त्याचा योग्य वापर करायला शिकलं पाहिजे. अन्यथा वेगवेगळे विकार आपली सोबत करू शकतात. स्थूलपणावर आयुर्वेदात उपाय आहेत. त्याचा वापर केल्यास आपलं शरीर बेढब होणार नाही.

सडपातळ, लवचिक शरीर हे तारुण्याचं एक लक्षण असतं. ही देणगी नसणारी व्यक्ती तरुण असली तरीही तरुण वाटत नाही. आजकाल तर फिजिकल फिटनेसचा जमाना आहे. त्यामुळे शरीर सडपातळ ठेवण्याकडे, त्यासाठी व्यायाम, डाएटिंग वगरे करण्याकडे अनेकांचा कल असतो. आयुर्वेदही या दृष्टीने व्यक्तीला अत्यंत उपयुक्त मदत करू शकतो.

वेळीच काळजी घेतल्यास लठ्ठपणा आटोक्यात आणता येतो. मात्र त्यासाठी आहार, विहार आणि उपचार यांची योग्य दिशा ठरवायला हवी. काही नियमांचं काटेकोर पालन करायला हवं. पथ्यपाणी, व्यायाम, औषधी उपाययोजना यांचा विचार रुग्ण अगोदर का करीत नाहीत? स्थूलपणाचं मूळ कारण कफ या दोषाच्या प्रवत्तीत आहे. कफ म्हणजे मंद, सावकाश, मुंगीच्या गतीने हालचाल. त्यामुळे मेद, चरबी वाढतेय हे लक्षात येईपर्यंत बराच वेळ झालेला असतो. त्यानंतर मनुष्य थोडा आळस आणि चुकीचे उपचार करतो. मग मात्र रोग पक्कं घर करून बसतो. काही पालकांना त्यांची मुलं लठ्ठ होत आहेत हेच पटत नाही. आपली मुलं सुदृढ आहेत असंच त्यांना वाटतं. सुदृढ आणि सुजलेलं शरीर यातील फरक त्यांच्या लक्षात येत नाही.

आनुवंशिकता आणि बीजदोष ही लठ्ठपणाच्या दृष्टीने गुंतागुंतीची कारणं असतात. मुलांकडे नीट लक्ष देणं, त्यांच्यावर अवाजवी बंधनं घालणं यामुळेही त्यांच्या शरीरात चरबी साठू लागते. आजचं जीवन यांत्रिक बनलं आहे. त्यामुळे अनेक गोष्टी विनाश्रम मिळण्याची व्यवस्था झाली आहे. व्यायामाचा, हालचालीचा अभाव, बैठं काम आणि सुखासीन जीवन हा अनेकांचा जीवनक्रम बनला आहे. मेद वाढवणारी दुपारची झोपही त्यात येतेच. थंड, जड, गोड, आंबट खारट पदार्थाचा अतिरेकी वापरही लठ्ठपणा वाढवायला कारण ठरतो. मेदवर्धक आणि मांसवर्धक पदार्थाचा अतिरेकी आहारही त्यात भर घालतो. कारण त्यामुळे फक्त मेद, मांसधातूचं पोषण अधिक होतं.

फास्ट फूडच्या नावाखाली अलीकडे अनेक जण पोटात वाट्टेल ते ढकलत असतात. त्यात मांसाहार, मद्यपान, आइस्क्रीम, मेवामिठाईचा आस्वाद यांची भर पडते. तेलकट, तूपकट आहारही लठ्ठपणाच्या दृष्टीने हानिकारक असतो. खाण्यात गहू, हरभरा, कडधान्य, कांदा, बटाटा, साखर यांचं प्रमाण वाजवीपेक्षा जास्त असणं हेही मेदवाढीचं एक महत्त्वाचं कारण ठरतं.

अनेक स्त्रियांना विटाळ कमी जातो, पाळी अनियमित असते. त्यामुळे त्यांचं वजन वाढतं. पाळी चुकवण्यासाठी गोळ्या, औषधं घेणं किती हानिकारक ठरत असेल याची कल्पना केलेली बरी. उपाययोजना करण्यासाठी या कारणांचा शोध घेणं आणि लक्षणं समजावून घेणं अर्थातच आवश्यक आहे.

लठ्ठपणाच्या विकाराची काही प्रमुख लक्षणं उंचीच्या मानाने वजन जास्त असणं, पोट, छाती, कुल्ले, मांडया मान या ठिकाणी बेढबपणा येणं, थोडयाशा श्रमाने धाप लागणं, पायावर, चेह-यावर सूज येणं, लघवी कमी होणं, लघवीला पुन्हा पुन्हा जावं लागणं, स्त्रियांना विटाळ कमी जाणं, अंगाला खाज सुटणं, त्वचा फाजील स्निग्ध दिसणं, कार्यशक्ती कमी होणं, विश्रांती घ्यावीशी वाटणं, जास्त झोप येणं, अंगाला घाण वास मारणं अशी लठ्ठपणा येण्याची लक्षणं असू शकतात. लठ्ठपणावर उपाय करायला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम वजन पाहणं आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर कोणते स्नायू शिथिल आहेत, कुठे चरबी वाढली आहे हेही पाहायला हवं, त्यामुळे नेमका व्यायाम सुचवणं सोपं जातं.

मलमूत्र, घाम यांचा वेग आणि परिणाम पाहणंही आवश्यक आहे. लागलेली भूक, घेतलेला आहार आणि प्यायलेलं पाणी यामानाने मल, मूत्र आणि घाम यांचा निचरा होत नसेल तर त्याचा परिणाम वजन वाढण्यात होणारच. स्त्रियांच्या बाबतीत पाळीच्या अनियमितपणाचा हाच परिणाम संभवतो. लठ्ठपणा, स्थूलता किती जास्त आहे हे ठरवण्यासाठी आनुवंशिकतेचा विचार उपयोगी पडतो. मलमूत्र साफ होण्यासाठी शोधनाचे उपचार उपयोगी पडतात. स्त्रियांची पाळी नियमित होण्यासाठी उपचार करावे लागतात. शरीरातून पुरेसा घाम निघत नसेल तर त्यासाठीही उपाय योजता येतात. रुक्ष अभ्यंग, व्यायाम यांचे नाना प्रकार उपयोगात आणता येतात. मात्र उपवास, लंघन, अशा उपायांनी थकवा, रसक्षय आणि पंडुता येणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

आयुर्वेदात लठ्ठपणावर काही अनुभविक उपचार आहेत. मलप्रवृत्ती साफ होत नसल्यास कपिलादी वटी सहा गोळ्या आणि एक चमचा एरंडहरीतकी चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावं. त्रिफळा गुग्गुळ आणि आरोग्यवर्धिनी प्रत्येकी सहा गोळ्या अशा बारा गोळ्या दोन वेळा रिकाम्या पोटी सकाळी आणि सायंकाळी बारीक करून गरम पाण्याबरोबर घ्याव्यात. पाणी पिऊनही लघवी नियमित होत नसल्यास वरीलप्रमाणे औषधं घ्यावीत. रसायन चूर्ण सकाळी आणि सायंकाळी एक चमचा घ्यावं. मासिक पाळीत गर्भाशयाची स्वच्छता व्यवस्थित होत नसल्यास कुमारी आसव चार चमचे समभाग पाण्याबरोबर दोन्ही जेवणांनंतर घ्यावं.

स्थूल शरीराबरोबर गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, संधिवात, आमवात ही लक्षणं असल्यास त्रिफळा गुग्गुळ, लाक्षादि गुग्गुळ, सिंहनाद गुग्गुळ आणि आरोग्यवर्धिनी प्रत्येकी तीन गोळ्या बारीक करून सकाळी आणि सायंकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्याबरोबर घ्याव्यात. दोन्ही जेवणांनंतर सौभाग्य सुंठ अर्धा चमचा घ्यावी. पंडुता, मुखशोध, पादशोध या तक्रारी असल्यास चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादि गुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ आणि लाक्षादि गुग्गुळ प्रत्येकी तीन गोळ्या बारीक करून गरम पाण्याबरोबर घ्याव्यात. शुद्ध गुग्गुळ गोळ्या सकाळी, सायंकाळी आणि रात्री तीन वेळा अशा सहा गोळ्या पाण्यात विरघळवून घ्याव्यात. यामुळे शरीरात उष्णता वाढते. ज्यांना मानवेल त्यांनीच घ्यावं. चांगला कात तीन ग्रॅम, गुग्गुळ दहा ग्रॅम असं सकाळ, सायंकाळ दोन वेळा गरम पाण्याबरोबर घ्यावं.

पुरेसा घाम येत नसल्याने स्थूलपण वाढलेला असल्यास त्रिफळा, वाविडग चित्रक, नागरमोथा, दशमुळं, बाहवा, एरंडमूळ, देवदार आणि दारुहळद प्रत्येकी दोन ग्रॅम अशी एक पुडी चार कप पाण्यात उकळून त्याचा काढा एक कप उकळवून गाळावा. तो सकाळी घ्यावा. पुन्हा उरलेला चोथा सायंकाळी पाण्यात उकळून आटवावा. अर्धा कप उरल्यावर गाळून घ्यावा. नुसता उकडलेला दुध्या भोपळा किंचित मिरपूड टाकून घ्यावा. ज्वारीची भाकरी आणि पालेभाज्यांचं सूप यावर राहण्याचा प्रयत्न करावा.

आयुर्वेद उपचार घेताना त्याच्याबरोबर पथ्य पाळणंही आवश्यक असतं. लठ्ठपणावर उपचार सुरू केल्यावर गोड, आंबट, थंड आणि जड पदार्थ आहारातून बंद करावेत. पाणीसुद्धा कमी प्यावं, तेही उकळून गार केलेलं असावं. वनस्पतीतूप, दही, साखर, बटाटा, कांदा, चवळी, मटकी, वाटाणा, हरभरा, गहू, तूप, दूध, पोहे, चुरमुरे, तळलेले पदार्थ, मांसाहार लोणची, पापड, थंड पेयं, आइस्क्रीम, चॉकलेट आदी गोष्टीही कटाक्षाने टाळाव्यात. एवढे पदार्थ टाळल्यावर खायचं काय, हा प्रश्न पडला असेल. भाजलेल्या, ज्वारीची भाकरी, मुगाची पातळ आमटी, दुध्याभोपळा, कोहळा, दोडका, पडवळ, कारलं, शेवगा, राजगिरा या भाज्यांचा आहारात वापर करावा. पाणी जेवणाअगोदर प्यावं. जेवणानंतर पिऊ नये. दुपारची झोप सुस्ती वाढवते. बैठं काम टाळावं. पण पर्यायच नसेल तर त्याला पुरेशा व्यायामाची जोड द्यावी. रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नये. शतपावलीची सवय चांगली. पण ती पंधराशे ते अडीच हजार पावलांची असावी.

लठ्ठपणावर उपचार सुरू केल्यावर साध्या साध्या बाबतीत दक्षता बाळगल्यास त्याचा खूप उपयोग होतो. उदाहरणार्थ, भूक आणि तहान मारायला शिकावं. ठरवून काम, व्याप, श्रम यामध्ये सतत बुडलेलं असावं. शरीरातून भरपूर घाम निघाला पाहिजे. दुपारची झोप तर टाळावीच, पण अनुषंगाने येणारं विलासी आणि ऐषारामी जीवनही न जगण्याचा निर्धार करावा. लठ्ठपणा हा तारुण्याची हानी करणारा असतो. म्हणून ते टिकवायचं असेल तर लठ्ठपणा शरीराचा ताबा घेणार नाही हे कटाक्षाने पाहायला हवं.

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. मी लठ्ठपणामुळे खूप नुकसान सहन करत आहे प्रयत्न करते पण यश येत नाही आजार वाढत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट