एकछत्र स्वामी समर्थ सेवा संस्थाआम्हाला पर्यावरणासाठी म्हणजे सर्वात जास्तकरून कमी होणा-या वृक्षासाठी काम करायचे होते. त्यासाठी आम्ही ऐ वाक्यही तयार केले.
एकछत्र स्वामी समर्थ सेवा संस्थाआम्हाला पर्यावरणासाठी म्हणजे सर्वात जास्तकरून कमी होणा-या वृक्षासाठी काम करायचे होते. त्यासाठी आम्ही ऐ वाक्यही तयार केले.
।। प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात एकातरी रोपटयाचे वृक्षात रूपांतर करावे।।
आणि मग वेगवेगळे प्रयोग राबवण्यास सुरुवात झाली. त्यात सर्वात प्रथम आम्ही संस्थेतील सभासदांनी कोणतेही फळ खाल्ले तर त्यांच्या बिया फेकायच्या नाहीत. त्या सुकवून एप्रिल-मेमध्ये गावी जाताना रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीत टाकायच्या किंवा गावी गेल्यावर रस्त्याच्या दोन्ही कडेला टाकायच्या, जेणेकरून येणा-या जून महिन्याच्या पावसात त्या रुजतील व त्यापासून झाडे तयार होतील.
तसेच मी देवळात गेल्यावर पाहिले की देवाला घातलेली हार-फुले पुजारी जास्त झाल्यावर उचलतो आणि केराच्या टोपलीत फेकतो. त्यापेक्षा आमच्या संस्थेने ठरवले. आपण देवळात गेल्यावर तुळस अथवा दुसरे कोणतेही रोपटे देवासमोर ठेवावे व देवळात आलेल्या कोणत्याही भक्ताने ते रोपटे घेऊन जावे व त्यांचे संगोपन करावे. जेणेकरून वृक्ष लावण्यास मदत होईल.
लग्न-बारसं, पूजा, वाढदिवस अशा कार्यक्रमालाही आपण वेगवेगळया फळा-फुलांची झाडे चांगल्या आकर्षक कुंडीत लावून देऊ शकतो. ज्या ठिकाणी फुलांचा बुके द्यायचा प्रसंग आहे, त्या ठिकाणी एखादे रोपटेच द्यावे.
कारण झाडच असे एक आहे. जे आपल्याला अगदी मोफत प्राणवायू देते. आणि आपल्याकडे सगळयात जास्त प्रमाणात वृक्षतोड होते. व ह्यांची भविष्यात आपल्याला जास्त किंमत चुकवावी लागेल. त्यासाठी ‘प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात एकातरी रोपटयाचे वृक्षात रूपांतर करावे.’
आमच्या संस्थेने डिसेंबर २०१५ रोजी सतत ५ ते १० र्वष रोपटी लावून त्याचे वृक्षात संगोपन करण्यासाठी पुरस्कार ठेवला होता. तो पुरस्कार आशा दिगंबर गावडे व मानसी ढोलम ह्यांना संस्थेतर्फे प्रदान करण्यात आला.
संस्थेनी पुढील उपक्रम मालवणात ओझर इथे हाती घेतला आहे. तिथे जास्तीत जास्त फळा व फुलांची झाडे लावण्याची योजना संस्थेने आखली आहेत. जेणेकरून जास्तीत जास्त प्रकारची झाडे तिथे पाहावयास मिळतील व पर्यावरणासाठी गरज असलेल्या वृक्षरोपणास हातभार लागेल. असे एक छत्र स्वामी समर्थ सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्षांचे मत आहे.
एक छत्र स्वामी समर्थ सेवा संस्था ही ५ ते १० र्वष वृक्ष संगोपन करण्या-यांसाठी स्पर्धा करते. ह्या स्पर्धेचे मुंबई शहर स्पर्धाप्रमुख अवधूत साळकर व अनिकेत नागवेकर यांच्याशी संपर्क साधावा.