Friday, May 3, 2024
Google search engine
Homeकोलाजनिवडणुका सुधारणांचं दिवास्वप्न

निवडणुका सुधारणांचं दिवास्वप्न

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘एक देश, एक निवडणूक’ ही महत्त्वाकांक्षी संकल्पना अमलात आणण्याच्या दृष्टीने सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यासाठी सर्व राजकीय पक्षांची संमती आवश्यक ठरणार आहे. त्यात भाजपला आपल्या आघाडीतील घटक पक्षांची अनुमती मिळवणं कठीण नाही. मुद्दा आहे तो विरोधी पक्ष या संकल्पनेला मान्यता देणार का हा. या संदर्भातील ताज्या घडामोडींचा वेध..

भारतासारख्या लोकशाही देशात संसद तसंच राज्यांच्या विधिमंडळांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच या सभागृहांमध्ये निवडणूक प्रक्रियेद्वारे जाणारे लोकप्रतिनिधी आपल्या जबाबदा-या आणि कर्तव्याप्रति प्रामाणिक असावेत, अशी अपेक्षा असणं साहजिक आहे. मुख्यत्वे लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेलं, लोकांसाठी काम करणारं लोकांचं सरकार असायला हवं. यावरून या व्यवस्थेत लोकप्रतिनिधींच्या जनतेप्रति उत्तरदायित्वाची कल्पना येते. मात्र, अलीकडच्या काळात लोकप्रतिनिधींना या कर्तव्याचा विसर पडत चालल्याचं दिसून येतं. ही लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीने विचार करायला लावणारी बाब आहे. त्या संदर्भात निवडणूक सुधारणांचा मुद्दा नेहमी पुढे येतो. आजवर देशातील निवडणूक सुधारणांच्या संदर्भात वेळोवेळी चर्चा होत आली आहे. एवढंच नव्हे तर त्यादृष्टीने काही पावलंही टाकण्यात आली. उदाहरण द्यायचं तर यापूर्वी निवडणूक सुधारणांच्या संदर्भात १९९० मध्ये गोस्वामी समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने निवडणूक सुधारणांबाबत अनेक उपयुक्त सूचना केल्या होत्या. त्यानंतर १९९३ मध्ये तत्कालीन व्होरा समितीने संसदेत गुन्हेगारांच्या प्रवेशाबाबत चिंता व्यक्त केली होती. या समित्यांच्या शिफारशी वा सूचना विचारात घेऊन निवडणूक सुधारणांबाबत नव्यानं धोरण आखण्याची आवश्यकता आहे.

या पार्श्वभूमीवर मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर निवडणूक सुधारणा करण्याच्या दृष्टीने उपाय सुचवण्यासाठी सर्वेच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. चौहान यांच्या अध्यक्षतेखाली विधी आयोगाची स्थापना करण्यात आली. त्याचं काम वेगानं सुरू आहे. त्यात निवडणूक आयोगानंही एका व्यक्तीने दोन ठिकाणांहून निवडणूक लढवण्यावर निर्बंध घालण्याची सूचना विधी आयोगाला केली. असे प्रयत्न सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक देश, एक निवडणूक’ ही महत्त्वाकांक्षी संकल्पना समोर आणली. ती अमलात आणण्याच्या दृष्टीने या सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यासाठी सर्व राजकीय पक्षांची संमती आवश्यक ठरणार आहे. त्यात भाजपला आपल्या आघाडीतील घटक पक्षांची अनुमती मिळवणं कठीण नाही. मुद्दा आहे तो विरोधी पक्ष या संकल्पनेला मान्यता देणार का हा. त्याकडे सा-यांचं लक्ष लागलं आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात एक ड्राफ्ट तयार केला असून त्यावर चर्चा करण्यासाठी नुकतीच विविध राजकीय पक्षनेत्यांची बैठक बोलवली होती. त्यामध्ये सहभागी असलेल्या एनडीएतील दोन सहकारी पक्षनेत्यांसह पाच राजकीय पक्षांनी ‘एक देश, एक निवडणूक’ या प्रस्तावाचं समर्थन केलं. तर नऊ राजकीय पक्षांनी या प्रस्तावाला विरोध केला. या संदर्भात म्हणणं मांडण्यासाठी भाजपनं ३१ जुलैपर्यंतची मुदत मागितली. तर काँग्रेस अन्य पक्षांशी चर्चा करून या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यामुळे आता याबाबत पुढे कोणत्या घडामोडी घडणार आहेत, याविषयी उत्सुकता वाढीस लागली आहे.

या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत. मुख्यत्वे भारतासारख्या मोठय़ा लोकसंख्येच्या आणि विविध राज्यं, केंद्रशासित प्रदेश यांनी युक्त तसंच भौगोलिक वैविध्य असणा-या देशात वेळोवेळी होणा-या निवडणुका पार पाडणं मोठं आव्हान ठरत आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर सरकारी यंत्रणा तर कामाला लावावी लागतेच, शिवाय प्रचंड मुनष्यबळही लागतं. निवडणुकांच्या काळात सुरक्षा यंत्रणांवर येणारा ताण हा आणखी वेगळा विषय आहे. यात मुख्य मुद्दा आहे तो निवडणूक यंत्रणांवर होणारा प्रचंड प्रमाणावरील खर्च. या देशात ग्रामपंचायत पातळीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा तसंच लोकसभा अशा विविध टप्प्यांवर वेळोवेळी निवडणुका होत असतात. त्यादृष्टीने निवडणूक यंत्रणेवर सतत कामाचा ताण असतो. निवडणुकांच्या पूर्वतयारीपासून मतदानाचे निकाल जाहीर होईपर्यंत विविध टप्प्यांवर खर्च करावा लागतो. शिवाय या ना त्या कारणाने फेरनिवडणुका घ्यायच्या झाल्यास पुन्हा तेवढीच यंत्रणा कामाला लावावी लागते आणि खर्चही वाढतो. हा वारंवार होणा-या निवडणुकांसाठी मोठय़ा प्रमाणावर केला जाणारा खर्च वाचवण्याच्या दृष्टीने एकत्र निवडणुकांचा पर्याय महत्त्वाचा ठरणार आहे. यातून मोठय़ा प्रमाणावर खर्च कमी झाल्यास तो पैसा विकासकामांवर खर्च करणं शक्य होणार आहे. त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा तसंच अन्य शासकीय यंत्रणांवरील कामाचा ताणही कमी होऊ शकेल. यापूर्वी १९५२, १९५७ आणि १९६२ मध्ये संपूर्ण देशभर एकाच वेळी निवडणुका पार पडल्या होत्या. मात्र, १९६७ पासून ही परंपरा खंडित होत गेली. पुढे १९९५ च्या दरम्यान एकत्र निवडणुकांची पुन्हा चर्चा सुरू झाली. नंतर १९९९ मध्ये तत्कालीन कायदा आयोगाचे अध्यक्ष न्या. बी. जीवन रेड्डी यांनी या संदर्भातील अहवाल तत्कालीन कायदामंत्री राम जेठमलानी यांना सादर केला होता. परंतु २००४ मध्ये केंद्रातील सत्तापालटानंतर या विषयाकडे लक्ष देण्यात आलं नाही.

अर्थात, एकत्र निवडणुका घ्यायच्या ठरवलं तर त्यात काही अडचणी निर्माण होणार आहेत. त्यांचाही विचार होणं गरजेचं आहे. एक म्हणजे या देशात विविध राज्यांच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांची मुदत वेगवेगळ्या वेळी संपत आहे. त्यामुळे त्या त्या ठिकाणी निवडणुकाही वेगवेगळ्या वेळी घेतल्या जातात. सर्वसाधारणपणे विधानसभांचा कालावधी पाच वर्षाचा असतो. परंतु राजकीय अस्थिरता वा अन्य कारणांनी विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त होण्याचेही प्रसंग निर्माण होतात. अशा स्थितीत त्या त्या ठिकाणी लवकरात लवकर वा ठरलेल्या मुदतीत निवडणुका घेणं भाग पडतं. असं असताना लोकसभा आणि सर्व विधानसभांच्या निवडणुका एकत्र कशा घेतल्या जाणार हा खरा प्रश्न आहे. उदाहरण द्यायचं तर गुजरात आणि कर्नाटक विधानसभांच्या निवडणुका अलीकडेच पार पडल्या. शिवाय येत्या काही महिन्यांत राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. साहजिक त्यांची मुदत येत्या लोकसभा निवडणुकांनंतर संपणार आहे. अशा परिस्थितीत लोकसभा आणि सर्व विधानसभांच्या निवडणुका एकत्र घ्यायच्या ठरवल्यास या राज्यांच्या विधानसभा मुदतीपूर्वी बरखास्त कराव्या लागतील. किंबहुना त्यांचा कालावधी काही महिन्यांचाच असणार आहे. शिवाय अशा स्थितीत घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यातल्या त्यात भाजपच्या ताब्यात असणारी राज्य सरकारं या बदलासाठी अनुकूल असतील. परंतु अन्य पक्षांच्या सरकारांची अनुकूलता मिळवण्यासाठी केंद्र सरकारला विशेष प्रयत्न करावे लागतील. दुस-या बाजूला ही संकल्पना अस्तित्वात आल्यास लोकसभेप्रमाणे सर्व विधानसभांचा कार्यकाल पूर्ण पाच वर्षाचा राहील, याची काळजी घ्यावी लागणार आहे. मुदतीपूर्वी एखादी विधानसा वा लोकसभा बरखास्त करावी लागली तर नियोजित वेळापत्रकानुसारच निवडणुका घेणं हिताचं वा घटनात्मकदृष्टय़ा योग्य ठरणार आहे का, याचाही विचार करावा लागणार आहे. राजकीय पक्षांच्या दृष्टीनं विचार करायचा तर प्रचलित पद्धतीप्रमाणे विविध राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळीच होणंच सोयीचं ठरणार आहे. कारण या पद्धतीत निवडणूक असणा-या भागात इतर भागांतील पक्षाच्या सर्व नेतेमंडळींना, कार्यकर्त्यांना जोमानं कामाला लावणं शक्य होतं. त्याऐवजी एकाच वेळी सर्व विधानसभांच्या निवडणुका झाल्यास सर्व ठिकाणी एकाच वेळी पक्षाची यंत्रणा कामाला लावणं कठीण ठरणार आहे. त्याचबरोबर या सर्व निवडणुकांसाठी आवश्यक असणारा निधी राजकीय पक्षांना एकाच वेळी उभा करता येईल का, हाही प्रश्न विचारात घेण्याजोगा आहे. या सा-या बाबी लक्षात घेता एक देश, एक निवडणूक संकल्पना प्रत्यक्षात येणं गरजेचं असलं तरी त्या वाटेतील आव्हानांवर कशी मात केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. हिंदूस्थानचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासासाठी सर्वतोपरी सकारात्मक आणि प्रामाणिकपणे अथक प्रयत्नशील आहेत. जनतेने आणि विशेषकरून सर्व राजकीय पक्षांनी पक्षभेद विसरून साथ द्यायला हवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट