आशिया चषक स्पर्धेदरम्यान मैदानावरील अंपायर्स वापरत असलेल्या इयरपीसबाबत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आक्षेप घेतला आहे.
ढाका- आशिया चषक स्पर्धेदरम्यान मैदानावरील अंपायर्स वापरत असलेल्या इयरपीसबाबत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आक्षेप घेतला आहे.
‘‘सध्या अंपायर्सकडे वॉकीटॉकी असते. त्यात इयरपीसची भर पडली आहे. एका कानात इयरपीस असल्यामुळे अंपायर्सना केवळ एका कानाने ऐकावे लागते. त्याचा परिणाम निर्णय देण्यावर होऊ शकतो. त्यामुळे अंपायर्सच्या इयरपीस वापराबाबत आयसीसीने पुनर्विचार करावा,’’ अशी सूचना महेंद्रसिंग धोनीने केली आहे.
पाकिस्तानविरुद्ध भारताने मोठा विजय मिळवला तरी आशिष नेहराच्या गोलंदाजीवर खुर्रम मंझूर बाद होता, असा भारताच्या कर्णधाराचा दावा आहे.
मात्र अंपायर्सनी त्याला नाबाद दिले. नेहराने टाकलेल्या चेंडूंची कडा लागून चेंडू धोनीच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. चेंडू बॅटला लागल्याचे टीव्ही रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते.
अंपायर्सच्या नाबाद असल्याच्या निर्णयावर धोनीने नाराजी व्यक्त केली आहे. इयरपीसमुळे चेंडूने बॅटची कडा घेतलेले अंपायर्सना ऐकू गेले नसावे, असे धोनीचे म्हणणे आहे.