आयपीएलच्या नवव्या सीझनला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार असून पहिला व अंतिम सामना मुंबईत होणार आहे.
मुंबई- आयपीएलच्या नवव्या सीझनला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. पहिला सामना वानखेडेमध्ये मुंबई विरुद्ध पुणे असा होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स यांच्या सामन्याने आयपीएलला सुरुवात होईल.
या स्पर्धेत एकूण ६० सामने होणार आहेत. ९ एप्रिलपासून सुरू होणारी ही स्पर्धा ५१ दिवस चालणार आहे. अंतिम सामना २९ मेला मुंबईत वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे.
एकूण १० ठिकाणी सामने खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये मुंबईसह मोहाली, दिल्ली, नागपूर, पुणे, बंगळुरु, हैद्राबाद, कोलकाता, राजकोट आणि रायपूर या शहरांचा समावेश आहे.
यंदाच्या स्पर्धेत चेन्नई आणि राजस्थान रॉयल्सऐवजी राजकोट आणि पुणे संघाचा समावेश करण्यात आला आहे. प्लेऑफ लढती पुणे व बंगळुरुमध्ये होतील तर अंतिम सामना मुंबईत होणार आहे.