रात्रीच्या वेळी पडणारे दव पाहता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणा-या सात एकदिवसीय क्रिकेट लढतींच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.
नवी दिल्ली- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणा-या सात एकदिवसीय लढतींच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी पडणारे दव पाहता दुस-यांदा फलंदाजी करणा-या संघाला फटका बसू नये म्हणून दिवस-रात्र लढती एक तास आधी सुरू करण्यात येतील, असे बीसीसीआय सचिव संजय पटेल यांनी म्हटले आहे.
नव्या वेळांनुसार, पहिले सत्र दुपारी १.३० ते सायं. ५.०० या दरम्यान तसेच दुसरे सत्र सायं. ५.४५ ते रात्री ९.१५ वेळेत होईल. सायं. ५ ते ५.४५ या वेळेत मध्यंतर राहील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सात लढतींच्या एकदिवसीय मालिकेला १३ ऑक्टोबरपासून पुण्यातून सुरुवात होईल. मात्र १० ऑक्टोबरला राजकोटमध्ये होणा-या एकमेव टी २० ने पाहुण्यांच्या भारत दौ-याला प्रारंभ होणार आहे.